साद पावसाची आली शहारली माती
भुई सवे आभाळाची जुळे आज प्रीती
शांता शेळके यांच्या या काव्याने पावसाच्या सुरुवातीला कवी मनाने किती सुंदर शब्दात स्वतःला व्यक्त केले आहे! त्याचप्रमाणे
पावसाची सर आता नुकतीच बरसली
आणि आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा हिरवळली
किती सुंदर कल्पना !नुकत्याच आलेल्या पावसाने जुन्या स्मृती जाग्या झाल्या.🌧🌧 ओसाड ,कोरडे झालेले मनाचे कप्पे पुन्हा बहरले. आनंद -उत्साहाची हिरवळ सर्वत्र दरवळू लागली. निसर्गाने कात टाकली तसेच मनानेही नवी उभारी घेतली. या सर्व प्रसन्नते बरोबरच पावसाची किंवा वर्षा ऋतु ची सुरुवात ही प्रत्येकाला निरनिराळ्या प्रकारे महत्त्वाची आहे. सगळ्यात मोठा आनंद शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरून ओसंडणारा असतो. डवरणी ,नांगरणीनंतर नवीन बियाणे पेरायचे तर पाऊस हवा .मान्सून सुरू झाला की पेरणीची लगबग सुरू होते. एक उत्साह संचारतो. पावसात भिजत ,संपन्नतेचं हिरवगार स्वप्न उघड्या डोळ्यांनी बघत शेतकरी तयार होतो.🌱🌱
निसर्गप्रेमींची लगबग वेगळी सुरू होते. निसर्ग संवर्धन ,वृक्षारोपण इत्यादीकरिता काम करणारे सर्वजण जबाबदारीने त्यासाठी जागरूकता कार्यक्रम घेण्यात मग्न होतात .तळमळीने प्रत्येकाला सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करतात. काही मनमौजी याबरोबरच पावसाळी सहलीचे बेत आखून तयार ठेवतात.🌈🌈 निसर्गाने मरगळ झटकून पुन्हा सृष्टी हिरवीगार करण्याचे प्रयत्न सुरू केलेले असतात त्याच प्रमाणे ही मंडळी मनाची मरगळ झटकून एकत्र येऊन वर्षा उत्सव आनंदाच्या देवाण-घेवाणीने साजरा करण्यास पुढे होतात.
गमतीचा भाग म्हणून हवामान खात्याच्या अंदाजावर अनेक विनोद केले जातात .उदाहरणार्थ पर्जन्यमान चांगले राहील मात्र हवामान खात्याने त्यांचे अनुमान देणे बंद ठेवावे लागेल !🤣इत्यादी .परंतु खरंच हवामान खात्यालाही निरनिराळ्या शास्त्रीय पद्धती वापरून पावसाचा अंदाज मापणे ,इतर संलग्नित खात्यांना त्यांच्या पुढच्या कामासाठी माहिती पुरवणे यासारखी महत्त्वाची कामे पावसाळ्याच्या सुरुवातीला अधिक काटेकोरपणे करावी लागतात .प्रत्येकच वेळी पाऊस हा कवी कल्पनेतील सुखद अनुभव देणारा असेल अशी खात्री देता येत नाही. विपरीत परिस्थिती मध्ये म्हणजे अति पर्जन्यमान ,वादळ ,अत्यल्प पर्जन्यमान, इत्यादी प्रसंगी सरकारी यंत्रणेला पूर्वतयारी नियोजनपूर्वक करावी लागते. एकीकडे राजकारणी मंडळींचे पावसाळी अधिवेशनाचे मनसुबे रचल्या जात असताना दुसरीकडे दुर्गम भागातील लोकांना, कच्ची घरे असणाऱ्या लोकांना शाकारणी करून परिस्थितीला सामोरे जाण्याचे आव्हान पेलावे लागते. आषाढ संपून श्रावण सुरू होताना निसर्गातील हा बदल पुढच्या अनेक बदलांना आपल्या सोबत घेऊनच येतो. त्यामुळे घरातल्या कर्त्या अनुभवी ज्येष्ठ व्यक्तींना एकीकडे सणवारांची नांदी ऐकू येते तर दुसरीकडे छोट्या-मोठ्या तब्येतीच्या कुरबूरींसाठी बटवा तयार ठेवावा लागतो .चातुर्मासातील प्रमुख सणांचे वेळापत्रक लक्षात घेऊन त्याप्रमाणे घरोघरी पूर्वतयारी केली जाते. त्याच प्रमाणे सर्दी पडसे, पोट दुखी इत्यादी झाल्यास घरी प्रथमोपचाराची औषधे लक्षात ठेवून आणून ठेवली जातात .त्याचप्रमाणे या ऋतु मुळे होणाऱ्या लहान-मोठ्या आजारपणामुळे वैद्यकीय व्यावसायिकांना "ओवर टाइम" करण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते .हा त्यांचा "सीझन" असतो.
पावसाळ्याच्या सुरुवातीला लक्षणीय बदल घडतात ते विद्यार्थ्यांच्या आयुष्यात .नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवातही याच वेळी होते. मग पूर्णवेळ खेळण्याचा उद्योग संपवून अर्धवेळ अभ्यास करण्यासाठी मुलांना तयार राहावे लागते .नवीन वह्या पुस्तके ,गणवेश, नवीन शिक्षक ,नवीन वर्गमित्र यांची उत्कंठा असते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षेचे निकाल जाहीर होऊन पुढच्या प्रवेशासाठी वेगळीच धांदल सुरू होते.
जसे मानवी विश्वात वर्षा ऋतुची सुरुवात एवढे सगळे बदल घडवून आणते तसेच पशुपक्ष्यांचा सुद्धा याला अपवाद नाही .🐿🕊पक्षी घरटे बांधून तयारीला लागतात नवस्रुजनाच्या ! छोटे प्राणी, कीटक खाद्याची सोय करून ठेवतात पुढे येणाऱ्या वातावरणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी .खरंच पावसाळ्याची सुरुवात किती किती प्रकारे आपले आयुष्य बदलत असते. असेच बदल आपल्या मनातही जाणीवपूर्वक केले गेल्यास पुढचे सगळेच ऋतू ,संपूर्ण आयुष्य समृद्ध करता येते .नवीन विचारांची पेरणी, दुखऱ्या नात्यांची शाकारणी, नकारात्मक विचारांचा निचरा, आनंदाच्या साधनांची साठवण करून ठेवण्याची हीच वेळ आहे. म्हणूनच म्हटलंय
पहिल्या पावसात शिवार दरवळतं सुगंधात
हिरवगार स्वप्न उभारी घेतं धरतीच्या मनात
वर्षा देशपांडे
भुई सवे आभाळाची जुळे आज प्रीती
शांता शेळके यांच्या या काव्याने पावसाच्या सुरुवातीला कवी मनाने किती सुंदर शब्दात स्वतःला व्यक्त केले आहे! त्याचप्रमाणे
पावसाची सर आता नुकतीच बरसली
आणि आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा हिरवळली
किती सुंदर कल्पना !नुकत्याच आलेल्या पावसाने जुन्या स्मृती जाग्या झाल्या.🌧🌧 ओसाड ,कोरडे झालेले मनाचे कप्पे पुन्हा बहरले. आनंद -उत्साहाची हिरवळ सर्वत्र दरवळू लागली. निसर्गाने कात टाकली तसेच मनानेही नवी उभारी घेतली. या सर्व प्रसन्नते बरोबरच पावसाची किंवा वर्षा ऋतु ची सुरुवात ही प्रत्येकाला निरनिराळ्या प्रकारे महत्त्वाची आहे. सगळ्यात मोठा आनंद शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरून ओसंडणारा असतो. डवरणी ,नांगरणीनंतर नवीन बियाणे पेरायचे तर पाऊस हवा .मान्सून सुरू झाला की पेरणीची लगबग सुरू होते. एक उत्साह संचारतो. पावसात भिजत ,संपन्नतेचं हिरवगार स्वप्न उघड्या डोळ्यांनी बघत शेतकरी तयार होतो.🌱🌱
निसर्गप्रेमींची लगबग वेगळी सुरू होते. निसर्ग संवर्धन ,वृक्षारोपण इत्यादीकरिता काम करणारे सर्वजण जबाबदारीने त्यासाठी जागरूकता कार्यक्रम घेण्यात मग्न होतात .तळमळीने प्रत्येकाला सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करतात. काही मनमौजी याबरोबरच पावसाळी सहलीचे बेत आखून तयार ठेवतात.🌈🌈 निसर्गाने मरगळ झटकून पुन्हा सृष्टी हिरवीगार करण्याचे प्रयत्न सुरू केलेले असतात त्याच प्रमाणे ही मंडळी मनाची मरगळ झटकून एकत्र येऊन वर्षा उत्सव आनंदाच्या देवाण-घेवाणीने साजरा करण्यास पुढे होतात.
गमतीचा भाग म्हणून हवामान खात्याच्या अंदाजावर अनेक विनोद केले जातात .उदाहरणार्थ पर्जन्यमान चांगले राहील मात्र हवामान खात्याने त्यांचे अनुमान देणे बंद ठेवावे लागेल !🤣इत्यादी .परंतु खरंच हवामान खात्यालाही निरनिराळ्या शास्त्रीय पद्धती वापरून पावसाचा अंदाज मापणे ,इतर संलग्नित खात्यांना त्यांच्या पुढच्या कामासाठी माहिती पुरवणे यासारखी महत्त्वाची कामे पावसाळ्याच्या सुरुवातीला अधिक काटेकोरपणे करावी लागतात .प्रत्येकच वेळी पाऊस हा कवी कल्पनेतील सुखद अनुभव देणारा असेल अशी खात्री देता येत नाही. विपरीत परिस्थिती मध्ये म्हणजे अति पर्जन्यमान ,वादळ ,अत्यल्प पर्जन्यमान, इत्यादी प्रसंगी सरकारी यंत्रणेला पूर्वतयारी नियोजनपूर्वक करावी लागते. एकीकडे राजकारणी मंडळींचे पावसाळी अधिवेशनाचे मनसुबे रचल्या जात असताना दुसरीकडे दुर्गम भागातील लोकांना, कच्ची घरे असणाऱ्या लोकांना शाकारणी करून परिस्थितीला सामोरे जाण्याचे आव्हान पेलावे लागते. आषाढ संपून श्रावण सुरू होताना निसर्गातील हा बदल पुढच्या अनेक बदलांना आपल्या सोबत घेऊनच येतो. त्यामुळे घरातल्या कर्त्या अनुभवी ज्येष्ठ व्यक्तींना एकीकडे सणवारांची नांदी ऐकू येते तर दुसरीकडे छोट्या-मोठ्या तब्येतीच्या कुरबूरींसाठी बटवा तयार ठेवावा लागतो .चातुर्मासातील प्रमुख सणांचे वेळापत्रक लक्षात घेऊन त्याप्रमाणे घरोघरी पूर्वतयारी केली जाते. त्याच प्रमाणे सर्दी पडसे, पोट दुखी इत्यादी झाल्यास घरी प्रथमोपचाराची औषधे लक्षात ठेवून आणून ठेवली जातात .त्याचप्रमाणे या ऋतु मुळे होणाऱ्या लहान-मोठ्या आजारपणामुळे वैद्यकीय व्यावसायिकांना "ओवर टाइम" करण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते .हा त्यांचा "सीझन" असतो.
पावसाळ्याच्या सुरुवातीला लक्षणीय बदल घडतात ते विद्यार्थ्यांच्या आयुष्यात .नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवातही याच वेळी होते. मग पूर्णवेळ खेळण्याचा उद्योग संपवून अर्धवेळ अभ्यास करण्यासाठी मुलांना तयार राहावे लागते .नवीन वह्या पुस्तके ,गणवेश, नवीन शिक्षक ,नवीन वर्गमित्र यांची उत्कंठा असते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षेचे निकाल जाहीर होऊन पुढच्या प्रवेशासाठी वेगळीच धांदल सुरू होते.
जसे मानवी विश्वात वर्षा ऋतुची सुरुवात एवढे सगळे बदल घडवून आणते तसेच पशुपक्ष्यांचा सुद्धा याला अपवाद नाही .🐿🕊पक्षी घरटे बांधून तयारीला लागतात नवस्रुजनाच्या ! छोटे प्राणी, कीटक खाद्याची सोय करून ठेवतात पुढे येणाऱ्या वातावरणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी .खरंच पावसाळ्याची सुरुवात किती किती प्रकारे आपले आयुष्य बदलत असते. असेच बदल आपल्या मनातही जाणीवपूर्वक केले गेल्यास पुढचे सगळेच ऋतू ,संपूर्ण आयुष्य समृद्ध करता येते .नवीन विचारांची पेरणी, दुखऱ्या नात्यांची शाकारणी, नकारात्मक विचारांचा निचरा, आनंदाच्या साधनांची साठवण करून ठेवण्याची हीच वेळ आहे. म्हणूनच म्हटलंय
पहिल्या पावसात शिवार दरवळतं सुगंधात
हिरवगार स्वप्न उभारी घेतं धरतीच्या मनात
वर्षा देशपांडे