Happiness is well organized... ! चक्रावलात नं? तुम्ही म्हणाल आनंद हा असा संघटित करून किंवा आयोजित करून मिळण्याची गोष्ट आहे का? हो अहो आहे तर! आश्चर्य वाटलं नं?
हे काय नवीनच!.....असं कदाचित वाटेल तुम्हाला पण एखादी गोष्ट मनात बराच वेळ घोळत असते पण ती साकार व्हायला योग्य वेळ यावी लागते .....!आणि माझ्या बाबातीत नेमकं तेच झालं. .
गेल्या काही लेखांमध्ये अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया परिसरातली स्थळं आणि घटनांचं धावतं वर्णन होतं. अजून थोडं बाकी आहेच. मन घट्ट करून ठेवा. आज मात्र फक्त काही तुलनात्मक नोंदींबद्दल.
दरम्यान एक सुंदर कॅथेड्रल पाहिले होते. गाभारा म्हणता येईल असा मुख्य भाग भव्य होता, छत मान दुखेल इतके उंच, सुरेख आरस्पानी कोरीव काम. तिथली प्रकाशयोजना तर खिळवून ठेवणारी होती. तळघरात Bishop धर्मगुरुंचे बाप्तीस्मा, लग्न, अंत्यविधी इ. प्रसंगानुसार वेगवेगळे पोशाख काचेच्या कपाटात टांगलेले दिसत होते. जवळच महिला प्रसाधनगृह होते. तिथे चक्क सॅनिटरी नॅपकीन्स ठेवलेले होते. कॅथेड्रलमध्ये !! मासिक धर्म व धर्म याची गल्लत न करता त्याचा इतका शांतपणे स्वीकार आपल्याकडे होईल का! गोव्याला मंगेशीच्या देवळाबाहेर ’अशा’ महिलांनी प्रवेश करु नये, असे स्पष्ट लिहिले आहे. अनेक धार्मिक ठिकाणी असे लिहिलेले असते किंवा अध्याहृत असते. जिला त्रास होतो, आराम हवा आहे ती अशा वेळी मंदिरात काय कुठेच जाणार नाही, जाऊही नये पण जी खास तिथे दर्शनाला आली आहे तिला या कारणाने दर्शन नाकारणे मग ते ’देवी’चे देऊळ असले तरी, हे सगळे अतार्किक तर आहेच पण दुर्दैवी आहे. ती सूचना वाचताना मला हे कॅथेड्रल पुन्हा आठवले होते.
मी आता सौ चिकन खाके अकोल्याला येऊन शाकाहारी झालेली बिल्ली असल्याने रोजचे जेवण ही एक दिव्य परिक्षा असे. आपल्याकडे पाहुण्याला तो हात आडवा धरुन गयावया करेतो आग्रह केला तरच आपण चांगले यजमान असल्याचं सिद्ध होतं असं आपण मानतो, त्यात अर्थात भारतीय आतिथ्यशीलतेचा भाग असतो हे खरंय. इकडे आम्हाला किचनमध्ये कुठे काय आहे ते होस्ट दाखवून देत. गोदरेज कपाटाहून मोठ्या फ्रीजमध्ये दूध, लोणी, जॅम, चीज, भाज्या, ज्यूसेस आणि सॉसेस हे किमान असायचेच. घरात पाव आणि तांदूळ असत. त्यामुळे पोळी जरी मिळत नसली तरी आम्ही संशोधन करुन बरेच इंडोवेस्टर्न खाद्यप्रकार शोधून काढले. बाहेर गेलो की मात्र आमची विशेषत: माझी पंचाईत होई. मोठ्या क्लब मिटिंग असल्या की आपल्या अॅवॉर्ड फंक्शन सारखी गोल टेबलांची रचना असे. बोके आणि मांजरींना सुटाबुटात बसवले तर जसे दिसेल तशी मंडळी आजूबाजूला असत. ते खात असलेले पदार्थ अनोळखी असत. एकदा व्हेज प्लॅटर मागवली तर बशीत हे माँ माताजी!! उकडलेली भेंडी आणि परतलेली अळणी पानकोबी आली. बरं हॉटेलमधला मेनू पण इतक्या फॅशनेबल शब्दात लिहिलेला असे की त्यावरुन आत काय घातलंय याचा अंदाज येत नसे. धिप्पाड सहा फुटी वेटरशी एकमेकांना समजेल अशा इंग्लीशमधली चर्चा निष्फळ ठरली तर ज्यूस मदतीला येई. हॉटेलमध्ये आपल्याकडच्यासारखं पाणी आणून ठेवलेलं नसे. कोणतंही पेय इतकं काठोकाठ भरुन देत की आम्ही ’खाली ग्लास’ मागवून ते शेअर करत असू पण पानात काही टाकत नसू. त्यांना हे विचित्र वाटे कारण तिकडे सहसा आई पण मुलाचे उष्टे खात नाही. एकंदर ’टाकणे’ हा प्रकार तिकडे अगदी सर्वसामान्य आहे. टाकणं हा अन्नब्रह्माचा अपमान आहे मग बिल कुणी का देईना हे आम्ही त्यांना समजावून सांगत असू.
व्हिक्टर्स कॅफे नामक १०० वर्षांची परंपरा असलेल्या एका आगळ्यावेगळ्या उपाहारगृहात आम्ही गेलो होतो. आम्ही व फिली क्लबचे ५,६ जण मिळून. चपळ हालचाली करणारे चुणचुणीत वेटर आणि वेट्रेस अगदी तरुण विद्यार्थी असावेत असं वाटत होतं. अचानक घंटा घणघणली. दरवाज्यात उभ्या असलेल्या वेट्रेसने खड्या आवाजात एक छोटीशी कथा सांगितली. फ्रेंच राजकन्या आणि तिचं दुभंगलेलं हृदय असं काही त्यात होतं. हे सांगून होताच आम्ही दचकलो इतक्या तार स्वरात ती गाऊ लागली. आपल्या संगीतनाटकांमधल्या पदांसारखा हा ओपेरावजा गायनप्रकार होता. ती वेट्रेस त्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेत होती असे कळले. असे अनेक होतकरु कलाकार तिथे गायक कम वेटर म्हणून काम करतात आणि आपली कला सादर करतात. हेच या कॅफेचं वैशिष्ट्य. इथला अनुभव म्हणे त्यांच्या कलाविश्वातील करियरमधला मह्त्वाचा टप्पा मानला जातो. तसंही तिथे कामाचा आणि खानदान की इज्जतचा काही संबंध नसतो. एका उच्चभ्रू जोडप्याने तर आम्हाला त्यांची मुलगी सकाळचं कॉलेज आटोपल्यावर संध्याकाळी जिथे वेट्रेस म्हणून काम करायची त्या रेस्टॉरंटला आवर्जून जेवायला नेलं होतं. तर हे गायन प्रकरण आटोपल्यावर आमच्या ग्रुपमधल्या एकाचा वाढदिवस केक मागवून आम्ही साजरा केला आणि ’बार बार दिन ये आये’ हे आपलं युगानुयुगाचं कंपलसरी बड्डेसॉंग कोरस मध्ये म्हटलं. उपस्थितांसाठी अगम्य असणार्या या गाण्यात शेवटी ’हॅपी बर्थडे टू यू’ हा भाग इंग्लीशमध्ये असल्याने सर्वांना कळला आणि अख्ख्या हॉटेलमधल्या मंडळींनी टाळ्या पिटून ग्लासेस उंचावून त्याला विश केलं.
एका ग्रामपंचायतीला (नाव टाळते आहे) भेट दिली असताना तिथल्या समुपदेशिकेला गावातल्या सोयी आणि समस्यांबद्द्ल विचारले. एक तर अशी पोस्ट तिथे असणं हे मला नवलाईचं वाटलं. आपल्याकडच्या पंचायत समिती किंवा तत्सम कचेर्यात गेल्यावर आपण अगदी अडाणी असल्याचं फीलिंग येतं. इकडे व्यवस्थित पाट्या, हसरी देखणी स्वागतिका. छताला झुलणारं एकही जाळं नाही, मध्ययुगीन काळातले वाटणारे निराशावादी पंखे नाहीत. फायलींवर धूळ असायला फायलीच नाहीत कारण सगळीकडे चकचकीत कपाटं. हा, तर त्या समुपदेशिकेला त्या पोस्टींगचं कारण विचारलं. ती म्हणाली, १२-१३ वर्षांच्या कुमारी माता ज्याला ते किड्स प्रेग्नंसी म्हणतात त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. मोठ्या हॉस्पीटलमध्ये प्रसूतीचा खर्च प्रचंड. शाळेतल्या मुलींना लैंगिक शिक्षण देण्याऐवजी गर्भनिरोधक वाटावी लागणं, शाळेत सोबत कोणी हत्यार, बंदूक आणलेली नाही ना हे तपासण्यासाठी मेटल डिटेक्टर बसवावे लागणं ही तिथली शोकांतिका ऐकून धस्स झालं. योग्य अयोग्य याची निवड करण्याची समज वाढवण्याऐवजी ते तात्पुरती मलमपट्टी करतायत असं जाणवलं. नंतर सॅल्व्हेशन आर्मी (पुनर्वसन) केंद्र पाहिलं. तारवटलेल्या लालसर डोळ्यांचे, भकास चेहर्याचे गर्दुल्ले किंवा पियक्कड तिथे टीव्हीवर चमत्कारिक सिनेमा पाहत कसेही वेडेवाकडे बसले होते. कर्कश्य संगीत सुरु होतं. चित्रविचित्र कपडे, पिळापिळाच्या केशरचना, बहुतेक सगळे ब्लॅक. संसार टिकण्याचं प्रमाण कमी, पोरांचं लेंढार सांभाळत एकटं राहिलेल्या नशेच्या आहारी गेलेल्या, डिप्रेशनमधल्या जंकफूडच्या अतिसेवनाने लठ्ठ झालेल्या बायका, अशा एकल पालकांची भणंग बेकार अल्पशिक्षित मुलं. हे सुद्धा चकाकत्या अमेरिकेचं विदारक रुप आहे. आपल्याकडेही आता या समस्या खूप वाढत असल्या तरी याबाबतीत आपण त्यांच्यापेक्षा थोडे मागासलेले आहोत याचे पहिल्यांदा बरे वाटले.
एका होस्टच्या मित्राला आम्हाला काही ठिकाणं दाखवायची जबाबदारी दिली होती. रस्त्यात मध्येच गाडी थांबवून त्याने आम्हाला एका घराशी नेलं. घर अगदी टिपिकल अमेरिकन पद्धतीचं. एका बाजूला गॅरेज, हिरवंगार लॉन, घराची पांढरी आणि राखाडी पण टवटवीत रंगयोजना. घर बंद होतं. मागच्या खिडकीत एक वेगळाच शोपीस लटकत होता. त्याने त्यावरुन हात फिरवला. ’अजूनही हा इथंच आहे’ म्हणत हसला. आम्हाला काही कळेना. मग त्याने सांगितलं की तो आणि त्याची आधीची बायको इथे ५ वर्ष राहत होते. मग आम्ही हं म्हणणार तर तो पुढे म्हणाला की हे घर त्या बायकोच्या आधीच्या नवर्याचं आहे. आम्ही ’जोड्या लावा’ खेळत होतो तोच तो म्हणाला की त्याच्या बायकोचा (ह्याच्या) आधीचा नवरा म्हणजे घराचा मूळ मालक आणि त्या नवर्याची आताची बायको सध्या तिथे राहतात पण ते नेमके कुठेतरी गेलेले दिसतायत. हे घर आतून खूप सुंदर आहे आणि वाटेवरच होतं म्हणून तुम्हाला जस्ट दाखवायला आणलं होतं. हे सगळं ऐकून आम्हाला घेरी यायची बाकी होती. आपलं ८ वं लग्न आपल्याच पहिल्या नवर्याशी पुन्हा करणारी एलिझाबेथ टॆलर (चुभू देणेघेणे) आठवली. आम्हा सर्वांचे आधीचे आणि आत्ताचे नवरे व बायका तेच असल्याबद्दल आम्हाला एकदम हायसे वाटू लागले. :-D
शेवटी एक नोंद राजकारणाबद्दल. गांधीजी ही तेव्हा बहुतेक मध्यमवर्गीय अमेरिकनांना माहित असणारी महवाची एकमेव भारतीय व्यक्ती होती. वॉशींग्टनला भारतीय वकिलातीसमोर त्यांचा पुतळा आहे. आपल्याइकडे मात्र अमेरिकेच्या राजकारणावर तावातावाने चर्चा होते. आपल्याला नुसते त्यांचे राष्ट्राध्यक्षच नव्हे तर मोनिका ल्युएन्स्कीपासून मिशेल ओबामापर्यंत, रिपब्लिक डेमोक्रॅट पक्षांबद्दल बरच काही माहित असतं. त्यांना आपली बीजेपी, कॉंग्रेस वगैरे काहीही माहित नसायचं (तेव्हा तरी) लिंबूटिंबू पक्ष तर जाऊच द्या. कारण अमेरिका हेच त्यांचं जग आहे. मार्क ट्वेनने उपरोधाने म्हटलं होतं, अमेरिकेला भूगोल कळावा म्हणून बहुतेक जगात युद्ध होत असावीत. तर तेव्हा ओबामा आणि हिलरीपैकी कुणाला तिकिट मिळेल याची चर्चा होती. माजी अध्यक्षाची बायको म्हटल्यावर ती जास्त प्रसिद्ध असेल असं मला वाटलं होतं. प्रत्यक्षात या महासत्तेची अध्यक्ष एक स्त्री कधीच होऊ शकत नाही हेच जनतेचं साधारण मत असल्याचं आमच्या लक्षात आलं. आजही कमला हॅरिस उपाध्यक्ष आहे, अध्यक्ष नाही. आपल्याकडे एका दशकाहून जास्त इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. ममता, जया, मायावती, सुषमा स्वराज यांच्यासारख्या भिन्न मतप्रवाहाच्या पण पंतप्रधानपद सांभाळण्याचं पोटेन्शिअल असलेल्या आणि अत्यंत यशस्वी राजकीय कारकीर्द करणार्या महिला आठवून मला आपल्या देशाचं कौतुक वाटल्याशिवाय राहिलं नाही.
आज इतकंच. ☺
2 ऑक्टोबर--- नुकतीच महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री ह्यांची जयंती साजरी झाली. सरकार मान्य सुट्टी जाहीर असल्याने " ती कुणी, कोणत्या प्रकारे साजरी केली, हा अर्थातच चर्चेचा भाग आहे. दोघेही नेते आपल्या आपल्या परीने तितकेच महान; पण गांधीजींचा जितक्या मोठ्या प्रमाणावर आणि विस्तृत लेव्हल वर उदो उदो झाला,अजूनही होतो आहे--(माफी मागते, उदो उदो हा शब्दप्रयोग वापरल्याबद्दल--पण दुर्दैवाने ते खरंय.) तेवढ्याच प्रमाणात शास्त्रीजींना मात्र "उपेक्षित" ठेवलं गेलंय किंवा ते उपेक्षित राहिलेत ,कायमच,असे म्हणता येईल.वर्तमानपत्रातही गांधीजींविषयी रकानेच्या रकाने भरून भरभरून लिहिलं जातं; पण त्याच पेपरमध्ये शास्त्रीजींसाठी मात्र एखादे पान देखील उपलब्ध नसावे? नाही म्हणायला सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या कार्याविषयी, घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांविषयी, त्यांच्या देशाविषयीच्या श्रद्धा आणि निष्ठेविषयी, सरळ, साध्या, निगर्वी आणि निरिच्छ स्वभावधर्माविषयी एक विशिष्ट पोस्ट फिरत असते, तीही वर्षातून एकदा----हेही नसे थोडके. अत्यंत सालस, कायम जमिनीवर पाय असणाऱ्या ह्या व्यक्तीमध्ये देशाचा पंतप्रधान झाल्यावरही तसुमात्र देखील फरक पडला नाही. व्यक्तिगत सुख-दुःखाचा, "पोझिशन" चा किंचितही विचार न करता ज्याने फक्त देश बांधव आणि देशाप्रतीच विचार केला त्याचे कर्तृत्व, त्याची महानता मात्र दुर्लक्षितच राहिली.
त्याचं असं झालं की, आम्ही इथे पुण्यात डायनिंग सेट पहायला दुकानात गेलो होतो, तिथे एक मार्बलचा सेट आवडला. ते नवीन प्रकारचं मार्बल होतं, तर माझ्या मनात आलं की,ह्यावर हळदीचे, तेलाचे डाग पडले तर कसे जातील? आणि ते किती खराब दिसेल! मी त्या दुकानदाराला म्हटलं की, भगवान के मंदिर मे जो मार्बल लगा है, उसपे हल्दी कुमकुम के दाग जल्दी निकलते नही है( तो मुस्लिम होता) पुणेरी असल्यामुळे, त्याला मी काय म्हणते, ते थोडं तरी समजलं असावं. तेव्हा तो म्हणाला, अरे,हमने इतनी गेहराईमें कभी सोचा ही नहीं, आपभी मत सोचिए! मुझ पर भरोसा रखके ले जाइये!
लॉकडाऊनच्या वेळेस लोकांना झूम कॉल, डुओ कॉल, व्हॉटस् अप कॉल ची सवय चांगलीच अंगवळणी पडली होती. प्रत्यक्षात भेटायला जमत नव्हते तर असे वर्चुअली भेटणे, दुधाची तहान ताकावर भागवावी लागली.
परवा अचानक माझा मुलगा विचित्र वागायला लागला. काही कारण नसताना चिडचीड, संताप वगैरे सुरु झाला. मग काहीतरी खाणं झालं आणि तो अचानक नॉर्मल झाला. तेव्हा त्याला भूक लागली होती हे लक्षात आलं. मग विषय निघाला TV वर सतत येणाऱ्या जाहिरातीचा. गेल्या काही वर्षांत ही जाहिरात नेहमी पाहायला मिळतेय. एखादी व्यक्ती सर्वांशी भांडायला उठते, अगदी मारायच्या तयारीत येते. आणि अचानक कुणाच्या तरी लक्षात येतं, तिला भूक लागलीय. मग एक चॉकलेट खाऊन ती लगेच नॉर्मल होते.
मुलाला आणि मला एकाच वेळी ती जाहिरात आठवली. मुलगा म्हणाला, “हं, म्हणजे हे असं होणं नॉर्मल आहे. त्याशिवाय का त्यांनी अशी जाहिरात बनवली असती?” मी चमकले. TV वर दिसतं ते नॉर्मल, ते प्रातिनिधिक, तेच खरं हे असं किती लोकांना वाटत असेल? मग मला दुसऱ्या एका चॉकलेटची जाहिरात आठवली. त्यात मोठ्या वयाच्या मुली सगळं तोंड भरवून चॉकलेट खातात. ते बघायलाही किळसवाणं वाटतं. पण हीच खरी खाण्याची पद्धत, हे अचूक प्रेक्षकांच्या मनावर ठसवायचा प्रयत्न यातून केला जातो. असं खाल्लं तरच तुम्ही ते ‘एन्जॉय’ केलं, नाही तर आपलं उगीचच ‘गिळलं’. काय साधलं जातं यातून? कुठे जातोय आपण ? कुठल्याही सभ्यपणा , सुसंस्कृतपणाशिवाय आदिमानव जसा वागत किंवा खात असेल, तसं आपण वागणं अपेक्षित आहे? मग आठवलं की, आजकाल तेच जगणं खरं, नैसर्गिक आणि प्रामाणिक म्हणायची फ़ॅशन आली आहे. आणि आपण जे संयमित, सभ्य पद्धतीने जगतो, ते कृत्रिम, खोटं, आणि अँबनॉर्मल ठरवलं जातंय. म्हणजे जे आपण इतकी वर्ष अँबनॉर्मल समजत आलो, ते आता न्यू नॉर्मल असणार आहे आणि आपलं वागणं अँबनॉर्मल!
मग TV वरची एकेक गोष्ट आठवत राहिली. जवळजवळ सगळ्याच मालिकांमध्ये विवाहबाह्य संबंध दिसतात. अगदी अवंतिका, आभाळमाया पासून ते आता थेट एकीच्या नवऱ्याची दुसरी, तिसरी बायको घरात येऊन बसेपर्यंत. मग हा विषय मांडण्यातला फरकही जाणवत गेला. अवंतिका मध्ये हे असं वागणं चूक आहे हे तिचं ठाम मत होतं आणि तिच्या नवऱ्यालाही पुढे ते पटलं, तरी त्याची शिक्षा त्याला मिळालीच. आभाळमाया मध्ये नवर्याचं असं वागणं दुर्लक्षून नायिकेने त्याला नाही, तरी त्याच्या मुलीला स्वीकारलं. मात्र ह्या लोकांचं हे असं वागणं नॉर्मल नाही, हा विचार कुठेतरी मनात यायचाच (सीरियलवाल्यांच्याही). पुढे हे चित्र सरसकट दिसू लागलं आणि आता तर घरात गुणी बायको असताना नवरा राजरोस लफडी करताना दिसतो. ही लफडी साऱ्या कुटुंबासमोर सुरु असतात. सर्वांना ठाऊक असतात. आणि सर्वांनी ती स्वीकारलेली दिसतात. हाही प्रवास कुठल्या दिशेने जातोय?
भूक, मग ती पोटाची असो कि शरीराची, अशा असंयमित, असंस्कृत, खरंतर बीभत्स पद्धतीनेच भागवली जावी, हेच आता नॉर्मल असणार. आदिमानवाला तरी कुठे कुटुंब वगैरे संकल्पना ठाऊक होत्या?आदिमानव कपडे तरी कुठे घालत होता? म्हणजे आता कमी होत चाललेली कपड्यांची लांबी, कपडे न घालण्याची दिसू लागलेली इच्छा, हेही नैसर्गिक, न्यू नॉर्मल असणार आहे. आदिमानव खऱ्या अर्थाने ‘स्वतंत्र ‘ होता. त्यासाठी काही गोष्टींची किंमत त्याला मोजावी लागत असेलही, पण ते त्यातून मिळणाऱ्या स्वातंत्र्यापुढे अगदीच नगण्य असणार. तुम्ही ओल्ड नॉर्मल संकल्पनांना चिकटून बसणारे जुनाट, प्रतिगामी असाल तर तुम्हाला हे अँबनॉर्मल वाटू शकेल, पण हेच न्यू नॉर्मल आहे.
मग मधली हजारो वर्षं मानवाने जी सभ्यता, संस्कृती निर्माण केली, जोपासली, जपली, ते काय होतं? म्हणजे एवढी वर्षं प्रयत्नपूर्वक जो बदल मानवाच्या वागण्यात, व्यवहारात होत गेला, किंवा मानव जाणीवपूर्वक करत गेला, ते सर्व विनाकारण, व्यर्थ होतं? दोन तास खपून एखादं काम केलं आणि ते निरुपयोगी होतं असं कळलं तरी आपल्या जीवावर येतं. मग ही हजारो वर्षे मानव सुसंस्कृत बनण्यासाठी जे काही करत होता, ते निरुपयोगी ठरवताना जग इतकं नॉर्मल असू शकतं? कुठेतरी काहीतरी घोळ होतोय. माझ्याच डोक्यात काहीतरी केमिकल लोच्या झालाय.
न्यू नॉर्मल जगात हा लोच्या दूर करण्यासाठी उपाय आहे का?
गुढी उभारावी
तो धावतच आला. मी जाता-जाता वळून पाहिले तो माझ्याशी बोलायलाच आला होता. जवळपास दीड वर्षानंतर बघितलं पण आठवला, चेहरा विसरणं शक्यच नव्हतं.
चातुर्मास आला नि त्यातही श्रावण आला की " आटपाट नगर होतं " किंवा " ऐका गणेशा तुमची कहाणी " अशा कथा कहाण्यांची आठवण हमखास येतेच.प्रत्येक कहाणी काहीतरी समजावून शिकवून जाणारी असते .या कहाण्यांचा विचार करताना , मध्यंतरी काही कारणामुळे राजस्थानी लोकसाहित्याच्या संदर्भात अनेक गोष्टी ऐकण्यात आल्या त्या आठवल्या. त्यात एक जोगदेव यांची गोष्ट मला आवडली. ती सांगते.
Mohini -Giving presentation |
![]() |
Widner University |
Watching Saturn- Golden moment |
At state capitol with a senator |
Senator's bench in the Main hall |
’अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ या गाण्यावर आपल्या पिढीतल्या बहुतेक प्रत्येकाने आलटून पालटून एक हात कमरेवर आणि दुसर्या हाताच्या कुयर्या डॊलवत नाच केलेला असतो. हा बंगला चक्क प्रत्यक्ष पाहायला मिळाला तो हर्शेज चॉकलेटच्या भल्यामोठ्या फॅक्टरीमध्ये. स्वागतकक्षात चॉकलेटचे असंख्य प्रकार. आत गेल्यावर एका छोट्या गाडीत बसून आम्हाला त्या चॉकलेटनगरीची झलक दाखवण्यात आली. चिमुकला धबधबा, त्याजवळून वाहणारी नदी, काठावरची फुलं सगळं काही चॉकलेटचं. अध्येमध्ये चॉकलेटची कार्टून्स. अगदी मायानगरीत विहार केल्याचा अनुभव होता तो. या सगळ्यामधून गाडी हळूच पास होई तेव्हा ते मधाळ रंगाचं वाहतं चॉकलेट ओंजळीत उचलून घ्यावसं वाटे. सफर संपली. दर फार नसल्याने इथून आम्ही मुलांसाठी, नातलगांना भेट देण्यासाठी भरपूर चॉकलेट्सची खरेदी केली.
with network admin of Newmann college |
याच आठवड्यात एक मोठे हॉस्पीटल, तिमजली जिम आणि वावा या फूड कंपनीचा सबंध प्लांट आतून बघता आला. एका संध्याकाळी खास भारतीय पोशाखात चीज अॅंड वाईन पार्टीला हजर राहून आम्ही एक बॅले कम नृत्यनाट्य बघायला गेलो. प्रेमाचा त्रिकोण हे जगभरातलं सर्वाधिक आवडतं कथानक असलेल्या या बॅलेतील कलाकारांचा पदन्यास, तांत्रिक सफाई, पेहराव, नेपथ्य खिळवून टाकणारं होतं. तिकडून आम्ही एका भारतीय उपाहारगृहात डिनरला गेलो. खूप दिवसांनी वाफाळत्या पंजाबी डीशेस आणि तंदूर ’रोटी’ बघून मला एकदम कभी खुशी कभी गममधल्या काजोलसारखं देशप्रेमाचं भरतं आलं. आमच्यासोबत असलेले परदेशी पाहुणे पापड काट्याने तोडून खाताना पाहून आमची हसून पुरेवाट झाली.
Dinner at Indian Restaurant with host families |
आम्ही दोघं पहिल्यांदा दुबईला गेलो, तेव्हा निकिता चे इंजीनियरिंग चे लास्ट इयर होते. त्यामुळे तिला आमच्या बरोबर येता आले नाही. मग जेव्हा अक्षयने दुबई सोडायचे ठरवले, तेव्हा आमची दोघींची दुबई ट्रीप ठरली.मी नुकतीच जाऊन आले होते,त्यामुळे एक्साइटमेंट अशी नव्हती फार! पण तेवढीच एकत्र मजा! अर्थात अबुधाबीची काही नवीन ठिकाणे बघायला मिळाली,तिथले sand storms अनुभवता आले. शॉपिंगही विदाऊट जेंट्स डिस्टर्बन्स मनसोक्त असे करता आले.