मागच्या वर्षी साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यात अकोल्याहून नाशिकला बदली निमित्ताने आले ,नुकतीच पावसाची
सुरुवात झालेली होती आणि नाशिकला बऱ्यापैकी पाऊस पडून गेला होता. सर्व आजूबाजूची जमीन हिरवीगार झालेली
होती, शेजारच्या घरांमधले बगीचे टवटवीत वाटत होते बाल्कनीतुन दिसणारे डोंगर देखील आल्हाददायक वाटत होते
आणि आसमंतात एक प्रकारचा ओलावा आणि थंडावा भरून राहिला होता. अकोल्यासारख्या पाण्याचा दुष्काळ
असलेल्या शहरातून नाशिकला आल्यामुळे हा बदल प्रामुख्याने जाणवला .आठ दहा दिवसात घर थोडेफार लागले आणि
कार्यालयात रुजू व्हायचा दिवस ऊजाडला. बदलीचा पहिलाच अनुभव असल्यामुळे मनात एक प्रकारची हुरहूर होती .
सतरा वर्ष एकाच ठिकाणी म्हणजे अकोल्यात काढल्यामुळे मला आजचा दिवस नोकरीवर जाण्याचा पहिलाच दिवस आहे
असंच वाटत होत.��
आधी माझ्यासोबत माझी मैत्रीण (अकोला कार्यालयापासून ची घट्टमुट्ट मैत्रीण जी 7-8वर्षांपूर्वीच नाशिक ला बदली घेऊन
आलेली होती) येणार होती. पण काही कारणाने तिला सुट्टी घ्यावी लागली आणि मला एकटेच जायचे आहे हे नक्की झाले
.��तरी बिचारीने 2 दिवस आधी माझी कार्यालया च्या रस्त्याची रंगीत तालीम करून घेतली होती . आणि मी कार्यालयाला
खो देऊन आली होती��
कार्यालयात एकटेच जाण्यासाठी नाईलाज झाल्यासारखी खूप जड अंतःकरणाने मी अॅक्टिवा काढून एकदाची
अपार्टमेंटच्या बाहेर पडले आणि अचानक बाजूच्या बंगल्यात असलेल्या बकुळी चा मंद सुगंध नाकात शिरला .त्याचा
आस्वाद घेते आहे तोच पुढे सोनचाफा पण आपल्या गंधाने मोहित करण्यासाठी उभा होता. ती धुंदी अजून उतरत नाही तो
पुढे पारिजातक आपल्या नाजूक पांढऱ्या आणि केशरी फुलांचा सडा घालून तयार होता आणि तोदेखील सुगंध
वाऱ्याबरोबर इतस्ततः पसरत होता.मी त्या गंधानी एकदम खुळावलेच खूप खोल श्वास घेऊन तो सुवास हृदयात घ्यायचा
प्रयत्न करू लागले .आणि याच्यामुळे माझे लक्ष हे कार्यालयात जाण्याच्या तणावातून सभोवतालच्या निसर्गाकडे वळले
.अरोमा थेरपी मन रिलॅक्स होण्यासाठी वापरतात असा ऐकलं होतं पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला इथला निसर्ग देत होता.
खरोखर त्या सुगंधाने माझं मन पिसासारखं हलकं झालं आणि हळूहळू ते पहिल्या दिवसाचं मनावरचं ओझं उतरायला
लागले. पुढे जात असताना वेगवेगळ्या घरातले, बंगल्यातले बगीचे त्यात असणारे नारळाची,आंब्याची ,आवळ्याची
,सोनचाफ्याची झाडे, गुलाब, अनेक रंगातले जास्वंद ,चमेली जाई जुई चे वेल आणि कित्येक रंगीबेरंगी फुलां ची झाड
ज्यांची नावे ही मला माहिती नव्हती अशी दृष्टीस पडली आणि मन अजूनच प्रसन्न होत गेलं. थोड्या अंतराने घर, दुकान,
शाळा इ. मागे पडल्या आणि मोकळे मोठे मोठे प्लॉटस लागले .त्यात साचलेले पावसाचे पाणी ,हिरवळ,आणि रानफुले
यांच्या मिश्रणातून तयार झालेला एक प्रकारचा मातकट सुवास वाऱ्याबरोबर वाहत येत होता. इथल्या वाऱ्या चे एक
वैशिष्ट्य आहे की सारखा सुई सुई आवाज करत असतो. जवळपास डोंगर असल्यामुळे असेल कदाचित. माझं ऑफिस
एका डोंगराच्या पायथ्याशीच आहे त्याचं नाव पांडवलेणी आहे (पण पांडवांचा आणि या लेण्यांचा काहीएक संबंध नाही बर
का�� )हा डोंगर देखील हिरवागार झालेला होता आणि त्या डोंगराच्या माथ्याजवळ ढगांचे पुंजके दिसत होते एखाद्या हिल
स्टेशनला आल्याचा फील येत होता आणि अशा मनाच्या तरल अवस्थे त मी ऑफिसला केव्हा पोहोचले ते कळलेच नाही.
एकाअज्ञात कवीने लिहिले आहे,
रंग चोरुनी आभाळाचे
सजली वेडी रानफुले
मृद्गंधाच्या अत्तरातुनी
गंधित झाले रान खुळे
सरसर येता थेंब टपोरे
पाते हिरवे घेत झुले
लाटा उठती आनंदाच्या
सळसळीतुनी ऊन खुले
कंठी येती गाणी कुठली
पाखरांसही भूल पडे
निसर्ग सारा गातो गाणे
रोमांचित हे मन झाले..
आणि तो निसर्गाचा रोमांच माझ्या मनावर पसरल्याने माझ्या मनावरचा तणाव एकदम निवळला होता .खरंच निसर्ग हा एक
मन तणावरहित , शांत करणारा प्रिय सखा च आहे असे मला त्यावेळी वाटले.
------ गौरी
सुरुवात झालेली होती आणि नाशिकला बऱ्यापैकी पाऊस पडून गेला होता. सर्व आजूबाजूची जमीन हिरवीगार झालेली
होती, शेजारच्या घरांमधले बगीचे टवटवीत वाटत होते बाल्कनीतुन दिसणारे डोंगर देखील आल्हाददायक वाटत होते
आणि आसमंतात एक प्रकारचा ओलावा आणि थंडावा भरून राहिला होता. अकोल्यासारख्या पाण्याचा दुष्काळ
असलेल्या शहरातून नाशिकला आल्यामुळे हा बदल प्रामुख्याने जाणवला .आठ दहा दिवसात घर थोडेफार लागले आणि
कार्यालयात रुजू व्हायचा दिवस ऊजाडला. बदलीचा पहिलाच अनुभव असल्यामुळे मनात एक प्रकारची हुरहूर होती .
सतरा वर्ष एकाच ठिकाणी म्हणजे अकोल्यात काढल्यामुळे मला आजचा दिवस नोकरीवर जाण्याचा पहिलाच दिवस आहे
असंच वाटत होत.��
आधी माझ्यासोबत माझी मैत्रीण (अकोला कार्यालयापासून ची घट्टमुट्ट मैत्रीण जी 7-8वर्षांपूर्वीच नाशिक ला बदली घेऊन
आलेली होती) येणार होती. पण काही कारणाने तिला सुट्टी घ्यावी लागली आणि मला एकटेच जायचे आहे हे नक्की झाले
.��तरी बिचारीने 2 दिवस आधी माझी कार्यालया च्या रस्त्याची रंगीत तालीम करून घेतली होती . आणि मी कार्यालयाला
खो देऊन आली होती��
कार्यालयात एकटेच जाण्यासाठी नाईलाज झाल्यासारखी खूप जड अंतःकरणाने मी अॅक्टिवा काढून एकदाची
अपार्टमेंटच्या बाहेर पडले आणि अचानक बाजूच्या बंगल्यात असलेल्या बकुळी चा मंद सुगंध नाकात शिरला .त्याचा
आस्वाद घेते आहे तोच पुढे सोनचाफा पण आपल्या गंधाने मोहित करण्यासाठी उभा होता. ती धुंदी अजून उतरत नाही तो
पुढे पारिजातक आपल्या नाजूक पांढऱ्या आणि केशरी फुलांचा सडा घालून तयार होता आणि तोदेखील सुगंध
वाऱ्याबरोबर इतस्ततः पसरत होता.मी त्या गंधानी एकदम खुळावलेच खूप खोल श्वास घेऊन तो सुवास हृदयात घ्यायचा
प्रयत्न करू लागले .आणि याच्यामुळे माझे लक्ष हे कार्यालयात जाण्याच्या तणावातून सभोवतालच्या निसर्गाकडे वळले
.अरोमा थेरपी मन रिलॅक्स होण्यासाठी वापरतात असा ऐकलं होतं पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला इथला निसर्ग देत होता.
खरोखर त्या सुगंधाने माझं मन पिसासारखं हलकं झालं आणि हळूहळू ते पहिल्या दिवसाचं मनावरचं ओझं उतरायला
लागले. पुढे जात असताना वेगवेगळ्या घरातले, बंगल्यातले बगीचे त्यात असणारे नारळाची,आंब्याची ,आवळ्याची
,सोनचाफ्याची झाडे, गुलाब, अनेक रंगातले जास्वंद ,चमेली जाई जुई चे वेल आणि कित्येक रंगीबेरंगी फुलां ची झाड
ज्यांची नावे ही मला माहिती नव्हती अशी दृष्टीस पडली आणि मन अजूनच प्रसन्न होत गेलं. थोड्या अंतराने घर, दुकान,
शाळा इ. मागे पडल्या आणि मोकळे मोठे मोठे प्लॉटस लागले .त्यात साचलेले पावसाचे पाणी ,हिरवळ,आणि रानफुले
यांच्या मिश्रणातून तयार झालेला एक प्रकारचा मातकट सुवास वाऱ्याबरोबर वाहत येत होता. इथल्या वाऱ्या चे एक
वैशिष्ट्य आहे की सारखा सुई सुई आवाज करत असतो. जवळपास डोंगर असल्यामुळे असेल कदाचित. माझं ऑफिस
एका डोंगराच्या पायथ्याशीच आहे त्याचं नाव पांडवलेणी आहे (पण पांडवांचा आणि या लेण्यांचा काहीएक संबंध नाही बर
का�� )हा डोंगर देखील हिरवागार झालेला होता आणि त्या डोंगराच्या माथ्याजवळ ढगांचे पुंजके दिसत होते एखाद्या हिल
स्टेशनला आल्याचा फील येत होता आणि अशा मनाच्या तरल अवस्थे त मी ऑफिसला केव्हा पोहोचले ते कळलेच नाही.
एकाअज्ञात कवीने लिहिले आहे,
रंग चोरुनी आभाळाचे
सजली वेडी रानफुले
मृद्गंधाच्या अत्तरातुनी
गंधित झाले रान खुळे
सरसर येता थेंब टपोरे
पाते हिरवे घेत झुले
लाटा उठती आनंदाच्या
सळसळीतुनी ऊन खुले
कंठी येती गाणी कुठली
पाखरांसही भूल पडे
निसर्ग सारा गातो गाणे
रोमांचित हे मन झाले..
आणि तो निसर्गाचा रोमांच माझ्या मनावर पसरल्याने माझ्या मनावरचा तणाव एकदम निवळला होता .खरंच निसर्ग हा एक
मन तणावरहित , शांत करणारा प्रिय सखा च आहे असे मला त्यावेळी वाटले.
------ गौरी
No comments:
Post a Comment