Wednesday, February 6, 2019

गो गोवा ...

तनु दिवाळीत अकोल्याला येणार नाही हे कळल
मग लक्ष्मीपूजनाची तिला सुट्टी म्हणुन त्यादिवशी सांगली अन पुढे गोआ ,असा प्लान आखला .लगेच रिझर्वेशन  केलेत .सांगली वास्को कन्फर्म नव्हत ते कन्फर्म झाल.रात्रि 9.30 ची ट्रैन होती ,4 तास लेट झाली ,इतक्या रात्रि रिक्शा मिळणार कसा ,कारण लक्ष्मीपूजनाचा दिवस !
शेवटी अस ठरवल ,दुसऱ्या दिवशी संगीता ताई पुणयाहुन गोआ ला जाणार होती ,रस्ता तोच होता फ़क्त कोल्हापुर पर्यन्त जाव लागणार होत ,ते तनु नी सोडून दिल अस सगळा द्राविडिप्राणायाम करून एकदाचे गोव्याला पोचलो.
इंदाच घर टेकड़ीवर ,सभोवती दाट झाड़ी ,घराच्या बाजूला सुगंध पसरवणारा चाफ़ा अन त्यालागत निळेशार पाणी असलेला स्विमिंग पूल ! आहाहा ! पाहुनच दिल खुश झाला.

आम्ही सगळे ,आई बाबा, तिघि बहिणी, जावई ,बच्चा पार्टी खुप दिवसांनी एकत्र जमलो होतो अपवाद फ़क्त तनु अन साकेत चा! पुढचे चार दिवस गप्पा आणि भटकंति मधे  कसे गेले कळल नाही.
गर्दीचे प्रसिद्ध बीच सोडून अनवट ,बीचेस ला जायच अस आम्ही ठरवल होत.
बम्बोलीन ,अंजुना ,बतालबेट्टीम ,सिरिदाओ ,सगळे बीचेस तर सुंदरच होते पण बीच कड़े जाणारे रस्ते  सुद्धा प्रेक्षणीय होते .अरुंद,नागमोड़ी वळणाचे रस्ते आणि दुतर्फ़ा पाम ,नारळची झाड़ ! सिरिदाओ बीच तर आम्हाला अचानक दिसला अन तीथला नयनरम्य सूर्यास्त बघता आला.
प्रसिद्ध असलेल्या पैकी फ़क्त बागा बीच ला गेलो ,तिथे सकाळी 6 ला पण गर्दी होती अन  कचरा पण खुप होता .सिरिदाओ बीच वर शंख शिम्पले खुप होते ,अंजुना बीच खडकाळ होता ,बम्बोलीन शांत ,गंभीर ,तर बतालबेट्टीम ,ओहोटी असल्यामुळे की काय ओढग्रस्त माणसा सारखा वाटला. कुठे पांढरी शुभ्र बारीक वाळू तर कुठे सोनेरी वाळू ,एकच समुद्र पण प्रत्येक किनारा वेगळा ! एकाच माणसाची आपण परिस्थिति नुसार वेगवेगळी रूप बघतो तस काहीस हे वाटल.
एक मात्र प्रकर्षाने जाणवल आपल्या इथल्या बीचेस पेक्षा परदेशतले बीचेस कैकपटीनी स्वच्छ आहेत.अर्थात त्यानी समुद्राच्या विशाल सौंदर्यात काही फरक पडत नाही.किनारयापालिकडला तो अथांग जलसमुदाय आपल्याच मस्तीत असतो.ओहोटी मुले आलेला कचरा भरतीच्या वेळी किनारयावर टाकून स्वतः निर्मळ राहणाऱ्या समुद्राच मला कायमच आकर्षण वाटत आल आहे.

बीच इतकच प्रसिद्ध आहे गोव्याच नाईट लाइफ अन कैसिनो.यावेळी नाईट क्लब ला जायच च अस ठरऊनआलो होतो.रात्रि 10 ला तयार होऊन निघलो ।कबाना क्लब ला गेलो तो बंद पडला अस कळल ,मग LKP क्लब ला गेलो ,तिथे फ़क्त 18 ते 30 वयापर्यन्त एंट्री होती ,श्रिया ,वेद वगळता आम्ही सगळे 40 + होतो.LKP क्लब नी पहिल्यांदाच आमचा वय झाल्याची जाणीव करून दिली.पण आम्ही हार जाणार नव्हतो.आमचा मोर्चा टीटोस क्लब कड़े वळला ,अरुन्द गल्लीत असलेला हा क्लब अतिशय फेमस आहे. तिथे गेलो तर बाहेरपर्यंत गाड्यांची इतकी रांग होती ,की तिथे पोचायला सकाळ उजाडली असती.शेवटी 10- 12 km.भटकून रात्रि 12 ला  लौटके बद्दू घर को आये !

दिवाळीच्या सुटयांमुळे गोव्याला खूपच गर्दी होती ,कुठेही गेल तरी ट्रैफिक जाम ठरलेलाच  ,स्थानिक लोकांचे काय हाल होत असतील देव जाणे.
गोव्यात टूरिस्ट ची गर्दी होण्याच अजुन एक कारण म्हणजे तिथे सहज आणि स्वस्त मिळणारी दारू !
पाण्यासारखी दारू मिळते म्हंटल तरी चालेल.जागोजागी वाइन शॉप्स आहेत ,एका शॉप मधे तर मालक बाई होत्या ,त्या सहजतेने गिऱहाइकाला हवा तो ब्रांड काढून देत होत्या.
गोआ आहे मात्र निःसंशय सुंदर .सगळे रस्ते ,अगदी आतल्या भागातल्या रसत्यंनवर ही खड्डे नव्हते .दुतर्फ़ा दाट झाड़ी अन त्यातून डोकावणारी कौलारू घर.आपल्या इकडली गांव कशी एकमेकांपासून फटकुन असतात ,तस इथे नाही ,इथली गांव एकमेकांच्या गळ्यात गळे घालून नांदतात.गांव अस संपतच नाही. याच मुख्य कारण म्हणजे मांडवी अन झुआरी या विशाल पात्र असलेल्या नदया आणि अरबी समुद्र !
पाण्याचा विस्तार खुप असल्याने गावाचा विस्तार व्हायला जागाच नाही  ,त्यामुळे इथली गांव एकमेकात गुम्फ्लेली आहेत.गावचा जो भाग  टेकड़ीवर आहे, जस इंदाच घर पोर्वोरिम मधे टेकड़ीवर ,तर तो भाग आल्टो पोर्वोरिम ,अन टेकडीखालच गांव बतिम पोर्वोरिम.याच पोर्वोरिम मधे चार्ल्स शोभराज ला जिथे पकड़ल ते .हॉटेल o' coquerio  आहे.तिथे अजुन एक गंमत दिसली ,शेवटी आलेल्या 'म' च उच्चार तीथले लोक करत नाहीत ,पोर्वोरिम ला परी म्हणायचे ,दाबोलिम तिथला एयरपोर्ट त्याला दबोली म्हणतात.

आम्ही गोव्याला गेलो ते दीवाळीत पण तिथे फ़क्त नरकचतुर्थी ला मुख्य दिवाळी असते.नरकासुराचे पुतले बनउन रात्र भर मिरवणूक काढतात अन सकाळी त्याच दहन करतात.बाकी दिवशी फटाके नाहीत रोषणाई नाही ,खरेदीची लगबग नाही ,एकदम शांत होत सगळीकडे.
4 दिवस खुप भटकलो ,जीवाच गोआ केल पण मन भरल नाही.नाईट क्लब रहिलाच आहे त्यामुळे परत गोव्याला येणार अस इंदा ला सांगून गोव्याचा निरोप घेतला

No comments:

Post a Comment