यावर्षी सूर्याने एप्रिल मधेच डोळे वटारले.44 डिग्री खुप झालं न!आत्ताच कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जाऊन याव असा विचार केला.नाहीतरी मे मधे कुठे जायला जमणार नव्हतच.
करनाल चंडीगढ़ ला काम होत,लगे हाथ शिमला जायच ठरवल.
स्वितझरलैंड अन कश्मीर ला जाऊन आल्यावर शिमला जाण्यात काहीच मतलब नाही अस बरेच जणानी सूचवल पण सध्या तरी आमच्या आवाक्यात तेवढच होत.
1 दिवस करनाल च काम केल.दुसऱ्या दिवशी 9 पर्यन्त चंडीगढ़ ला पोचायच होत कारण शिमला ला जाणार चॉपर 10 ला होत।ट्रैफिक जाम असला तर 3 तास लागतील म्हणून सकाळी 6 ला निघालो।पण रस्ता इतका क्लियर होता कि 7.30 लांच पोचलो।
उगाच चॉपर च बुकिंग केल याच टैक्सी नी पुढे गेलो असतो तर 10 पर्यन्त शिमल्याला पोचलो पण असतो।अस दोघानीही बोलून दाखवल."मिले सूर मेरा तुम्हारा" होण्याचं मुख्य कारण म्हणजे चॉपर बद्दल असलेली भीति हे होत!
चॉपर चा पहिलाच प्रवास म्हणून उत्सुकता,होती आणि चॉपर चे वारंवार होणाऱ्या ऍक्सीडेंट बद्दल वाचून भीति ही वाटत होती।हिमाचल प्रदेश टूरिझम नी सुरु केलेल हे चॉपर पवनहंस कंपनीच आहे।सुरुवातीला बरेच वेळा टुरिस्ट अभावी रद्द व्हायच पण आता मात्र एक जरी टूरिस्ट असला तरी चॉपर जात.
सामनाबरोबर आमच ही वजन विचारल।सामान 10 kg.प्रत्येकी घेता येणार होत.बोर्डिंग पास घेऊन टॅक्सी नी दूर उभ्या असलेल्या चॉपर कड़े गेलो।
चॉपर 11 सीटर होत ,त्यामानाने जागा खूपच कमी वाटली .पण जाणारे आम्ही चारच होतो त्यामुळे ऐसपैस बसता आल। थोड्या वेळात पायलट आलेत,त्यात एक मॅडम होत्या.बापरे! या चालवणार चॉपर!पण दूसऱ्याच क्षणी ,भीतीपोटी का होईना असा विचार आपल्या मनात आला याची खुप लाज वाटली.
काही बटन्स खाटकुट करुन त्यानी चॉपर सुरु केल.वरचा पंखा जोरजोरात फिरायला लागला।त्याचा आवाज इतका जास्त होता कि हेडसेट(तिथे ठेवलेच होते) लावण्याशिवाय पर्याय उरला नाही।10- 15 मि.चॉपर जागेवरच उभ होत. त्याच्या आवाजाचा अन डिझल च्या वासाचा त्रास व्हायला लागला।,एक विमान लँड झाल ,एक चॉपर गेल,मग आमच्या चॉपर नी उडडान केल।
खालचा नजारा अगदी स्पष्ट दिसत होता।चंदीगढ़ प्लॅनड सिटी असल्याने स्केल नी आखल्यासारखी दिसत होती। दोनच मि.सीमेंट च जंगल संपून निसर्गाच राज्य सुरु झाल। नजर पोचेल तिथपर्यंत गर्द हिरव्या झाडीनी आच्छादलेले डोंगर ,त्यामधुन जाणारी नागमोडी वाट,आणि मधे मधे दिसणारी ,लाल हिरवे छत असलेली एकट दुकट घर! इतक सुंदर दिसत होत सगळ की डीझल च्या वासानी आणि पंख्याच्या आवजानी होणार त्रास विसरून गेले।
अक्षरशः 11 मि.शिमल्याला पोचलो (तसा 3-4 तासाचा प्रवास आहे)। पण चॉपर चा प्रवास एकंदरीत सुखकारक वाटला नाही. ऑटो मधे बसून अकोल्याच्या रस्त्यावर फिरतांना कस वाटेल तसं वाटत होतं।
शिमला च एयरपोर्ट म्हणजे टूमदार घरच आहे। बाहेर आलो।आमच रॅडिसन ब्लू होटल तिथुन 20 km.होत।आमच्याबरोबर चॉपर मधे असलेले एक जण बाहेर कोणाची तरी वाट बघत थांबले तर अजुन एक मुलगा होता तो कधी निघुन गेला कळलच नाही।टॅक्सी नि होटल कड़े निघालो।
हिमाचल प्रदेशाच 'देवभूमी' हे नाव सार्थ ठरवणार तो प्रवास होता। अंतर 20 km.होत तरी प्रत्यक्षात पाऊण तास लागला।रस्ता पूर्ण डोंगरातून होता, देवदार वृक्षांच दाट जंगल सगळीकडे होत,मधून मधून छोटे धबधबे डोकावत होते।लाल हिरव्या रंगाचे छत असलेल्या बिल्डिंगस त्यात उठून दिसत होत्या। उत्सुकतेपोटी ड्रायव्हर ला विचारलं तेंव्हा त्यांनी सांगितलं,इथल्या महानगरपालिकेने आदेश देऊन सगळे ऑफिसेस अन घरांचे छत लाल किंवा हिरवे रंगवायला सांगितले आहेत। ज्यामुळे एकसंधता येईल,वरून जर बघितलं तर हिरवे झाड आणि बर्फाच्चदित डोंगर याच्या पार्श्वभूमीवर लाल हिरवी घर ,हे दृश्य टुरिस्ट ना आनंद देईल।हा हेतू निश्चितच सफल झाला अस म्हणावं लागेल।
ड्रायव्हर ला दुसऱ्या दिवशी च्या टॅक्सी बुकिंग बद्दल विचारल ,तो म्हणाला मी गावातुन येईन तर जास्त पैसे लागतील ,तुम्ही हॉटेल जवळन टैक्सी घ्या स्वस्त पडेल।तिथे काय काय बघण्यासारखं आहे हे पण त्यांनी व्यवस्थित सांगितलं.युनियन लीडर चा नं.पण दिला। तिथे टैक्सी यूनियन खुप स्ट्रांग आहे,व्यवस्थित नंबर लागलेले असतात।टूरिस्ट प्लेस असूनही कुठेही लूटपाट वाटली नाही।
होटल ला पोचलो ,लॉबी मधेच आमच्या बरोबर चॉपर मधे असलेला मुलगा दिसला(चेक इन ला वेळ होता) अरेरे! हा पण इथेच येणार कळल असत तर टॅक्सी शेयर केली असती।मला,फक्त मलाच खुप हळहळ वाटली (middle class mentality u know!)
हॉटेल एकदम छान होत,रूम मधे जायला 2 लिफ्ट अन 2 जिने उतरून जाव लागल।इथे सगळीकडे असच आहे ,डोंगरातून एकच रस्ता जातो ,त्याच्या वर बिल्डिंग्स अन उतारावर पण बिल्डिंग्स !त्यामुळे पायऱ्या चढन उतरण हे तिथल्या लोकांच्या जीवनातील अविभाज्य अंग आहे।
होटल छानच होत ,रूम मधल्या भल्या मोठ्या काचेतुन दिसणार दृश्य खिळऊन ठेवणार होत।
जेवण ,थोडा आराम करुन मॉल रोड ला निघालो। तिथे जायला पण दोनं लिफ्ट बदलून जाव लागत ।
मॉल रोड हे तीथल मध्यवर्ती गजबजलेल ठिकाण। मॉल रोड, रिज रोड च्या 1 लेवल खाली त्याला समांतर
आहे। स्कॅडल पॉईंट ला दोन्ही रस्ते मिळतात।
हे बघून ,दोन मैत्रीणी,एक बंधाऱ्यावरुंन चालतेय अन दूसरी तिचा हात धरुन खाली रस्त्यावरुंन चालतेय, वरून चालणारी मैत्रीण मधेच उडी मारून खाली उतरते,अस दृश्य डोळयांसमोर आलं।
अम्बुलन्स व्यतिरिक्त कोणतेही वाहन मॉल रोड वर येऊ शकत नाही।त्यामुळे लोक तिथे आरामात फिरत असतात। तिथे अनेक शॉप्स रेस्टॉरेंट्स ,कॅफ़े आहेत ।हेच मेन मार्केट असल्याने टूरिस्ट बरोबरच स्थानिक लोकांनी पण हा गजबजलेला असतो। ठिकठिकाणी बसायला बेंचेस आहेत ।नुसत तिथे बसलो तरी छान वेळ जाईल इतक ते ठिकाण हैपनिंग आहे।
सुभाष च गुडघा थोड़ा दुखायला लागल्याने आम्ही बराच वेळ बसलो होतो।टूरिस्ट आणि स्थानिक लोक यांच नकळत निरीक्षण केलं,दोघांमधला फरक लगेच कळत होता। थंडी असूनही उघड़े वाघडे कपड़े घालून टूरिस्ट हिंडत होते।गोऱ्यापान,सरळ नाक ,साधा सलवार सूट ,स्वेटर ,घातलेल्या तीथल्या बायकांच पहाड़ी सौंदर्य चटकन नजरेत भरत होत।हिमाचली लोक म्हणजे 'mountain version of punjabi 'अस कुठंतरी वाचल्याचं आठवलं।
परत चालायला लागलो ,स्कॅडल पॉइंटला जिथे रिज आणि मॉल रोड मिळतात तिथे पोचलो।
एक भारतीय महाराजा अन ,ब्रिटिश ऑफीसर ची मुलगी तिथुन पळून गेले ,म्हणून त्याच नाव स्कॅडल
पॉइंट!फक्त त्या स्पॉट ला नाव ते दिलय बघण्यासारखं काही नाही तिथे।
रिज रोड फिरून पायऱ्यांनी खाली उतरू अस ठरवलं।(मॉल रोड च्या सुरुवातीला लिफ्ट आहे तर रिज च्या सुरुवातीला पायऱ्या आहेत)
रिज वर मॉल रोड च्या मानानी कमी गर्दी असते।म्युनसिपल कॉर्पोरेशन ,फायर ब्रिगेड ,पोस्ट ऑफिस असे मुख्यत या रोड वर आहेत।तसेच 1857 मधलं एक चर्च आणि खूप जुनी लायब्ररी पण आहे।थोडं पुढे गेल्यावर एका उंच स्तंभावर मोठ्ठा भारतीय ध्वज फडकताना दिसतो।तिथेच एका इमारतीच्या गॅलरी मधे पोलीस बँड वाजत होत।
एका मोठ्या डोंगरावर हनुमानाची भली थोरली मूर्ती उठून दिसत होती ,ती एवढी मोठी आहे की सिमल्या मधे कुठूनही ती नजरेस पडते। विचारल्यावर कळलं ते जाखु टेम्पल आहे ।हनुमान संजीवनी बुटी घेऊन जाताना इथे थांबला होता। कुफ्रि जिथे बर्फ बघायला मिळाला असता अन जाखु टेम्पल ला आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार होतो।
मॉल रोड आणि रिज च वातावरण एन्जॉय करत आम्ही आरामात फिरत होतो ।पण सुभाष चा गुडघा आता खूपच दुखायला लागला ,त्याला पाऊल ही पुढे टाकवेना। तिथेच एक मेडिकल स्टोअर मधून गोळ्या आणि मलम घेतलं।लिफ्ट नी जायला बरंच चालावं लागलं असत ,कारण आम्ही पायऱ्यांच्या जवळ पोचलो होतो ।कसंबसं पायऱ्या उतरून खाली आलो।टॅक्सी नी हॉटेल ला पोचलो।तिथे विनंती करून पाहिले रूम बदलून घेतली ,कारण आमच्या रूम ला जायला दोन जिने उतरावे लागणार होते।आता 2 लेवल ला रूम शिफ्ट केली .तिथे फक्त लिफ्ट नि जाता येत होता।
रूम मध्ये आल्यावर ,पुढे काय करायचं याच विचारचक्र सुरू झालं।
दुखणं वाढलं होतं, अचानक कशामुळे झालं कळायला मार्ग नव्हता।अजून एक दिवस सिमला आणि दोन दिवस चंदीगड असा आमचा टूर होता।पण आता तिथे थांबण्यात काहीच अर्थ नव्हता। दुसऱ्या दिवशी 11 च्या चॉपर च बुकिंग मिळत का बघितलं ,11 सीटस दाखवत होतें पण 'बुकिंग बंद 'असं येत होता। ते मिळाल्याशिवाय पुढचे बुकिंग करता येत नव्हत। अचानक सुभाष ला हुडहुडी भरली ,रूम पूर्ण बंद ,फॅन, ac काहीच सुरू नव्हतं ,दोन दुलया टाकल्या तरी हुडहुडी थांबली नाही। एका परिचितांकडे या हुडहुडी मुळे घडलेला अनर्थ आठवला आणि अजूनच टेन्शन आलं।थोड्या वेळात थंडी वाजण बंद झालं पण सुभाष ला प्रचंड थकवा आला.मी आता झोपतो उद्या सकाळी बघू काय करायचं ते ,अस म्हणून तो 7 लाच गाढ झोपून गेला ।मला मात्र बराच वेळ झोप आली नाही।रात्री ताप चढला तर काय करायचं,अजून काही त्रास झाला तर!असे अनेक विचार मनात येत होते,।मन चिंती ते वैरी न चिंती, म्हणतात ते अगदी खरंय ।अशा विचारांच्या आवर्तात काधितरी झोप लागली।
सकाळी दोघांनाही लवकरच जाग आली।गुडघा दुखत होताच।परत चॉपर च बुकीग बघितलं। बुकिंग होत नव्हतं,11 सीट रिकाम्या असूनही! ।HP टूरिझम च्या साईट वर 1 फोन न.दिला होता ,तो लावला पण कोणीच उचलला नाही।
शेवटी टॅक्सी नि जावं असं ठरवल।,3 साडे तीन तास लागले असते।काउंटर वर टॅक्सी साठी फोन केला।तर कळलं 10 शिवाय टॅक्सी मिळणार नाही।शाळेच्या मुलांना सोडून टॅक्सिवाले स्टँड वर जमतात, आणि मग न.प्रमाणे बुकिंग होत। 10 ला निघालो तर चंदीगड ला 1 ला पोचू तिथून दिल्ली फ्लाईट 2 च होत,त्याआधी 1 तास रिपोर्टिंग !त्यामुळे फ्लाइट मिळणं कठीण होतं। मग ठरवलं चंदीगड ला तर पोचू ,तिथे मुक्काम करून मग दुसऱ्या दिवशी दिल्ली ला निघू।
तेवढयात ज्या नं. वर फोन केला होता,त्यावरून फोन आला। तुम्ही एअरपोर्ट वर या ,चोप्पेर च बुकिंग मिळून जाइल! तो फोन आल्यावर पुढचं चित्र स्पष्ट झालं। 2 ची चंदीगड -दिल्ली ,तिथून 5 ची दिल्ली -नागपूर फ्लाईट बुक केली।अकोल्याला फोन करून गाडी नागपूरला पाठवायला सांगितली।
हॉटेल च्या सगळ्या टॅक्सी बुक होत्या ।शेवटी रस्त्यावर उभं राहून टॅक्सी मिळते का बघायचं ठरवलं ।शेवटी एक टॅक्सी मिळाली।सकाळी शाळेची वेळ असल्याने व रस्ता एकाच असल्याने ट्रॅफिक जॅम लागला। 1 तास एअरपोर्ट ला पोचयलाच लागला।तिकिट नाही ,त्यामुळे आत जाऊ देतील का हा पण प्रश्न होताच।पण ज्यांनी आम्हाला फोन केला ते बाहेरच उभे होते.लगेच तिकीट घेतलं ,आत गेलो। चॉपर यायला बराच वेळ होता म्हणून त्यांच्याशी बोलत बसलो।त्यांनी सांगितलं की बुकिंग पोर्टल 24 तास आधीच बंद होत खरं तर बुकिंग फारस नसत म्हणून आम्ही विनंती केली आहे की 1 तास आधी पर्यंत बुकिंग सुरू ठेवा त्यामुळे टुरिस्ट वाढतील।
सिमला एअरपोर्ट वर स्टाफ 15 -20 जणांचा आहे ,पण तिथे एकही फ्लाइट येत नाही व जात नाही।चंदीगड हुन येणार चॉपर हीच काय ती तिथली रौनक!त्यात ही टुरिस्ट असतातच अस नाही। चॉपर आलं त्यातून 6 जणं उतरले। चंदीगड ला जाणारे तर आम्ही दोघेच होता।तुझ्यासाठी चार्टर प्लेन बुक केलय अस म्हणायची संधी सुभाष नि सोडली नाही। कुफ्रि,आणि जाखु टेम्पल बघायचं राहील ही रुखरुख मनात ठेवून सिमला सोडलं।पायलट कालचेच होते।त्या मॅडम ओळखीचं हसल्या ,लगेच का परतताय विचारपूस केली।चंदीगडला पोचलो ।तिथून दिल्ली ,मग नागपूर ।सकाळी 8 ला निघालेले रात्री 1 ला अकोल्याला पोचलो।
लगेच दुसऱ्या दिवशी MRI केला। लिगमेंट टीयर
होता।1 महिना आराम सांगितला।
सगळं झाल्यावर ,शांतपणे बसल्यावर विचार केला, इतकं पॅनिक होण्यासारख सिरीयस काही नव्हतं।पण बाहेर कुठे असलो की हेल्पलेस वाटत आणि उगाचच टेन्शन येत हे मात्र खरं।अकोल्याला पोचल्यावर एकदम रिलॅक्स झालो। 'आपली माती आपली माणसं' यांचं हेच वैशिष्ट असेल नाही !
असो आधी अधुरी सिमला ट्रीप मात्र कायमची स्मरणात राहील।