किस्त्रीम च्या यंदाच्या दिवाळी अंकात पान १९वर "गूढ भाषा लोपडू खंडू" या नावाचा कॅ आनंद बोडस ,मुंबई ,यांचा लेख आहे।बेळगांव परिसराजवळच्या घनदाट दुर्गम जंगलातल्या,जेमतेम ७०-८० लोकसंख्या असलेल्या मानवी समूहाची खंडू ही भाषा आहे।या भाषेत तामिळ तेलगू मराठीची सरमिसळ असावी असं वरकरणी वाटायचं पण तसं नसून ती स्वतंत्र स्वयंभू भाषाच आहे।तिच्या गुप्ततेबाबत हा समूह प्रचंड आग्रही आणि committed आहे।एका भाषातज्ज्ञाने त्यांच्यात मिसळण्याचा प्रयत्न करुन, त्यांच्या नकळत,काही गाणी संवाद ध्वनिमुद्रित करुन अभ्यास सुरु केला।आणि आश्चर्यकारकपणे त्याचा गूढ मृत्यु झाला।विशेष म्हणजे सगळी ध्वनि मुद्रणंही नाहिशी झाली।
हे लिहिणारे बोडस सर विज्ञानप्रेमी,चिकित्सक,अभ्यासू ;नऊ वेगवेगळ्या ग्रंथांचे लेखक; आणि Indian Airforce मधले निवृत्त वैमानिक आहेत,हे आवर्जून लक्षात घ्यायलाच हवं।त्यांना रेल्वे प्रवासात या समूहातल्या एका स्त्रीकडून योगायोगानी काही गुणगुणणं ऐकता आलं।ते जमेल तसं त्यांनी लिपीबध्द केलं।अर्थात् त्या स्त्री ची ,चेन्नादिवडी तिचं नाव;तिची परवानगी घेऊनच।"एकाही शब्दाचा अर्थ विचारणार नाही आणि मी आहे तोवर कुठेही याची वाच्यता करणार नाही"असं वचन त्या स्त्रीने आधी घेतलं होतं,हे ही महत्वाचं।गाडीतून उतरताना चेन्नादिवडीने आचार्य अत्रैंच्या भेटीची आठवण सांगून " he was a great man" असं इंग्रजीत म्हणून बोडसांची विकेट घेतली।
मी लेख वाचून बोडसांना फोन केला।त्यांनी ही विस्तृत पणे याबद्दल माहिती दिली।"मग दिवाळी अंकात कशी काय दिली चेन्नादिवडीची कविता?"असं मी विचारलंच।तर ते म्हणाले,की "Chennadiwadi is no more now."मला खात्रीलायक बातमी मिळाल्यावरच मी लिहिलं,कारण मी वचनबध्द होतो।"किती काळ वचन पाळलं ?"असं विचारल्यावर म्हणाले ,,"२२वर्ष"!!!!!!!
Fb ला हे शेअर करु का म्हटलं तर म्हणाले" कविता सोडून " !!!
" का?" विचारलं तर म्हणाले "विषाची परीक्षा पाहू नये"।
आणखीनही काही आश्चर्यकारक उल्लेख लेखात आहेत।ते आणि कविता तुम्ही अंकातच वाचा मित्रांनो।कारण मी बोडसांशी committed आहे।..
No comments:
Post a Comment