Saturday, March 9, 2019

वसंताचे गाणे

रंगांच्या जशा निरनिराळ्या छटा असतात अगदी तशाच मनाच्याही असतात .मन कधी उदास तर कधी आनंदी. कधी कोषात गुरफटलेल तर कधी स्वच्छंदी!..........अगदी फुलपाखरासारखं...... सतत भिरभिरणारं .......फळाफुलांचा  आस्वाद घेणारं! ...मनाची ही अवस्था प्रत्येकचवेळी सारखी असते अस नाही तर ती र्रूतुबदलावर अवलंबून असते ,असेही बरेचदा आपलच आपल्याला जाणवतं ....पावसाळी ढगांची दाटी मनावर मळभ आणतात तर श्रावणसरी नर्तन करणार्या नर्तकीसारखे आनंद देतात.     तसाच हा वसंत !.... आनंदाची बरसात करणारा.  बहारा..बहारा!....असं गुणगुणत   येणारा ! म्हणूनच तर सृष्टीच हे डोलकर " रुप पहाता पहाता आपणही आपसुकच डोलू लागतो. 
          पं.कुमारजींनी  ह्याच    रुतुचक्रावर  आधारित गीतवर्षा,गीतहेमंत,गीतवसंत अशी          रागनिर्मितीच केली  आहे. शास्त्रीय संगीतात खास "वसंतबहार "नावाचा रागही प्रसिद्ध आहे तसेच त्याच नावाच्या सिनेमात पं.भीमसेन जोशी आणि मन्नाडेंच्या आवाजातील ,"केतकी,गुलाब जुही चंपक बन फुले "ह्या ओळी ऐकता क्षणी ,वनातील बहरलेलं रुप जसच्या तस डोळ्यासमोर उभं राहतं.....!

    वसंताच आणाखी एक रुप म्हणजे "प्रेमाचा महिना".......! वसंत म्हणजे प्रेमाचे गाणे,वसंत म्हणजे पानाफुलांचे तराने "हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे" म्हणत दिलेली प्रेमाची कबुली तर कुठे  अबोल प्रीतीने मनातच म्हंटलेली गाणी.ती मांडताना
  कवी सुरेशभट सांगून जातात...
।।मनातल्या मनाता मी,तुझ्यासमीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो।।
अशी ही प्रेमाची मुक तान छेडताना मनातल्या प्रेमाला आलेली भरती प्रियकराला अस्वस्थ करुन सोडते.
   पलाशपुष्पाचा  केशरी रंग वसंतागमनाची ललकारी देणारा! ...खुद्द कृष्णगोपींच्या रासलीलांनी रंगलेला. रंग ना डारो श्यामजी" असे लाडीक नकार देणार्या गोपिकांना खरे तर कृष्णाचा हा खट्याळपणाच जास्त हवहवासा वाटतो. गोपगोपिकांचा हा निरामय प्रेमालाप आपसातील प्रेमभाव टिकवण्याचे तंत्र शिकवून जातो. 
    रुतुराज वसंत,फलराज आम्र आणि गानसम्राज्ञीकोकीळा  यांच काय बरं नातं असावं ?हे तिघेही  मानाचे मानकरी. वसंताच्या आगमनाने आंबा बहरतो. आंब्याच्या बहरण्याने कोकीळेला गानस्फुर्ती होते व तिच्या पंचम स्वराने आसमंत निनादून जातो. 
"कोयलिया बोले आंबुवाके डारपर
रुतु बसंत की देत संदेसवा"
ह्या ओळी आगदी सार्थ ठरवते.
पण खरेपणाची साक्षदेणार्या  कवी द.भा. धामणस्करांच्या या ओळी जास्तच मनाला भिडतात.
.    वसंत येतो तेव्हा फुले फुलतात ,हे पुस्तकात वाचलेले।
     फुले फुलतात तेव्हा वसंत येतो ,हे स्वतः पाहिलेले।।

No comments:

Post a Comment