Wednesday, February 6, 2019

टाळी,एक उत्स्फूर्त दाद

मराठीत टाळी,हिंदीत ताली आणी इंग्रजीत clap . अवघा दोन अक्षरी शब्द. पण हया दोन अक्षरी शब्दात  एक अनोखी जादू आहे.एखाद्याला प्रसन्न करणयाची,एखाद्याला प्रेरणा देणयाची,एखाद्याकडून दाद मागणयाची.टाळी हया छोटयाशा शब्दात त्याचं स्वतःच असं एक संगीतआहे.एक लय आहे.टाळया कुठे,कुठे आणी किती प्रकारे वाजवलया जातात,हे बघणे देखील मोठे गंमतीशीर आहे बरं का.
 'दे टाळी'! खूप जणांना टाळी मागायची सवय असते.आपलया म्हणणयाला दुजोरा मिळवणयासाठी अशी टाळी मागितली जाते. आणी टाळी देणाराही तितकाच उस्ताही असेल तर मग दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद विचारायलाच नको.  
 
   ."अमुक अमुक साठी एकदा जोरदार  टाळया झालया पाहिजेत"  किवा " तालियाँ बजती रेहेनी चाहिए!" अशा प्रकारच्या टाळया हया प्रेक्षक वर्गाकडून दाद मागणयासाठी,कलाकारांचा उस्ताह वाढवणयासाठी मागितलया जातात. रसिक वर्गही तितकाच दर्दी असेल तर मग टाळयांच्या कडकडाटात प्रेक्षाग्रुह दणाणून जातं. टाळयांचा वर्षाव हा कलाकारांना आनंद सागरात चिंब भिजवणयासाठी असतो जणू.
      आपण सर्वसाधारणपणे कोणत्याही सांसंस्कृतिक कार्यक्रमाला जातो,,तेव्हा त्यातील एखाद्या उत्स्फूर्त कलेसाठी नकळतपणे टाळया वाजवलया जातात.मग ते एखाद्या गायक/गायिकेनं गायलेलं गीत असो,एखाद्या नर्तक/नर्तकीनं सादर केलेला नृत्याचा मनमोहक अविष्कार असो,चित्रपट,नाटकातील,अभिनेत्याचा सर्वोक्रुष्ट्र अभिनय असो वा दर्जेदार संवाद असोत----हया सगळयासाठी  उत्स्फूर्तपणे टाळया वाजवलया तात.थोडक्यात  काय तर 'टाळी' हा मनापासून आवडलेलया  गोष्ठीसाठी  दाद देणयाचा एक        प्रकार आहे.
     एखाद्या  जातिवंत कलाकारासाठी तर टाळी हे एक वरदानही आहे आणी शाप देखील. टाळी ही कलाकाराच्या उत्तम कामासाठी(कलेसाठी) श्रोते,      ,प्रेक्षक हयांच्याकडून मिळालेली पसंतीची पोच पावती असते.,जी त्याच्यासाठी प्रेरणादायी ठरत असते.त्याचा उत्साह  द्विगुणित करते. त्याचं मनोबल वाढवते.हया द्रुष्ठीने वरदान,आणी शाप अशा अर्थाने, की एकदा का प्रसिद्धीचं  गारुड मनावर चढलं की त्याचीही नशा व्हायला लागते. कलाकार त्यातून सहजासहजी बाहेर पडू शकत नाही.टाळी ची 'झिंग' नसानसात भिनायला लागली की तो त्याच्या आहारी जातो.तो अर्थात,त्याच अपेक्षेने  त्याची कला सादर करण्याचा प्रयत्न करतो. 
कालांतराने श्रोते,प्रेक्षक हया वर्गाची अभिरुची बदललया मुळे म्हणा किवा कलेच्या अविष्कारात कमतरता भासलयामुळे म्हणा,अपेक्षा पूर्ण न झालयास तो नैराशये कडे झुकू लागतो. 

     असो. तर टाळी हया प्रकाराकडे आपण फक्त सकारात्मक द्रुष्टीनेच पाहू या.
टाळी हे एक प्रकारचं वाद्य आहे.हातांचा सहभाग असलेलं एक अनुपम वाद्य. 'टाळी एका हाताने कधी वाजत नाही,' असेही बऱ्याचदा बोलले जाते.अर्थात,ते उपरोधानेच अधिकत:बोलले जाते.चूक काय एकाचीच असेल?अशा अर्थाने.नकारात्मक भाव वगळला तर एक सुंदर अर्थ हया वाक्यामागे दडला आहे.कसा तो पहा. टाळी एका हाताने कधी वाजत नसते,पण ती जेव्हा दोनही हातांनी वाजते,तेव्हा 'नमस्काराची' गतिशील मुद्रा समजली जाते.

पंडित रवि शंकरजी, कुमार गंधर्व,भिमसेन जोशी,किशोरी आमोणकर सारखी असामान्य कलाकार मंडळी,ह्यांच्याप्रति हे तंतोतंत लागू होईल. दोन्ही हातानी तबला वाजवणारे झाकीर हुसेनजी,दैवी आवाजाची देणगी लाभलेली  गान सरस्वती लता दीदी,दर्जेदार काव्य निर्मिती करणारे गुलजार जी-----ही यादी खूप मोठी होईल.अशा व्यक्तिमत्व असलेल्यां न साठी जेव्हा टाळ्या वाजवलया जातात,तेव्हा त्या टाळी चा अर्थ,आपण त्यांच्या कलेपुढे नतमस्तक झालेलो असतो,हाच आहे. 

      टाळी चा एक सर्वसंमत आणि सर्वानाच ज्ञात असलेला प्रकार म्हणजे 'आरतीच्या 'प्रसंगी वाजवली जाणारी टाळी. ह्यात आरतीच्या लयी नुसार टाळी ची देखील लय बदलते बरं का.प्रत्येकाची आरतीसाठी वाजवली जाणारी टाळी, अर्थात पद्धत वेगळी असू शकते.ह्या सगळ्या प्रकारातून अगदी भिन्न असा एक प्रकार म्हणजे मनोमन वाजवली जाणारी टाळी. प्रत्यक्षात टाळी वाजवली जात नसली तरी मनापासून दाद दिली जाते काही ठिकाणी.आपण एखाद्या चित्र-संग्रहालयात जातो,आर्ट गॅलरी ला भेट देतो,तेव्हा एखादी अप्रतिम मूर्तिकला,शिल्पकला किंवा चित्रकला पाहून "वाह"! अशी आपल्याही नकळत मनोमन दाद दिलीच जाते. एखादे पुस्तक वाचल्यानंतर ते जर खूप आवडले,मनाला भिडले तर आपण उद्गारतो,"सुरेख,मस्त"! "काय कमाल लिहिलंय"!"व्वा!" ही एक प्रकारे  अप्रत्यक्षरीत्या वाजवलेली टाळी च नाही का? आपण निसर्गाच्या सानिध्यात असलो तर जाणवेल कीं झाडांची पाने देखील टाळ्या वाजवीत असतात. जेव्हा एक पान दुसऱ्या पानाला भिडते, तेव्हा,"पत्ते बजा रहे थें ताली---"अशी  काव्यपंक्ती तयार होते.

      टाळी मौन स्वरूपात वाजवली जावी,असाही आग्रह असतो  काही ठिकाणी.रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतन मध्ये कोणत्याही कार्यक्रमा च्या मध्ये किंवा शेवटी टाळ्या वाजवलया जात नाहीत.त्या ऐवजी "साधु-साधु" असे म्हटले जाते.समशेर बहादूरसिंग च्या कविता ऐकताना एखादी रचना,एखादी ओळ कितीही आवडली तरी कुणीही टाळी वाजवत नाहीत. काही कलाकृती अशाच असतात,ज्या ठिकाणी "मौन" हीच खरी दाद असते. ऐकणारा,पाहणारा जर तल्लीन होऊन आत्मभान विसरत असेल तर टाळी ची गरजच भासत नाही . असो. 
        तर टाळी हा आनंद,आवड व्यक्त करण्याचा एक उत्स्फूर्त प्रकार आहे,हे तर सिद्ध झालं च आहे,पण तो एक योगा प्रकारही आहे .जोरजोराने टाळ्या वाजवल्याने व्यक्ती आनंदी होऊ शकते,असे म्हणतात . दोन्ही हातांचे एकमेकांवर घर्षण होतं, तेव्हा एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते,जी माणसाच्या मनोवृत्तीत बदल घडवू शकते. 

       लहान मूल जेव्हा चालायला शिकतं, पहिलं  पाऊल टाकतं, पहिला शब्द उच्चारत,तेव्हा घरातील मंडळी आनंदाने टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहित करतात. एखाद्या तिसऱ्या व्यक्ती साठी (जी आपली कुणीही नाही) टाळी वाजवणं म्हणजे मनाचा मोठेपणा. तेव्हा,चांगल्या गोष्टींसाठी,जिथे जिथे आवश्यक आहे,तिथे तिथे टाळी वाजवायला विसरू नका. मनापासून दाद द्यायला कधी कचरू नका.

No comments:

Post a Comment