आला बहर पळसा
आता कडाडेल ऊन
ऐकू येई सारीकडे
सखे होळीची ग धून
होळी... फाल्गुन पौर्णिमेला साजरा होणारा उत्सव! एक लोकोत्सव! अग्नी पूजेशी संबंधित उत्सव! हा आहे कृषीजीवनाचा यज्ञविधी!
अग्नीदेवास मी वानी
यज्ञाचा तो पुरोहित
होता रत्नविराजित
अग्नी जुन्या ऋषींनी
अन् वानावा नवख्यांनिही।।
अग्नी गाता कवी सत्य कृती
कीर्तीमनोहर देवां घेऊन देव ये
अग्ने आम्ही तुला रोज मनोभावे
दिशीनिशी वंदने नमन करु।।
आपल्या भारतीय संस्कृतीत जवळजवळ प्रत्येक सण-सोहळे हे आरोग्य, समृद्धी, संतती, संरक्षण आणि संकट निवारणासाठी, देवतांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निर्माण झाले आहेत. सर्वांचा संबंध हा ऋतुपरिवर्तन आणि कृषीजीवनाशी निगडीत आहे. होळी हा सण देखील नवीन धान्याच्या यज्ञसमर्पणाचा विधी मानला गेला आहे. अग्नीला समर्पित करताना म्हटल्या जाणा-या काही ऋचांची माहिती येथे देत आहे...
झळाळे, राखतो यज्ञ,
न्यायाची ज्योत जागवी
वाढता आमच्या घरी अग्ने
बाप जसा बाळां,
छान भेटी आम्हास दे
सोबती सुखदायी हो।।
प्राचीनकाळी शिशिराच्या शेवटी शेतामध्ये पीक तयार झाल्यावर 'सस्येष्टी' नावाचा एक कृषीयज्ञ केल्या जात असे. आपल्या शेतातील धान्याचा काही भाग अग्नीला अर्पण करण्याचा तो विधी होता. त्याचेच आजचे स्वरूप होळी असावे, असे अभ्यासक मानतात. फाल्गुन पौर्णिमेला वैश्यदेव पर्वाच्या पवित्र अग्नीमध्ये भाजल्या जाणा-या अन्नाला 'होलक' म्हणतात, त्याचाच अपभ्रंश 'होलिकोत्सव' झाला असावा, असे डाॅ. द. ता. भोसले यांनी एका ठिकाणी नमूद केले आहे. केवळ भारतातच नव्हे तर स्वीडन, जपान, जर्मनी, चीन अशा अनेक कृषीप्रधान देशांमध्ये याप्रकारचा विधी साजरा केल्या जातो. इटलीमध्ये 'फ्लोरा' या अन्नदेवतेला आवाहन करण्यासाठी अग्नी पेटविण्याची प्रथा आहे.
काळोखी वाटेने पुन्हा येतो
देवां माणसांना घरदार देतो
सोन्याच्या रथात त्रिलोकां पहात
सवितासूर्यदेव आम्हांपाशी येतो
जगातल्या सर्व देशातील आदिम टोळ्यांनी जशी अग्नीपूजा केली आहे तशीच सूर्यदेवाचीही आराधना केलेली आहे. अग्नीच्या सान्निध्यात राहिलो तर हिंस्त्र श्वापदांपासून संरक्षण होते, ऊब मिळते, प्रकाश मिळतो, तिच ऊब, तोच प्रकाश सूर्यदेवामुळेही मिळते. या कृतज्ञतेतून हा भाव व्यक्त होतो.
आठी उजळल्या दिशा धरणीच्या
तिन्ही लोक आणि समुद्र सातही
सोनियांच्या डोळां सूर्यदेव आला
यजमानांना थोर रत्नराशी देई।।
अग्निवर भाजलेल्या अन्नाला रूची असते आणि ते पचनास हलके असते, म्हणून अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुरू झाला,"होलिकोत्सव"! सूर्यानं कुंभ राशीत प्रवेश करण्याचा काळ हा बीजारोपणाचा काळ मानल्या जातो. फाल्गुन महिन्यात सूर्य आणि पृथ्वीच्या मिलनातून धनधान्य समृद्धी व्हावी, हा या उत्सवाचा मुख्य उद्देश! सुफलीकरण आणि प्रजनन यासाठी साजरा होणारा उत्सव!
यासाठी स्वच्छ जागेवर यक्षदेवतेचे प्रतीक म्हणून 'एरंडाचा सोट' उभा करून सुकलेले लाकूड - पालापाचोळा अग्नीला अर्ग्नीला अर्पण करण्याची प्रथा होती. पूर्वी त्यात शेणगोळ्याचे विविध आकार करून माळ अर्पण केल्या जायची. हा 'होलाष्टकोपनिषद्' विधी कशासाठी? तर जमिनीच्या उत्पादन क्षमतेला मारक असणा-या अनिष्ट शक्तींना दूर सारणासाठी! त्यातूनच सुरू झाल्या,"होळीच्या बोंबा"!
संक्रांतीचे घेते सुगडं
आली पुनवेची दुघड
पुनवच्या आल्या ओंब्या
शिमगा लय देई झोंब्या
शिमग्याचा गुलाल
आला पडावा दलाल...
अग्नीची पूजा झाल्यावर मातीचा, भूमीचा जो उत्सव साजरा होतो त्याचे सुंदर वर्णन लोकगीतांमध्ये आहे. या भागात वेदांतील प्रकाशपूजक ऋचांचे मराठीकरण जाणलेत.
आता कडाडेल ऊन
ऐकू येई सारीकडे
सखे होळीची ग धून
होळी... फाल्गुन पौर्णिमेला साजरा होणारा उत्सव! एक लोकोत्सव! अग्नी पूजेशी संबंधित उत्सव! हा आहे कृषीजीवनाचा यज्ञविधी!
अग्नीदेवास मी वानी
यज्ञाचा तो पुरोहित
होता रत्नविराजित
अग्नी जुन्या ऋषींनी
अन् वानावा नवख्यांनिही।।
अग्नी गाता कवी सत्य कृती
कीर्तीमनोहर देवां घेऊन देव ये
अग्ने आम्ही तुला रोज मनोभावे
दिशीनिशी वंदने नमन करु।।
आपल्या भारतीय संस्कृतीत जवळजवळ प्रत्येक सण-सोहळे हे आरोग्य, समृद्धी, संतती, संरक्षण आणि संकट निवारणासाठी, देवतांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निर्माण झाले आहेत. सर्वांचा संबंध हा ऋतुपरिवर्तन आणि कृषीजीवनाशी निगडीत आहे. होळी हा सण देखील नवीन धान्याच्या यज्ञसमर्पणाचा विधी मानला गेला आहे. अग्नीला समर्पित करताना म्हटल्या जाणा-या काही ऋचांची माहिती येथे देत आहे...
झळाळे, राखतो यज्ञ,
न्यायाची ज्योत जागवी
वाढता आमच्या घरी अग्ने
बाप जसा बाळां,
छान भेटी आम्हास दे
सोबती सुखदायी हो।।
प्राचीनकाळी शिशिराच्या शेवटी शेतामध्ये पीक तयार झाल्यावर 'सस्येष्टी' नावाचा एक कृषीयज्ञ केल्या जात असे. आपल्या शेतातील धान्याचा काही भाग अग्नीला अर्पण करण्याचा तो विधी होता. त्याचेच आजचे स्वरूप होळी असावे, असे अभ्यासक मानतात. फाल्गुन पौर्णिमेला वैश्यदेव पर्वाच्या पवित्र अग्नीमध्ये भाजल्या जाणा-या अन्नाला 'होलक' म्हणतात, त्याचाच अपभ्रंश 'होलिकोत्सव' झाला असावा, असे डाॅ. द. ता. भोसले यांनी एका ठिकाणी नमूद केले आहे. केवळ भारतातच नव्हे तर स्वीडन, जपान, जर्मनी, चीन अशा अनेक कृषीप्रधान देशांमध्ये याप्रकारचा विधी साजरा केल्या जातो. इटलीमध्ये 'फ्लोरा' या अन्नदेवतेला आवाहन करण्यासाठी अग्नी पेटविण्याची प्रथा आहे.
काळोखी वाटेने पुन्हा येतो
देवां माणसांना घरदार देतो
सोन्याच्या रथात त्रिलोकां पहात
सवितासूर्यदेव आम्हांपाशी येतो
जगातल्या सर्व देशातील आदिम टोळ्यांनी जशी अग्नीपूजा केली आहे तशीच सूर्यदेवाचीही आराधना केलेली आहे. अग्नीच्या सान्निध्यात राहिलो तर हिंस्त्र श्वापदांपासून संरक्षण होते, ऊब मिळते, प्रकाश मिळतो, तिच ऊब, तोच प्रकाश सूर्यदेवामुळेही मिळते. या कृतज्ञतेतून हा भाव व्यक्त होतो.
आठी उजळल्या दिशा धरणीच्या
तिन्ही लोक आणि समुद्र सातही
सोनियांच्या डोळां सूर्यदेव आला
यजमानांना थोर रत्नराशी देई।।
अग्निवर भाजलेल्या अन्नाला रूची असते आणि ते पचनास हलके असते, म्हणून अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुरू झाला,"होलिकोत्सव"! सूर्यानं कुंभ राशीत प्रवेश करण्याचा काळ हा बीजारोपणाचा काळ मानल्या जातो. फाल्गुन महिन्यात सूर्य आणि पृथ्वीच्या मिलनातून धनधान्य समृद्धी व्हावी, हा या उत्सवाचा मुख्य उद्देश! सुफलीकरण आणि प्रजनन यासाठी साजरा होणारा उत्सव!
यासाठी स्वच्छ जागेवर यक्षदेवतेचे प्रतीक म्हणून 'एरंडाचा सोट' उभा करून सुकलेले लाकूड - पालापाचोळा अग्नीला अर्ग्नीला अर्पण करण्याची प्रथा होती. पूर्वी त्यात शेणगोळ्याचे विविध आकार करून माळ अर्पण केल्या जायची. हा 'होलाष्टकोपनिषद्' विधी कशासाठी? तर जमिनीच्या उत्पादन क्षमतेला मारक असणा-या अनिष्ट शक्तींना दूर सारणासाठी! त्यातूनच सुरू झाल्या,"होळीच्या बोंबा"!
संक्रांतीचे घेते सुगडं
आली पुनवेची दुघड
पुनवच्या आल्या ओंब्या
शिमगा लय देई झोंब्या
शिमग्याचा गुलाल
आला पडावा दलाल...
अग्नीची पूजा झाल्यावर मातीचा, भूमीचा जो उत्सव साजरा होतो त्याचे सुंदर वर्णन लोकगीतांमध्ये आहे. या भागात वेदांतील प्रकाशपूजक ऋचांचे मराठीकरण जाणलेत.
आला बहर पळसा
आता कडाडेल ऊन
ऐकू येई सारीकडे
सखे होळीची ग धून...
लोकभाषेत ज्याला शिमगा म्हणतात, तो रंगाचा उत्सव! मदनोत्सव! रंगोत्सव! होळी पाठोपाठ येणारा सण! बहिणाबाईची म्हणते,
"किती रंगविशी रंग,
रंग भरले डोळ्यात,
माझ्यासाठी शिरीरंग,
रंग खेळे आभाळात!"
रंग म्हटला की चटकन् नजरेसमोर उभा राहतो तो केशरी रंगाने बहरलेला पळसवृक्ष! ज्याच्या फुलांना 'अगीनफुलं' म्हणण्याचा मोह व्हावा, असा हा वृक्ष! त्याच्या सावलीत भगवान बुद्धांचा जन्म झाला, असे मानले जाते. ज्याला लोकजीवनात 'संतवृक्षा'ची उपमा दिली जाते तो पळसवृक्ष...
वाटे वरचा परस, शेंडीले कोवळा
लेकी देऊन सोयरा, पिताजी माझा
वाटेवरचा परस, शेंडीले पिकला
लेकी देऊन चुकला पिताजी माझा
वाटेवरचा परस, वाटुल्या पानांचा
सखा निष्ठूर मनाचा, बंधूजी माझा
ढाक, पलास, चलचा, कांकराई, किनक पलाशी, ब्रम्हवृक्ष...अशा विविध नावांनी ओळखल्या जाणा-या या पळसाच्या फुलांपासून नैसर्गिक रंगनिर्मिती केली जाते. याची सखी म्हणून जिचा उल्लेख साहित्यात येतो ती आहे, 'काटेसावर'! पूडिया आदिवासी नवीन गाव किंवा वस्ती उभारताना मध्यभागी हा वृक्ष लावतात नि मग आजुबाजूला वस्ती वाढवत नेतात.
गाव जळे
सावर रडे
परस म्हनते
का सावरी रडे?
माझा आहे आता आट
का गेला सावरी तुझा काट?
माझी वाक 'अवसते'
माझा खांदाही अवसते
फुलही अवसते
पानही अवसते
आन् काडीही अवसते
या लोकगीतातील वर्णनाप्रमाणे पळसाचा प्रत्येक भाग हा औषधी उपयोगाचा आहे. अगदी लचक भरण्या पासून तर पदर जाण्यापर्य॔त अनेक आजारांवर उपयोगी असणारा हा वृक्ष आहे.
शिमगा दे लांबा झोंबा
या शिमग्याची गाठी
अखोजी आली पाठी
सणावारांना गुंफणारी ही लोकगीतं आठवलीत ती होळीच्या निमित्ताने...! लोकगीतातील होळी आणि पळसाचे उल्लेख आठवलेत आणि जाणवलं की, भूमीच्या सुफलीकरणासाठी सुरू झालेल्या या कृषी उत्सवाचे आज आपण काय केले? मुळात पर्यावरणाच्या रक्षणासाठीचा हा विधी...! या विधीला आज जे संहारकरूप प्राप्त झाले आहे त्यावर सर्वांना गंभीरतेनं विचार करायला हवा, असे वाटत नाही का?
आता कडाडेल ऊन
ऐकू येई सारीकडे
सखे होळीची ग धून...
लोकभाषेत ज्याला शिमगा म्हणतात, तो रंगाचा उत्सव! मदनोत्सव! रंगोत्सव! होळी पाठोपाठ येणारा सण! बहिणाबाईची म्हणते,
"किती रंगविशी रंग,
रंग भरले डोळ्यात,
माझ्यासाठी शिरीरंग,
रंग खेळे आभाळात!"
रंग म्हटला की चटकन् नजरेसमोर उभा राहतो तो केशरी रंगाने बहरलेला पळसवृक्ष! ज्याच्या फुलांना 'अगीनफुलं' म्हणण्याचा मोह व्हावा, असा हा वृक्ष! त्याच्या सावलीत भगवान बुद्धांचा जन्म झाला, असे मानले जाते. ज्याला लोकजीवनात 'संतवृक्षा'ची उपमा दिली जाते तो पळसवृक्ष...
वाटे वरचा परस, शेंडीले कोवळा
लेकी देऊन सोयरा, पिताजी माझा
वाटेवरचा परस, शेंडीले पिकला
लेकी देऊन चुकला पिताजी माझा
वाटेवरचा परस, वाटुल्या पानांचा
सखा निष्ठूर मनाचा, बंधूजी माझा
ढाक, पलास, चलचा, कांकराई, किनक पलाशी, ब्रम्हवृक्ष...अशा विविध नावांनी ओळखल्या जाणा-या या पळसाच्या फुलांपासून नैसर्गिक रंगनिर्मिती केली जाते. याची सखी म्हणून जिचा उल्लेख साहित्यात येतो ती आहे, 'काटेसावर'! पूडिया आदिवासी नवीन गाव किंवा वस्ती उभारताना मध्यभागी हा वृक्ष लावतात नि मग आजुबाजूला वस्ती वाढवत नेतात.
गाव जळे
सावर रडे
परस म्हनते
का सावरी रडे?
माझा आहे आता आट
का गेला सावरी तुझा काट?
माझी वाक 'अवसते'
माझा खांदाही अवसते
फुलही अवसते
पानही अवसते
आन् काडीही अवसते
या लोकगीतातील वर्णनाप्रमाणे पळसाचा प्रत्येक भाग हा औषधी उपयोगाचा आहे. अगदी लचक भरण्या पासून तर पदर जाण्यापर्य॔त अनेक आजारांवर उपयोगी असणारा हा वृक्ष आहे.
शिमगा दे लांबा झोंबा
या शिमग्याची गाठी
अखोजी आली पाठी
सणावारांना गुंफणारी ही लोकगीतं आठवलीत ती होळीच्या निमित्ताने...! लोकगीतातील होळी आणि पळसाचे उल्लेख आठवलेत आणि जाणवलं की, भूमीच्या सुफलीकरणासाठी सुरू झालेल्या या कृषी उत्सवाचे आज आपण काय केले? मुळात पर्यावरणाच्या रक्षणासाठीचा हा विधी...! या विधीला आज जे संहारकरूप प्राप्त झाले आहे त्यावर सर्वांना गंभीरतेनं विचार करायला हवा, असे वाटत नाही का?
No comments:
Post a Comment