सुलभा!.....होय, मीच सुलभा.......सुलु।
लहानपणापासुनच खेळायचा अतिशय नाद असलेली...........
लहानपणी सगळेच खेळतात !त्यात काय विशेष!......मनात तुम्ही म्हणत असालच
हो ...हो....हो.....अगदी सगळेच खेळतात मान्य पण तुमच्यासारखे काळ्या डबीतले खेळ खेळत नव्हते तर ,चक्क मैदानावर जाऊन,गल्लीत किंवा शेजारीपाजारीअसणार्या घरांच्या अंगणात........
आईवडिलांना कुठे माहिती असायच आपलं पोरं कुठे आहे ते!.पण इथेच शेजारीपाजारी उंडारत असणार याची पक्की खात्री असायची.
सकासुनची त्यांची त्यांची नैमित्यिक कामांची एकसुरी दिनचर्या आटोपून बाहेरच्या ओट्यावर ऊन खायला आई आली की, तिच्या पुढ्यात शाळेची वेळ होतेय म्हणून केस मोकळी सोडून बसलेली मीपटपट वेण्या घालगं बाई म्हणून नांदा करत बसलेली कारण केसं मोठे होते .गुंता काढून लांब सडक केसांची वेणी घालणे मला जमत नसे,आईमात्र अतिशय हळुवार एकएक केस तुटणार नाही याची काळजी घेत वेणी घालून देई.मलामात्र खूप घाई झालेली असायची एकदाच्या वर घट्ट आवळून बांधलेल्यादोन वेण्या लाल रिबीणिचे सहापाकळी टवटवीत पाडलेले फूल .पावडर गंधाचा नट्टापट्टा करुन.दप्तर खांद्यावर टाकून एकेका मैत्रिणीला आवाज देत सगळा ताफा प्रार्थनेच्या टोलावर बरोबर रांगेत ऊभा.
हा रोजचा दिनक्रम.
मी अभ्यासात कशी होते हे मला अजुनही सांगता येणार नाही .कारण त्याकाळातल्या रिवाजाप्रमाणे मी कधीही नापास झाले नाही .कुठलाही ट्युशनक्लास न लावता प्रत्येक वर्गात पास होणारी .इतपत माझी कुवत होती आणि त्यात मी समाधानीपण होते.स्वतःकडणं फारशा अपेक्षानव्हत्याच तशा असाव्यात असं माझ्या गाविही नव्हतं.
वर्गातल्या हुशार मुली मला मनापासुन आवडतं पण त्यांना मी आवडत होते कां माहिती नाही.त्यामुळे त्या कधी माझ्या मैत्रिणी झाल्या नाहीत. फ्रंट बेंचर्सकिंवा ब्ॉक बेंचर्स यामधला जो मिडल बेंचर्स प्रकारात मोडणारी माझी कुवत होती.शाळेत येणे,खेळणे आणि परीक्षेपुरता अभ्यास करुन पास होणे.बस्!
आपल्यात कोणते गुण आहेत,आपल्याला विशेष गती कशात आहे.हे माहितीच नव्हतं.सर्वसाधारणनियमानुसा र१०वी नंतर १२वी नंतर BAअशा क्रमवारीत मी आनायासे पुढे सरकत होती.
आजुबाजुला किंवा घरीपण मुलगीच आहे,जोपर्यंत नापास होत नाही तोपर्यंत शिकवावे नंतर लग्न लावून मोकळे व्हावे अशा विचारांचे आईवडील असल्याने तेव्हा जरी ते माझ्या सोयीच होतं तरी नंतर आपण विशेष उद्दीष्ट ,ध्येय समोर ठेवून काही केलं नसल्याची खंत मनात येत होती.
कॉलेजपर्यंत सुद्धा मला मैदानी खेळात गती होती. university player होते.खेळाच्या माध्यमातून आपसुकच नोकरी पदरात पडेल आशा स्वप्नवत दुनियेत मी वावरत होती. झालं असं की,दरम्यान माझ्या लग्नाचे जमलेआणि सगळ जिथल्या तिथे थांबलं.लग्नानंतर रुटीन आयुष्य सुरु होतं सगळं काही चांगलच आहे असं दिसत होतं पण त्यात फारसं तथ्य नव्हतं सुरवातिला छोट्या छोट्या वाटणार्या कुरबुरी आता नित्यनैमित्तिक झाल्या होत्या .कुणाच काय,कुठे चुकतय ंयाचा अंदाज निदान मला तरी लागत नव्हता. साध्या साध्या गोष्टींवर आगडोंब वाजत होता. तरीपण दिवाकर म्हणजे माझा नवरा ढिम्म रहात असे जणू यात आपला काही संबंधच नाही असा त्याचा वावर असे. आज नाही तर तर उद्या दिवाकर मला समजून घेतील असेच वाटत होते. पण ते फक्तत तनानेच माझ्च्याया जवळ येत मन मात्र कुठेतरी भरकटलेलच असे, ......हंहं असा मनात विचार चुकूनही मनात आणू नका कारण ते फारच सरळमार्गी होते.कां होता आसा स्वभाव त्यांचा! .......आडनीड वयात म्हणजे मुलांच्या वयात येण्याच्या वयात क्षुल्लक आजाराचे निमीत्त्य होऊन दिवाकरचे वडील स्वर्गस्थ झाले.आणि हामुलगा जो की,अतिशय वडिलांशी भावनिक गुंतलेला असा कोषात गेला ,एकलकोंडाच झाला.जो आजतागयत मनमोकळ होणं जणू त्यान सोडून च दिल होतं .याच्या ह्या स्वभावाचा फायदा कुणी घेऊ नये ह्याची काळजी आई अगदी बारीक नजर ठेवून घेत असे प्रत्येक काम स्वतःच पुढे होऊन करीत असे. पुढे माझं नि दिवाकरचं लग्न झाल्यावरही ती सवय तशीच कायम राहिली .बायको ही नवर्कायाची जबाबदारी न रहाता सासुची म्हणजे दिवाकरच्या आईचीच! प्रत्येक अन् प्रत्येक गोष्ट त्यांना सांगूनच करावी लागतं त्याचा परिणाम आसा झाला की नवरा आणि बायको यांच नातं कधी फुललच नाही. इतक्यातलीच गोष्ट आहे.माझी पाळी टळली होती.कोण आनंदात होते मी ,त्या मोहरल्या क्षणी मी आणि दिवाकरच सोबतीने असावे असे मला सारखे वाटायचे पण तिथेही आमच्या सासुबाई सतत सोबतिला .बरं तेही मी नेहमीचच म्हणून नजरेआड केलं पण,देवानीच दृष्ट लावावी अशी घटना घडली माझ्या पोटात वाढणारा अंश गळून पडला त्यावेळेस ह्याचा कोरडेपणा इतका जाणवला की, आधीच दुःखावेगात होरपळलेल्या मला एकटीला तसे टाकून कामाचे निमित्त्य पुढे करुन हा अॉफीसटूरला गेला. मी पार खचून गेले होते. मी आसह्य होऊन माहेरची वाट धरली .हसरी खेळकर मी आणखीणच क्षीण दीन दिसू लागली. सगळं चांगलं असताना काय अवदसा सुचली असे प्रश्नार्थक भाव प्रत्येकाच्या नजरेत मला दिसत होते.दिवसामागून दिवस जात होते.
एके दिवशी सहजच घरातल्या जुन्या कपड्यांचे तुकडे एकमेकांना जोडून शिवायला घेतले तर त्याची अतिशय सुबक गोधडी झाली. शिवलेल्या गोधडीवर स्वतःच खूश झालेली मी... मनाशी काहीतरी ठरवले आणि काही मैत्रिणींना हाताशी घेऊन छोटेखानी काम सुरु केले. तिच्या कामाचे परिसरात कौतुक होऊ लागले.हळूहळू कामाची दखल वृत्तपत्र t.v.नेपण घेतली आणि हा हा म्हणता तिची ख्याती वाढत गेली. सहाजिकच दिवाकरला पण या बातमीने सुखद धक्का दिला, दिवाकरच्एया मनात चाललेली उलथापालथ चक्केक चेहर्यावर स्पष्ट जाणवत होती.त्याला खर्या अर्थानने जाणीव झाली होती.आपल्या चुकीच्या वागण्याची शिक्षाआपणच भोगतो आहे हे ही त्याला कळत होतां पण सुरुवात कुठून करावी ते कळत नव्हतं आता मात्र त्याला प्रकिशाचा किरण दिसू लागला .अभिनंदन करण्याच्या निमित्त्याने त्याने मला फोन केला आणि मी तुला भेटू शकतो कां असेही विचारले. अर्थात माझा दिवाकरवर व्यक्तिशः राग कधीच नव्हता.परिस्थितीने आम्हाला दोन तटावर ऊभे केले होते.आणि माणूस काळानुरुप बदलतो यावर माझापण विश्वास होता म्हणून मी आणि दिवाकरने भेटायचे ठरवले. त्याच आठवड्यात तो माझ्या गावी आला दिवाकर मला भेटला.आपसातील समज गैरसमजाबद्दल बोलताना दिवाकर हळूच हातात हात घेऊन मला म्हणाला,"सुलु तुझे हात जोडण्याचे काम करतात फाडण्याचे नाही.अश्रुंनी डोळे तरळले होते"...आजही तिच ऊब तुझ्या हातात आहे. ह्या ऊबदार गोधडीसारखी.!!!.
लहानपणी सगळेच खेळतात !त्यात काय विशेष!......मनात तुम्ही म्हणत असालच
हो ...हो....हो.....अगदी सगळेच खेळतात मान्य पण तुमच्यासारखे काळ्या डबीतले खेळ खेळत नव्हते तर ,चक्क मैदानावर जाऊन,गल्लीत किंवा शेजारीपाजारीअसणार्या घरांच्या अंगणात........
आईवडिलांना कुठे माहिती असायच आपलं पोरं कुठे आहे ते!.पण इथेच शेजारीपाजारी उंडारत असणार याची पक्की खात्री असायची.
सकासुनची त्यांची त्यांची नैमित्यिक कामांची एकसुरी दिनचर्या आटोपून बाहेरच्या ओट्यावर ऊन खायला आई आली की, तिच्या पुढ्यात शाळेची वेळ होतेय म्हणून केस मोकळी सोडून बसलेली मीपटपट वेण्या घालगं बाई म्हणून नांदा करत बसलेली कारण केसं मोठे होते .गुंता काढून लांब सडक केसांची वेणी घालणे मला जमत नसे,आईमात्र अतिशय हळुवार एकएक केस तुटणार नाही याची काळजी घेत वेणी घालून देई.मलामात्र खूप घाई झालेली असायची एकदाच्या वर घट्ट आवळून बांधलेल्यादोन वेण्या लाल रिबीणिचे सहापाकळी टवटवीत पाडलेले फूल .पावडर गंधाचा नट्टापट्टा करुन.दप्तर खांद्यावर टाकून एकेका मैत्रिणीला आवाज देत सगळा ताफा प्रार्थनेच्या टोलावर बरोबर रांगेत ऊभा.
हा रोजचा दिनक्रम.
मी अभ्यासात कशी होते हे मला अजुनही सांगता येणार नाही .कारण त्याकाळातल्या रिवाजाप्रमाणे मी कधीही नापास झाले नाही .कुठलाही ट्युशनक्लास न लावता प्रत्येक वर्गात पास होणारी .इतपत माझी कुवत होती आणि त्यात मी समाधानीपण होते.स्वतःकडणं फारशा अपेक्षानव्हत्याच तशा असाव्यात असं माझ्या गाविही नव्हतं.
वर्गातल्या हुशार मुली मला मनापासुन आवडतं पण त्यांना मी आवडत होते कां माहिती नाही.त्यामुळे त्या कधी माझ्या मैत्रिणी झाल्या नाहीत. फ्रंट बेंचर्सकिंवा ब्ॉक बेंचर्स यामधला जो मिडल बेंचर्स प्रकारात मोडणारी माझी कुवत होती.शाळेत येणे,खेळणे आणि परीक्षेपुरता अभ्यास करुन पास होणे.बस्!
आपल्यात कोणते गुण आहेत,आपल्याला विशेष गती कशात आहे.हे माहितीच नव्हतं.सर्वसाधारणनियमानुसा
आजुबाजुला किंवा घरीपण मुलगीच आहे,जोपर्यंत नापास होत नाही तोपर्यंत शिकवावे नंतर लग्न लावून मोकळे व्हावे अशा विचारांचे आईवडील असल्याने तेव्हा जरी ते माझ्या सोयीच होतं तरी नंतर आपण विशेष उद्दीष्ट ,ध्येय समोर ठेवून काही केलं नसल्याची खंत मनात येत होती.
कॉलेजपर्यंत सुद्धा मला मैदानी खेळात गती होती. university player होते.खेळाच्या माध्यमातून आपसुकच नोकरी पदरात पडेल आशा स्वप्नवत दुनियेत मी वावरत होती. झालं असं की,दरम्यान माझ्या लग्नाचे जमलेआणि सगळ जिथल्या तिथे थांबलं.लग्नानंतर रुटीन आयुष्य सुरु होतं सगळं काही चांगलच आहे असं दिसत होतं पण त्यात फारसं तथ्य नव्हतं सुरवातिला छोट्या छोट्या वाटणार्या कुरबुरी आता नित्यनैमित्तिक झाल्या होत्या .कुणाच काय,कुठे चुकतय ंयाचा अंदाज निदान मला तरी लागत नव्हता. साध्या साध्या गोष्टींवर आगडोंब वाजत होता. तरीपण दिवाकर म्हणजे माझा नवरा ढिम्म रहात असे जणू यात आपला काही संबंधच नाही असा त्याचा वावर असे. आज नाही तर तर उद्या दिवाकर मला समजून घेतील असेच वाटत होते. पण ते फक्तत तनानेच माझ्च्याया जवळ येत मन मात्र कुठेतरी भरकटलेलच असे, ......हंहं असा मनात विचार चुकूनही मनात आणू नका कारण ते फारच सरळमार्गी होते.कां होता आसा स्वभाव त्यांचा! .......आडनीड वयात म्हणजे मुलांच्या वयात येण्याच्या वयात क्षुल्लक आजाराचे निमीत्त्य होऊन दिवाकरचे वडील स्वर्गस्थ झाले.आणि हामुलगा जो की,अतिशय वडिलांशी भावनिक गुंतलेला असा कोषात गेला ,एकलकोंडाच झाला.जो आजतागयत मनमोकळ होणं जणू त्यान सोडून च दिल होतं .याच्या ह्या स्वभावाचा फायदा कुणी घेऊ नये ह्याची काळजी आई अगदी बारीक नजर ठेवून घेत असे प्रत्येक काम स्वतःच पुढे होऊन करीत असे. पुढे माझं नि दिवाकरचं लग्न झाल्यावरही ती सवय तशीच कायम राहिली .बायको ही नवर्कायाची जबाबदारी न रहाता सासुची म्हणजे दिवाकरच्या आईचीच! प्रत्येक अन् प्रत्येक गोष्ट त्यांना सांगूनच करावी लागतं त्याचा परिणाम आसा झाला की नवरा आणि बायको यांच नातं कधी फुललच नाही. इतक्यातलीच गोष्ट आहे.माझी पाळी टळली होती.कोण आनंदात होते मी ,त्या मोहरल्या क्षणी मी आणि दिवाकरच सोबतीने असावे असे मला सारखे वाटायचे पण तिथेही आमच्या सासुबाई सतत सोबतिला .बरं तेही मी नेहमीचच म्हणून नजरेआड केलं पण,देवानीच दृष्ट लावावी अशी घटना घडली माझ्या पोटात वाढणारा अंश गळून पडला त्यावेळेस ह्याचा कोरडेपणा इतका जाणवला की, आधीच दुःखावेगात होरपळलेल्या मला एकटीला तसे टाकून कामाचे निमित्त्य पुढे करुन हा अॉफीसटूरला गेला. मी पार खचून गेले होते. मी आसह्य होऊन माहेरची वाट धरली .हसरी खेळकर मी आणखीणच क्षीण दीन दिसू लागली. सगळं चांगलं असताना काय अवदसा सुचली असे प्रश्नार्थक भाव प्रत्येकाच्या नजरेत मला दिसत होते.दिवसामागून दिवस जात होते.
एके दिवशी सहजच घरातल्या जुन्या कपड्यांचे तुकडे एकमेकांना जोडून शिवायला घेतले तर त्याची अतिशय सुबक गोधडी झाली. शिवलेल्या गोधडीवर स्वतःच खूश झालेली मी... मनाशी काहीतरी ठरवले आणि काही मैत्रिणींना हाताशी घेऊन छोटेखानी काम सुरु केले. तिच्या कामाचे परिसरात कौतुक होऊ लागले.हळूहळू कामाची दखल वृत्तपत्र t.v.नेपण घेतली आणि हा हा म्हणता तिची ख्याती वाढत गेली. सहाजिकच दिवाकरला पण या बातमीने सुखद धक्का दिला, दिवाकरच्एया मनात चाललेली उलथापालथ चक्केक चेहर्यावर स्पष्ट जाणवत होती.त्याला खर्या अर्थानने जाणीव झाली होती.आपल्या चुकीच्या वागण्याची शिक्षाआपणच भोगतो आहे हे ही त्याला कळत होतां पण सुरुवात कुठून करावी ते कळत नव्हतं आता मात्र त्याला प्रकिशाचा किरण दिसू लागला .अभिनंदन करण्याच्या निमित्त्याने त्याने मला फोन केला आणि मी तुला भेटू शकतो कां असेही विचारले. अर्थात माझा दिवाकरवर व्यक्तिशः राग कधीच नव्हता.परिस्थितीने आम्हाला दोन तटावर ऊभे केले होते.आणि माणूस काळानुरुप बदलतो यावर माझापण विश्वास होता म्हणून मी आणि दिवाकरने भेटायचे ठरवले. त्याच आठवड्यात तो माझ्या गावी आला दिवाकर मला भेटला.आपसातील समज गैरसमजाबद्दल बोलताना दिवाकर हळूच हातात हात घेऊन मला म्हणाला,"सुलु तुझे हात जोडण्याचे काम करतात फाडण्याचे नाही.अश्रुंनी डोळे तरळले होते"...आजही तिच ऊब तुझ्या हातात आहे. ह्या ऊबदार गोधडीसारखी.!!!.
No comments:
Post a Comment