नूकतीच दार्जिलिंग, पेलिंग आणि गंगटोक अशी भटकंती by road केली . सिलिगुडी ते दार्जिलिंग मग दार्जिलिंग ते पेलिंग आणि पेलिंग ते गंगटोक या संपूर्ण प्रवासात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे स्वच्छ नद्या आणि रस्ते त्याचबरोबर अतिशय शिस्तबद्ध वाहतूक !
आपण नेहमीच भारत केव्हा सुधारेल? या प्रश्नावर तावातावाने चर्चा करतो आणि कृती मध्ये आणताना थोडी कचुराई च करतो . मात्र निसर्गाने भरभरून दिलेलं जंगल , डोंगर ,दऱ्या आणि नद्यांच दान सिक्कीम मधील रहिवासी ,स्थल सेना आणि सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांनी अद्याप टिकून आहे .राज्य परिवहन तसेच Border Road Organisation यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत डोंगर पोखरून बांधलेले रस्ते बघितले की जागेचं महत्व पटतं कारण एक बाजूने जरी डोंगर असला तरी दुसरीकडे खोल दरी आणि खडकातून खळाळत वाहणारी नदी आ वासून असतेच . त्याच बरोबर दर ५०-१०० फुटावरून वळसे घेणाऱ्या डोंगरासोबत रस्ता जिथे वळतो तिथे अधिकच चिंचोळा रस्ता तयार होतो. त्यामुळे एका वेळी कोणत्याही एकाच बाजूने वाहन पुढे जाऊ शकत . अशा वेळी ड्रायव्हर च्या संयमाची परीक्षाच असते . मात्र सिलिगुडी सोडल्याबरोबर 10 किलोमीटर अंतरावर सुरू झालेल्या घाटातुन जातांना पहिले आम्हाला कळेच ना की गाड्यांच्या एका बाजूने रांगा असतांना दुसरी बाजू खूप वेळ रिकामी असूनही एकाही ड्रायव्हर ने ओव्हरटेक केले नाही उलट शांतपणे वाहतूक सुरू होण्याची वाट बघत होते. आणि हीच शिस्त पुढील पूर्ण प्रवासात चाकोचाकी आपलं पदोपदी
दिसून आली. आपल्या शहरात इंच इंच जागेसाठी वाहतुकी दरम्यान लढवल्या जाणाऱ्या लढाया आठवल्या. कुणी "ए दिखता नही क्या .....जरा रुक नही सकता क्या.. अंधा है क्या.... रस्ता तुझ्या बापाचा आहे का"...इत्यादी प्रेमळ ?संवाद आपण रोजच अनुभवतो....
पण सिक्कीम ला आल्यापासून आम्ही चक्क या लढायांना मुकलो
प्रत्येक गाडीवान जर अरुंद रस्त्यावर पुढे आला असेल आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्याला मागे सरकायला (रिव्हर्स घ्यायला) जागा नसेल तर गुमान आपली गाडी बिनदिक्कत २५ -५० फूट रिव्हर्स घेतो आणि दुसऱ्याला विनासंवाद जागा देतो .बरं असंही नाही की तिथे cctv कॅमेरा लावलेला असतो
आता याला काय म्हणावं?
एवढंच नाही तर मला असं वाटत होतं की मी योग्य प्रकारे कचरा निर्मूलन करते पण आमच्या ड्रायव्हर ने माझे डोळे उघडले जेव्हा मी कणीस खाऊन झाल्यावर उरलेलं फोलपट जंगलातील रस्त्याच्या किनाऱ्याला भिरकावले कारण माझा समज होता की ते bio-degradable असतं आणि त्याच खत तयार होतं मग मी झाडात फेकलं तरी चालेल पण ड्रायव्हर जोरदार ओरडला "अरे ये क्या कोर रोही है मॅडम? गाडी मे dustbeen है उशमे डॉलीये" मला आश्चर्याचा धक्का बसला ,तरी स्वतःच ज्ञान पाजळण्यासाठी मी त्याला फोलपट फेकण्याचे कारण सांगितले . तेव्हा "यहा ऐशा नोही होता मॅडम ,यहा हम कायदे से ही चोलता है. कचरा कोई भी हो dustbeen मे ही डॉलना पडेगा. हम उसको बाद मे घर जॉके बराबर डॉलेगा ,और वैसा भी याहा मेरे गाडी से कचरा फेकने से २०००/- रुपया fine लॉगेगा" मी "यहा कौन देखेगा" पुन्हा माझे अ
ज्ञान प्रगट केले . त्यावर तो शांतपणे म्हणाला "मै" आता मात्र मला सुशिक्षित नक्की कोण ? हा प्रश्न पडला
आणि कळलं की पुस्तकातील नागरिकशास्त्र शिकण्यापेक्षा ,दैनंदिन व्यवहारात ते आणायला हवं
🏼
पूर्वेकडील नद्या अगदी उन्हाळ्यात सुद्धा छान खळाळत वाहताना बघितल्या तसेच घनदाट हिरवी झाडे बघितली .प्रत्येक अंगणात ,गॅलरी मध्ये सुंदर रंगबिरंगी फुलांच्या किमान २५-५० कुंड्या बघितल्या .एकाही घराला कुंपण नव्हते ,तरीही सगळी फुले (अगदी गुलाबाची सुद्धा ) झाडावर टिकून होती अन मनात आलं , स्थानिक लोकांना पाण्याची ,फुलांची आणि झाडांची चिंताच करायला नको . पाण्याची मुबलकता असल्याने इथल्या स्त्रियांना पाणी वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नसावा .म्हणून एवढी फुलझाडे टिकवू शकतात. पण हाही माझा गोड गैरसमजच होता ,कारण संपूर्ण प्रवासात जागोजागी फलक लावलेले होते "पानी की हर बुंद किमती है उसें बाचाईए","पेड लगाइये ,पेड बाचाईए" . आणि हा संदेश प्रत्येक नागरिक आज्ञाधारकपणे पाळतो . स्त्रिया कमीत कमी पाण्यात आपली दैनंदिन कामे उरकत असतात .कष्टाने आजूबाजूच्या झऱ्यावरून पाणी आणून काळजीपूर्वक वापरतात ,एवढेच नाही तर आपल्यासारख्या प्रवाश्यांना "नल जलदी बंद कॉरो मॅडम" असे सांगायला विसरत नाहीत कारण तिथे घरोघरी आपल्यासारखी नळाची सोयच नाही . ज्यांना परवडत ते म्हणजे हॉटेल्स व्यवसायी ,त्यांनी आपल्यापुरती बारीकशी पाईप लाईन घेतलेली असते ,ती सुद्धा रस्ते न फोडता इलेक्ट्रिक वायर सारखी हवेतून
.
आपल्या नद्या वर्षातून 10 महिने कोरड्या असतात आणि आपण आठवड्यातून एकदा नळाचे पाणी आले की ते अगदी बश्या ,चमच्यात साठवून ठेवू का असा प्रयत्न करतो आणि पुढल्या वेळी नळ आला की खुशाल आधीचे पाणी शिळे झाले म्हणून फेकून देतो . जेवढ्या वेळ नळ आलेला असेल तेवढ्या वेळात नळाची तोटी बंद केली तर जणू पाप लागेल की काय असे वाटून गाड्या,आंगण एवढेच काय रस्ते सुध्दा धुवून काढतो
🏼 हे आठवून लाज वाटली.
आपल्या शहरात सुशिक्षित लोकांना वाहतुकीचे नियम तोडून भांडताना , मनात येईल तिथे कचरा फेकताना,रस्त्यात दुसऱ्यांच्या अंगावर फवारे उडवून थुंकताना ,दुसऱ्यांच्या अंगणातील फुले फांद्या तुटेपर्यंत ओरबाडून नेतांना,पाण्याचा अपव्यय करतांना आपण नेहमीच बघतो . यापुढे मात्र मी खजील होणार हे नक्की
🏼
No comments:
Post a Comment