"जायते अस्मात लीयन्ते अस्मिन्" म्हणजे 'यातूनच निर्माण होते आणि यातच विलीन होते, असे काय? तर ते आहे पाणी! आपल्या आयुष्यात पाणी जर नसेल तर? कधी विचार केला आहे? पाण्याशिवाय जीवन, ही कल्पनाच आपण करू शकत नाही कारण पाणी म्हणजेच जीवन आहे. हे पाणी पृथ्वीवर आलं कसं? ते इथे नांदलं कसं? यापैकी एकही प्रश्न आपल्या मनात एकदा तरी निर्माण झाला आहे? कदाचित हो किंवा कदाचित नाही! पण पाणी आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, हे नक्की! जीवसृष्टीचा तो जन्मदाता आहे. सूर्यमालेत आणि संपूर्ण विश्वात प्रवास करणा-या शेपटीवाल्या धूमकेतूंनी हे पाणी आणलं, असं मानलं जातं. पृथ्वीवर पाणी आलं पण त्याचं नक्की वय कुणालाच सांगता येत नाही. पृथ्वीवरचं त्याचं स्थान आणि रूप बदलत राहिलं पण त्याला बाहेर पडणं शक्य नसल्यामुळे ते निर्माण झाल्यापासून आजपर्यंत आहे तितकंच आहे. काय दचकलात? पण हे खरं आहे. हो. खरंच! मी माझ्या मनचं सांगत नाही हो...!ही माहिती लिखित स्वरूपात आहे. केवळ हीच नव्हे तर अशी आश्चर्यचकित करणारी आणखी बरीच माहिती, अभिजित घोरपडे यांच्या 'पाणी ते पाणी' या पुस्तकात आपल्याला मिळते. हे पुस्तक वाचतो तेंव्हा आपण पाण्यापासून पाण्यापर्य॔तचा म्हणजेच जीवनापासून जीवनापर्य॔तचा लयबद्ध प्रवासच करतो. हा प्रवास मला इतका आवडला आहे की मी तो तिस-यांदा केला आहे. अर्थात तिनदा तेच पुस्तक काही काही दिवसाच्या अंतराने वाचलं आहे. प्रत्येकवेळी मला या पुस्तकानं नवं ज्ञानच दिलं आहे. अगदी सामान्य माणसाला कळेल अशा पद्धतीने पाण्याचं शास्त्र यात उलगडलं आहे. एकंदर सात विभाग आणि 46 प्रकरणांचं, 200 पानाचं हे पुस्तक हातात धरताना 'चुळूकभर पाणी' असतं आणि वाचून संपतं तेव्हा शोध असतो,'पाण्याच्या पर्यायांचा'!
या मधल्या संपूर्ण प्रवासात पाणी आणि पाणीच विविध त-हेनं आपल्या सोबत असतं. ते औषध असतं, बहुरूपी होतं, ते शस्त्र असतं किंवा मनोरंजनाचं साधन असतं. पाण्याचा शोध असो की प्रवाह असो अथवा जल व्यवस्था असो की जलवाहतूक पाण्याच्या थेंबाचा इतिहास, वर्तमान आणि त्याचं भविष्य सोप्या भाषेत लेखकानं मांडलेलं आहे. पाणी जीवसृष्टीचा जन्मदाता आहे पण त्यानं ही जीवसृष्टी टिकविण्याची जबाबदारीही स्वतःकडेच घेतली आहे. ती कशी? ते उलगडून सांगतं हे पुस्तक!
मानवाप्रमाणेच प्राणी, पक्षी यांच्याही जीवनात पाण्याचं महत्त्व आहे. तसंच ते आवश्यक आहे, वनस्पतींना! आपण मोठाले वृक्ष बघतो. त्यावर, खोडांवर वर्तुळं दिसतात. ती कशाची असतात? ती वर्तुळं झाडाचं वय तर सांगतातच पण त्याचबरोबर त्या-त्या वर्षी झाडाला पुरेसं पाणी मिळालं की नाही, याचीही साक्ष देतात. उन्हाळ्यात झाडांची पानगळ होते कारण झाडांची पानं सर्वात जास्त पाणी उडवून लावतात म्हणून पाणी राखण्यासाठी झाडं पानांचाच त्याग करतात. आहे नं शिकण्यासारखं? निसर्ग आम्हाला वस्तूचं मोल शिकवत असतो, म्हणतात ते खरंच आहे. निवडुंगाच्या झाडाचंच बघा नं? पाण्याचं होणारं नुकसान टाळण्यासाठी निवडुंग पानाचं रूपांतर काट्यामध्ये करतं आणि म्हणून जवळपास वर्षभर पुरेल एवढं पाणी निवडुंगाच्या खोडामध्ये असतं.
पाण्याचा एक गुणधर्म म्हणजे ते चिकट असतं. नाही विश्र्वास बसत नं? तर लगेच हात धुऊन या किंवा एखादं भांडं विसळून या आणि बघा. दिसलं? हं...पाणी हाताला, भांड्यांना चिकटलेलं दिसलं नं. या त्याच्या चिकटपणाच्या गुणधर्मांमुळे ते पेशींना चिकटतं आणि त्यामुळे पोषक घटक मिळतात. पाणी औषधाचं काम पण करतं, बरं का! एक साधा नि आपल्याला आवडणारा उपचार हे पाणी करत असतं. ते म्हणजे, वजन कमी किंवा जास्त करणे. कसं? तर जेवणाच्या प्रारंभी पाणी प्यायल्यास कृश होतो. जर जेवणाच्या मध्ये पाणी प्यायलो तर सडपातळ होतो. आणि जेवणाच्या शेवटी पाणी प्यायले तर स्थूल होतो. आहे नं गंमत! डोकेदुखीसाठी रामबाण उपाय म्हणजे पुरेसं पाणी पिणं!
पाणी हत्यार म्हणून कसं वापरलं गेलं त्याच्या शहाजीराजे, शिवाजीराजेंच्या काळातल्या ऐतिहासिक नोंदी आणि त्याच तंत्राचा भारतीय लष्करानं 1965 च्या युद्धात केलेला वापर, याबद्दलची माहिती वाचताना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात.
पृथ्वीवर 71% पाणी आहे पण वापरण्या योग्य फार थोडं आहे. लेखक उदाहरण देताना सांगतात की 1000 बादल्या पाणी आहे पण वापरण्यास उपयुक्त ठरेल असं पाणी किती? तर फक्त दोन पेले! ही निसर्गाची विषमता अधोरेखित करत लेखक आपल्याला पाण्याच्या अनोख्या विश्र्वात घेऊन जातात. त्यातून हत्ती, मधमाशी, पक्षी, माकडं यांच्या पाणी शोधण्याच्या पद्धती, वराह-मिहिरच्या,'बृहत् संहिते'तील जांभूळ, उंबर, अर्जुन, पळस, वड, पिंपळ वगैरे झाडांवरून पाण्याचा शोध घेण्याच्या पद्धती कळतात.
या पुस्तकात दिलेलं जलव्यवस्थेचं उदाहरण आजही उपयोगी ठरेल असंच आहे. पांजरा नदीच्या खो-यातील फड पद्धतीने पाण्याचं समान वाटप कसं केलं जातं, ते आपल्याला कळतं. तसंच विहिरी खणणं आणि त्याद्वारे भूजलाचा वापर करणं जगाला भारतानेच शिकविलं, ही माहिती वाचताना अभिमान वाटतो. आजही देशात सुस्थितीत असणा-या ऐतिहासिक विहिरी, बारवा, बाव, आड, पुष्करणी आहेत त्याबद्दल सांगत पाणपोईचा (नावाचा) इतिहास विशद करत पुढच्या टप्प्यावर हे पुस्तक आपल्याला घेऊन जातं. आता इतकी माहिती सांगितल्यावर पुढे काय नवे असणार? असा आपण विचारच करत असतो तोवर 'पानी तेरे कितने नाम?' तर आपल्यासमोर येतात जवळपास 175 नावं! कोणती आहेत ही नावं? तर,
पोषण करतं म्हणून 'जीवन', जीवसृष्टीचा जन्मदाता म्हणून 'भुवनम्', शुद्ध करतं म्हणून 'शुध', औषध आहे म्हणून 'भेषजम्', तृप्त करतं म्हणून 'तृप्तिः', पृथ्वीवर मुक्कामी असतं म्हणून 'कुश', देशोदेशी विहार करतं त्यामुळे 'ऋत', पाणी स्वतः वहात जातं म्हणून 'वाणीः', खळखळाट करत जातं म्हणून 'सलिलम्', आवाज करतं म्हणून 'बृबूक', अशी अनेकविध वैशिष्ट्य सांगणारी पाण्याची नावं या पुस्तकातून आपल्याला कळतात.
केवळ नावंच नव्हे तर प्राणीमात्रांच्या पाणी पिण्याच्या त-हा आणि त्या तशा का आहेत याची शास्त्रीय कारणं सुद्धा यात सांगितली आहेत. आता हेच बघा, पक्षी चोच बुडवून पाणी तोंडात घेतात नि मग मान वर करून घशाखाली घालतात. कारण त्यांना गुरूत्वाकर्षणाविरूद्ध पाणी आत ढकलता येत नाही. शाकाहारी पक्षी पाणी शोषून घेऊ शकतात तर हिंस्त्र प्राणी लपलप करून जिभेनं पाणी पितात. असं हे पाणीविश्व आपल्यासमोर मांडताना साहित्यातलं पाणी आणि पूर्व - पश्चिम दोन्हीकडचा पाणी वापर नि पाण्याकडे पाहण्याचा फरक देखिल लेखकानं मांडला आहे. ऋग्वेदात ते आहे. मेघदूतात तर त्याचा प्रवास उत्तम वर्णन केला आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्यांमध्ये पाण्याचं दर्शन घडतं. तसंच ते एकनाथ, चोखामेळा, रामदास आदी संतांच्या रचनांमध्ये ते आहे. बहिणाबाईची बोली कविता असो की पाडगावकर, बोरकर, महानोरांची कविता असो पाणी त्यात आहेच. कवितेत ते जसं आहे तसं म्हणींमध्ये साचून राहिलं आहे. मराठी गाण्यात असो की हिंदी चित्रपट गीतांमध्ये पाणी कसं जनमानसात खोलवर रूजलं नि सामावलं आहे, ते यात उदाहरणासह आलं आहे.
पाण्याचा रंग नि ढंग सांगणारं हे पुस्तक आगळंवेगळं म्हणावं असंच आहे. आणखी बराच मोठा आणि महत्वपूर्ण खजिना यात आहे. पण सगळंच इथे सांगितलं तर पुस्तक वाचण्याची गंमत काय उरणार? 2012 साली 'पाणी ते पाणी' पुस्तक वाचकांसमोर आले. कोणत्याही प्रस्तावनेशिवाय किंवा कुठल्याही शिफारसीशिवाय लेखक, अभिजित घोरपडेंनी हे पुस्तक वाचकाच्या हातात दिले आहे. नवी नि उपयुक्त माहिती यातून वाचकांना मिळते.
नेहमी कोणतंही पुस्तक हातात घेऊन वाचताना एकच भावना मनात असते, अक्षरांशी मैत्री! कारण या अक्षरमैत्रीनेच विचारांशी नातं जुळतं आणि हे नातं जुळतं तेव्हाच जगणं सुंदर होतं! या सौंदर्याच्या शोधात नवनवी पुस्तकं हातात येतात. काही वाचताना झरकन् निसटून जातात. काही रेंगाळतात तर काही मात्र मनात घर करतात. असंच मनात स्थान मिळविणारं हे पुस्तक 'संस्कृतीचा पट आपल्यासमोर मांडतंच पण निसर्गाचं गाणंही शिकवितं'. ते ऐकत, वाचत आपण पुढे जायचंय.
या मधल्या संपूर्ण प्रवासात पाणी आणि पाणीच विविध त-हेनं आपल्या सोबत असतं. ते औषध असतं, बहुरूपी होतं, ते शस्त्र असतं किंवा मनोरंजनाचं साधन असतं. पाण्याचा शोध असो की प्रवाह असो अथवा जल व्यवस्था असो की जलवाहतूक पाण्याच्या थेंबाचा इतिहास, वर्तमान आणि त्याचं भविष्य सोप्या भाषेत लेखकानं मांडलेलं आहे. पाणी जीवसृष्टीचा जन्मदाता आहे पण त्यानं ही जीवसृष्टी टिकविण्याची जबाबदारीही स्वतःकडेच घेतली आहे. ती कशी? ते उलगडून सांगतं हे पुस्तक!
मानवाप्रमाणेच प्राणी, पक्षी यांच्याही जीवनात पाण्याचं महत्त्व आहे. तसंच ते आवश्यक आहे, वनस्पतींना! आपण मोठाले वृक्ष बघतो. त्यावर, खोडांवर वर्तुळं दिसतात. ती कशाची असतात? ती वर्तुळं झाडाचं वय तर सांगतातच पण त्याचबरोबर त्या-त्या वर्षी झाडाला पुरेसं पाणी मिळालं की नाही, याचीही साक्ष देतात. उन्हाळ्यात झाडांची पानगळ होते कारण झाडांची पानं सर्वात जास्त पाणी उडवून लावतात म्हणून पाणी राखण्यासाठी झाडं पानांचाच त्याग करतात. आहे नं शिकण्यासारखं? निसर्ग आम्हाला वस्तूचं मोल शिकवत असतो, म्हणतात ते खरंच आहे. निवडुंगाच्या झाडाचंच बघा नं? पाण्याचं होणारं नुकसान टाळण्यासाठी निवडुंग पानाचं रूपांतर काट्यामध्ये करतं आणि म्हणून जवळपास वर्षभर पुरेल एवढं पाणी निवडुंगाच्या खोडामध्ये असतं.
पाण्याचा एक गुणधर्म म्हणजे ते चिकट असतं. नाही विश्र्वास बसत नं? तर लगेच हात धुऊन या किंवा एखादं भांडं विसळून या आणि बघा. दिसलं? हं...पाणी हाताला, भांड्यांना चिकटलेलं दिसलं नं. या त्याच्या चिकटपणाच्या गुणधर्मांमुळे ते पेशींना चिकटतं आणि त्यामुळे पोषक घटक मिळतात. पाणी औषधाचं काम पण करतं, बरं का! एक साधा नि आपल्याला आवडणारा उपचार हे पाणी करत असतं. ते म्हणजे, वजन कमी किंवा जास्त करणे. कसं? तर जेवणाच्या प्रारंभी पाणी प्यायल्यास कृश होतो. जर जेवणाच्या मध्ये पाणी प्यायलो तर सडपातळ होतो. आणि जेवणाच्या शेवटी पाणी प्यायले तर स्थूल होतो. आहे नं गंमत! डोकेदुखीसाठी रामबाण उपाय म्हणजे पुरेसं पाणी पिणं!
पाणी हत्यार म्हणून कसं वापरलं गेलं त्याच्या शहाजीराजे, शिवाजीराजेंच्या काळातल्या ऐतिहासिक नोंदी आणि त्याच तंत्राचा भारतीय लष्करानं 1965 च्या युद्धात केलेला वापर, याबद्दलची माहिती वाचताना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात.
पृथ्वीवर 71% पाणी आहे पण वापरण्या योग्य फार थोडं आहे. लेखक उदाहरण देताना सांगतात की 1000 बादल्या पाणी आहे पण वापरण्यास उपयुक्त ठरेल असं पाणी किती? तर फक्त दोन पेले! ही निसर्गाची विषमता अधोरेखित करत लेखक आपल्याला पाण्याच्या अनोख्या विश्र्वात घेऊन जातात. त्यातून हत्ती, मधमाशी, पक्षी, माकडं यांच्या पाणी शोधण्याच्या पद्धती, वराह-मिहिरच्या,'बृहत् संहिते'तील जांभूळ, उंबर, अर्जुन, पळस, वड, पिंपळ वगैरे झाडांवरून पाण्याचा शोध घेण्याच्या पद्धती कळतात.
या पुस्तकात दिलेलं जलव्यवस्थेचं उदाहरण आजही उपयोगी ठरेल असंच आहे. पांजरा नदीच्या खो-यातील फड पद्धतीने पाण्याचं समान वाटप कसं केलं जातं, ते आपल्याला कळतं. तसंच विहिरी खणणं आणि त्याद्वारे भूजलाचा वापर करणं जगाला भारतानेच शिकविलं, ही माहिती वाचताना अभिमान वाटतो. आजही देशात सुस्थितीत असणा-या ऐतिहासिक विहिरी, बारवा, बाव, आड, पुष्करणी आहेत त्याबद्दल सांगत पाणपोईचा (नावाचा) इतिहास विशद करत पुढच्या टप्प्यावर हे पुस्तक आपल्याला घेऊन जातं. आता इतकी माहिती सांगितल्यावर पुढे काय नवे असणार? असा आपण विचारच करत असतो तोवर 'पानी तेरे कितने नाम?' तर आपल्यासमोर येतात जवळपास 175 नावं! कोणती आहेत ही नावं? तर,
पोषण करतं म्हणून 'जीवन', जीवसृष्टीचा जन्मदाता म्हणून 'भुवनम्', शुद्ध करतं म्हणून 'शुध', औषध आहे म्हणून 'भेषजम्', तृप्त करतं म्हणून 'तृप्तिः', पृथ्वीवर मुक्कामी असतं म्हणून 'कुश', देशोदेशी विहार करतं त्यामुळे 'ऋत', पाणी स्वतः वहात जातं म्हणून 'वाणीः', खळखळाट करत जातं म्हणून 'सलिलम्', आवाज करतं म्हणून 'बृबूक', अशी अनेकविध वैशिष्ट्य सांगणारी पाण्याची नावं या पुस्तकातून आपल्याला कळतात.
केवळ नावंच नव्हे तर प्राणीमात्रांच्या पाणी पिण्याच्या त-हा आणि त्या तशा का आहेत याची शास्त्रीय कारणं सुद्धा यात सांगितली आहेत. आता हेच बघा, पक्षी चोच बुडवून पाणी तोंडात घेतात नि मग मान वर करून घशाखाली घालतात. कारण त्यांना गुरूत्वाकर्षणाविरूद्ध पाणी आत ढकलता येत नाही. शाकाहारी पक्षी पाणी शोषून घेऊ शकतात तर हिंस्त्र प्राणी लपलप करून जिभेनं पाणी पितात. असं हे पाणीविश्व आपल्यासमोर मांडताना साहित्यातलं पाणी आणि पूर्व - पश्चिम दोन्हीकडचा पाणी वापर नि पाण्याकडे पाहण्याचा फरक देखिल लेखकानं मांडला आहे. ऋग्वेदात ते आहे. मेघदूतात तर त्याचा प्रवास उत्तम वर्णन केला आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्यांमध्ये पाण्याचं दर्शन घडतं. तसंच ते एकनाथ, चोखामेळा, रामदास आदी संतांच्या रचनांमध्ये ते आहे. बहिणाबाईची बोली कविता असो की पाडगावकर, बोरकर, महानोरांची कविता असो पाणी त्यात आहेच. कवितेत ते जसं आहे तसं म्हणींमध्ये साचून राहिलं आहे. मराठी गाण्यात असो की हिंदी चित्रपट गीतांमध्ये पाणी कसं जनमानसात खोलवर रूजलं नि सामावलं आहे, ते यात उदाहरणासह आलं आहे.
पाण्याचा रंग नि ढंग सांगणारं हे पुस्तक आगळंवेगळं म्हणावं असंच आहे. आणखी बराच मोठा आणि महत्वपूर्ण खजिना यात आहे. पण सगळंच इथे सांगितलं तर पुस्तक वाचण्याची गंमत काय उरणार? 2012 साली 'पाणी ते पाणी' पुस्तक वाचकांसमोर आले. कोणत्याही प्रस्तावनेशिवाय किंवा कुठल्याही शिफारसीशिवाय लेखक, अभिजित घोरपडेंनी हे पुस्तक वाचकाच्या हातात दिले आहे. नवी नि उपयुक्त माहिती यातून वाचकांना मिळते.
नेहमी कोणतंही पुस्तक हातात घेऊन वाचताना एकच भावना मनात असते, अक्षरांशी मैत्री! कारण या अक्षरमैत्रीनेच विचारांशी नातं जुळतं आणि हे नातं जुळतं तेव्हाच जगणं सुंदर होतं! या सौंदर्याच्या शोधात नवनवी पुस्तकं हातात येतात. काही वाचताना झरकन् निसटून जातात. काही रेंगाळतात तर काही मात्र मनात घर करतात. असंच मनात स्थान मिळविणारं हे पुस्तक 'संस्कृतीचा पट आपल्यासमोर मांडतंच पण निसर्गाचं गाणंही शिकवितं'. ते ऐकत, वाचत आपण पुढे जायचंय.
No comments:
Post a Comment