फुलं म्हणजे माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय!......हो! हो !....अगदी कुठालीही !.....प्रत्येक फुल माझा जिव्हाळ्याचा विषय!..... प्रत्येक फुलाला. स्वतःचाअसं रंग ,रुप,गंध ही ओळख तर असतेच पण ते कुठल्या रुतुतील ही सुद्धा त्याची खासियतच!.......आपल्याला सगळ्यांच्याच अगदी सहज परिचयाच ते स्वस्तिकाच पांढर फुल!...असत साधसच पाच पाकळ्यांच पण उन्हाळ्यात उन्हामुळे ज्याची अगदी रया गेलेली असते त्या फुलाला कांती,तेज येत ते पावसाळ्यात .श्रावण,भाद्रपदाच्या महिन्यात .त्याच पाच पाकळ्या शुभ्र दुधाळ वर्ण लेऊन येतात तेव्हा त्याचा कडवट गंधदेखील हवाहवासा वाटतो. याच काळातला दूधमोगरा तर अक्षरशः सफेदीकी चमकारची जाहिरात करणारा .टवटवीत मंद गंध घेऊन वावरणारा .तसही ह्या रुतुत येणारे कण्हेर,जास्वंदआपला लाल गर्द रंग आणिक चकचकीत उठावदार लेऊन येणारे. खरच ही फुलं आपल्याला आवडात नाही असं म्हणू कां आपण ? अजिबात नाही कारण प्रत्येकाला देवाने त्याचेत्याचे गुण घेऊनच धरतीला शोभिवंत करण्याची संधी दिलीय. .....! .ती .....हो ...ती...... सदा हसत असणारी सदैव टवटवीत अलवार पाकळ्यांची ,साधिशीच पण उठावदार रंगसंगती घेऊन आलेली ,अगदी आंगणाच्या बाहेर स्थान असलेली पण तरिही हसरी...अहो येणार्यांच स्वागत करायला हसतमुखच लागतो ना दाराशी म्हणून ही अशी बाहेर रांगेत उभी असते जणू कर्तव्य बजावत. काय बिशाद कुणाच्या आदरातिथ्यात उणिव राहण्याची.
रूतू शरदाच्या आगमनानंतर तर स्वच्छ निरभ्र मोकळी हवा शरिराला अलगद,सुखद स्पर्श करणारी .हाच तो मंद गारवा मनाला मोहून टाकणारा. चंद्राचे शितल चांदणे आकाशात जणू गप्पांचा फड मांडून बसल्या आहेत अशा सगळ्या सख्या दाटीवाटीने खेळण्यात दंग झालेल्या .हीच चांदणी फुल जाई,जुई ,चमेलीच्या रुपात अंगणभर फेर धरत असतात आणि त्यांच्या महोत्सवात आपल्यालाही सामिल करुन घेतात .आहे की नाही गंमत आकाश- धरती असेच खर्याअर्थाने एक होतात.कस नातं आहे नाही जिवाभावाच! ह्याच काळातले शेवंती ,झेंडू सोनसळ घेऊन येणारे सुंगधी आणि टिकाऊपण आणि अबोली मात्र तितकीच कोमल ,नाजूक जरा नख लागल तरी दुखावेल अशी !.......हा बघा थंडीत कसा बहरलाय मस्त गेंदेदार भरगच्च पाकळ्यांचा आपला हो !फुलांचा राजा म्हणते मी!.....किती ते प्रकार अगणित रंगाचे !ही किमया माणसाचीच बरं कां आपल्या रजाला जितक्या कल्पकेतेने नटवू तितके कमीच इतकी रंगउधळण मुक्तहस्ते केलेली आहे. पण देशीवाणही तितकाच उठावदार औषधी आणि भूरळ पाडणारा गंध मंद असल तरी रंगाने आकर्षित करणारा.
एक ना अनेक किती म्हणून सांगू ! ऊन्हाळ्यातील फुलांचीपण बातच न्यारी इकडे रानात सुर्याचाच रंग घेऊन येणारा पळस फाल्गुनाची आठवण करुन देतो त्याच्याच रंगात तो आपल्याला भिजण्याच आमंत्रणही देतो. केसरिया रंग म्हणजे आहाहा!........पण तिकडे तप्त वैशाख गुलमोहराला अख्ख झाड रिकाम करुन देतो ,तुला जितकं फुलायचं तितकं फूलं.तू असा मोहरतोस म्हणूनच तुला गुलमोहर म्हणतात रे सगळे !.......
आणि झुमकेदार पिवळा झुंबर लावल्यासारखा लाडका पिवळाधम्म बहावा !..हा पण पानांना स्वतःसाठी जागा रिकामी करायला सांगतो आणि बहरतो मस्त ! अमलताश ! नांव म्हणजे एखाद्या अप्सरेला साजेसच. तीच ही! इतक्या उष्मातही नखरेल अंदाज घेऊन मनाला गारवा देणारी!.....
मोगरा!....म्हणताच आठवते ती माऊली ! स्वच्छ ,सुंगधी जणू सरस्वतीची लेक!म्हणूनच पटकन ओळी ओठावर येतात
"मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा"!!!
@अर्चना मुळ्ये
|
Sunday, December 15, 2019
फुलायचं म्हणते!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment