"हुश्श" !आटोपलं बाबा एकदाचं हे हळदी कुंकू प्रकरण.
काय मेली ती ताम-झाम! आज काय कुणाच्या लेकीचा संक्रांत सण, तर उद्या कुणाच्या सुनेचा.कुणाच्या नातीचे/नातूचे बोर नहाण .आणी ह्यापैकी काही नसलेच, तरी नेहमीचे हळदी कुंकू आहेच.
रोज उठून त्या ठेवणीतलया साडया काढ़ा, दागिने (असतील ते) चढवा आणी बरयापैकी तयार होऊन पडा एकदाचे घराबाहेर." असच स्वगत चालत असेल का स्त्रियांच्या मनात?
दरवर्षी संक्रांति चा दिवस ते रथसप्तमी चा दिवस,ह्या संपूर्ण काळात चालणारा हा उत्साह सोहळा पाहून मनात हा विचार येतोच.
'हळदी-कुंकू' ह्या कार्यक्रमाचं अन स्त्रियांच्या मनाचं एक पूर्वापार चालत आलेलं आणि जवळचं नातं आहे असं वाटतं. कुठेतरी ते 'सौभाग्य' ह्या संज्ञेशी जोडलं गेलंय म्हणूनही असेल कदाचित.
कारण हळद,कुंकू,वाण ही सारी सौभाग्यवतीचीच लक्षणे मानली गेली आहेत.पूर्वी वाण म्हणून सुवासिनींना 'सुगडी' देत असत.त्यात वाटाण्याच्या शेंगा,बोरं, हरभरे,गाजराचे काप,तिळगुळ सह देण्याची प्रथा होती.आजही हे अशा प्रकारचं वाण बऱ्याच ठिकाणी दिलं जातं. हे वाण देण्यामागे पोषक आणि गुणकारी तत्वांचा विचार केला गेला होता.
कालानुरूप,परिस्थितीनुरूप,आणि अर्थात सोयी नुरूप ह्या पारंपरिक सोहळ्यात आता बरेच बदल म्हणा,सुधारणा म्हणा, घडून येताना दिसत आहेत. जसे,गहू,बोरं, वाटाण्याच्या शेंगा ह्याची जागा मुरमुरेनी घेतली आहे. (काही ठिकाणी) 'लुटीच्या'वस्तूंमध्येही कमालीची विविधता आली आहे.(अर्थात,आजही त्यात प्लॅस्टिकच्या छोट्या बरणीचे स्थान मात्र अढळ आहे .)तिळगुळ सोबतच काहीतरी चमचमीत पदार्थ खाऊ घालून येणाऱ्या बायकांना संतुष्ट करण्याची प्रथा देखील सुरु झालीये बऱ्याच ठिकाणी.(नाहीतरी एव्हढ्याश मेल्या त्या चमचा वाटीसाठी इतकया लांब जायला पुरते तरी का? असा सूज्ञ विचार करणारया बायकांसाठीच असा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला असावा) महत्वाचे बदल असे ,की हळदी कुंकू ऐवजी 'तिळगूळ-समारंभ' असे संबोधन वापरणे,कार्यक्रम खाजगी रित्या न करता सार्वजनिक सवरूपात करणे,कार्यक्रमाला फक्त सुवासिनीना न बोलवता विधवा बायका देखील बोलावून त्यांच्या मनातील न्यूनगंड, नैराश्येची भावना थोडयाफार प्रमाणात का होईना,कमी करण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे बदल निश्चितच उललेखनीय आहेत.
एका गोष्टीचं मात्र मला नेहमीच नवल वाटत आलेलं आहे आणी ते म्हणजे,वाणात 'लुटल्या' जाणाऱ्या वस्तूचं अप्रूप झाडून सगळयाच बायकाना असतं हो. मग ती वस्तू काही का असेना,अगदी काहीही.हयात छोटया चमचयापासून,वाटी,गाळणी,सगळच आलं. (आता साईज बदलली असेलही कदाचित)
बाई श्रीमंत घरची असो वा गरीब घरची.पारंपारिक विचाराची असो वा आधुनिक विचार बाळगणारी असो. हया लुटलया जाणाऱ्या वस्तू मधे सगळयाच (जवळजवळ) बायकाना कमालीची उत्सुकता असते. जसं कपडयाचा सेल,दागिनयाचा सेल,अथवा घरगुती वस्तूंचा सेल----कोणत्याही 'सेल' च्या ठिकाणी सर्वच स्तरातील बायका प्रचंड गर्दी करताना दिसतात.अगदी तसच,हळदी कुंकू च्या कार्यक्रमानाही बायका उत्साहाने हजेरी। लावताना दिसतात.
वर्षा ऋतूत सृष्टी जशी हिरवाईने बहरते ना,तद्दवतच हया दिवसात गावातील रस्तेही सौंदर्याने नटलेले दिसतात.घोळकया घोळकयाने जाणारं सौंदर्य बघून खराब रस्तयानाही ऊत्तम दिवस आलयाचे भासते. समस्त पुरुष जातीला हया संपूर्ण कालावधीत,आपलया राशीला,'सुजलाम् सुफलाम्' झालयागत 'नेत्रसुख' मिळालयाचा अभिनव साक्षात्कार होत असणार.घरोघरी नवरा नावाची जातही जाम खुश रहात असणार.पहिलं कारण,एरवी अतिशय सुस्त आणी मखख् चेहरा करुन बसलेलया (अगदी पती घरी आलयानंतरही तोंडा वरची माशीही उडू देणयाचे कष्ट न घेणाऱ्या ) त्यांच्या बायका हया कालावधीत मात्रं भलत्याच प्रसन्न आणी आनंदी दिसतात.दुसरं कारण,ज्यांना घरात बायकोची कटकट आणी वटवट नको वाटते,त्याना बराच काळ बऱ्यापैकी शांतता मिळू शकते.
अगदी पुढारलेलया विचारांचया बायका,ज्यांच्या मते,'मंगळसुत्र घालणे,पायात जोडवे घालणे,कपाळावर लाल कुंकूच किवा टिकली रेखाटणे म्हणजेच सौभागयवती असणे,असा काही नियम आहे का? आम्ही आमच्या पेहरावाला अनुसरून मँचीग करू. कुणाचे काय जाते?' त्या देखील हळदी कुंकू च्या कार्यक्रमाना न चुकता,न कंटाळता हजेरी लावताना आढळतात..(भले आपण खुदद् त्या फंदात पडत नसलया तरी)
मुखय म्हणजे बायकांचा हा उस्ताह शेवटच्या दिवसापर्यत म्हणजे रथसप्तमी पर्यंत टिकून असतो हे आणी विशेष.
काय कारणं असतील हयामागे,खरोखर विचार करणयासारखी गोष्ट आहे,ना?
विवीध स्तरातील,भिन्न विचारसरणीच्या ,भिन्न रहाणीमान असणाऱ्या आणी भिन्न वातावरणातील बायका जेव्हा अशा कार्यक्रमांसाठी एकत्रं येतात,मनापासून आनंद घेतात,देतात,तेव्हा नक्की काय कारण असू शकतं? एकंदरीतच स्री जातीची मानसिकता? की अजून काही? तुम्हाला काय वाटतं?
No comments:
Post a Comment