आनंद म्हणजे नेमकं काय? सतत छान वाटत राहणं म्हणजे आनंद? मग एखाद्या दारुड्याला
भरपूर दारू प्यायला मिळाली तरी छान वाटतं, त्या भावनेला आनंद म्हणता येईल का? नाही. मग हवं ते
करता/ घेता येण्याची कुवत मिळवणं म्हणजे आनंद? पण मग ज्यांच्याकडे ही कुवत आहे, ते सदैव
आनंदीच असायला हवेत. ते तसे नसतात. मग आनंद म्हणजे आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट? पण आनंद हे
जर अंतिम उद्दिष्ट मानायचं तर संपूर्ण आयुष्य त्याशिवाय जगायचं? नाही नाही; फारच घोळ होतोय.
मला वाटतं आनंद हा आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट नसून आयुष्याच्या प्रवासाचा अविभाज्य भाग असायला
हवा.
Aristotle च्या मते केवळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं नव्हे, तर अलम मानवजातीच्या
अस्तित्वाचं प्रयोजन म्हणजे आनंद!
आता खरं सांगायचं तर आयुष्य हा सुख- दु:खाच्या टप्प्यांनी बनलेला प्रवास आहे. कालिदास
म्हणतो त्यानुसार आत्यंतिक सुख किंवा दु:ख कुणाच्याही वाट्याला येत नसतं. जीवनाचं चक्र कधी खाली
तर कधी वर जात असतं. सुख आणि दु:ख दोन्ही क्षणकाल टिकणारे असतात, सुखाचे क्षण तुलनेने
लवकर गेल्यासारखे आणि म्हणून जास्त क्षणभंगुर वाटतात इतकंच. मनुष्य सुखाच्या क्षणांना घट्ट धरून
ठेवायचा प्रयत्न करतो, पण ते नकळत कधी निसटून जातात ते कळतच नाही. एक उर्दू शायर म्हणतो,
‘बार बार रफू करते रहते हैं जिन्दगी की जेब को हम, कमबख्त फिर भी गिर ही जाते हैं खुशीके कुछ
लम्हे...’ म्हणजे देणारा लाख देईल हो, पण घेणाऱ्याची झोळी तर धड हवी, ती आपली असते कायम
फाटकी!
आनंदाची आणखी एक गंमत असते. एका व्यक्तीला ज्यात आनंद वाटेल, त्यात दुसऱ्याला वाटेलच
असं नसतं. त्यामुळे आनंद कशात असतो याची व्याख्या करणंही शक्य नाही. एखाद्या व्यक्तीला
वाचनाची आवड असते. तिची मैत्रीण नेमकी “एवढं काय वाचत असतेस? जरा लाईफ एन्जॉय कर ना
आमच्यासारखं!” असं म्हणते तेव्हा तिला हसावं की रडावं हेच कळत नाही. एवढंच नाही, तर आज ज्या
गोष्टीतून आनंद मिळतो, त्या गोष्टीचा त्याच व्यक्तीला कालांतराने कंटाळा येऊ शकतो. दहा वर्षांपूर्वी
एकमेकांची सोबत सतत हवीशी वाटणारे नवराबायको एकमेकांना कंटाळतात आणि मग “ह्यांची सुटी
नकोच असं वाटतं आताशा, रोजचाच दिवस जास्त बरा जातो.” असं वाक्य एखादी गृहिणी बोलून जाते.
किंवा ‘आई तू ऑफिसला जाऊ नकोस’ म्हणून मागे लागणारी मुले ‘ती ऑफिसला गेलेलीच बरी’ असे म्हणू
लागतात. (त्यामागची कारणे शोधायला स्वतंत्र लेख लिहायची गरज आहे, इथे ती चर्चा नको.)
आनंद विकत मिळत नाही. तो तसा मिळाला असता, तर फक्त श्रीमंत लोक आनंद दिसले असते.
मात्र लक्ष्मी ज्यांच्या घरी पाणी भरते, अशा व्यक्तींच्या जीवनातही आनंद असतोच असं नाही. वैभवाच्या
झगमगाटात त्यांच्या डोळ्यांतली दु:खाची छटा लपत नाही. याउलट एकाच खोलीत संसार मांडलेल्या, घाम
गाळल्यावाचून भाकर न दिसणाऱ्या व्यक्तींचा चेहराही आनंदाने फुललेला दिसून येतो.
आनंद कशातही असेल, तरी तो व्यक्तीसापेक्ष आहे, हे मान्य करायलाच हवं. कधीकधी आनंद
कशात मानावा हे परंपरा ठरवतात. विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत. या संदर्भात मला एक भुलाबाईचं गाणं
नेहमी आठवतं. मुलींना खेळात अधेली सापडते. त्या अधेलीचा उपयोग कसा व्हावा हे पुढच्या गाण्यात येत
जातं – सर्वप्रथम ‘अधेली देऊ वाण्याला’. स्त्रीजवळ पैसा असला तर पहिला उपयोग ‘वाण्याकडे जाणे’ ! बरं
वाण्याकडे जाऊन काय करायचं तर ‘वाण्या वाण्या शोपा दे’ , शोपा स्वतःला खाण्यासाठी नाहीतच, तर
‘शोपा देऊ गाईला’ ! त्या शोपांच्या मोबदल्यात गाय दूध देईल. ते तरी मुली पिणार का? तर नाही; ‘दूध
देऊ बगळ्याला!’ बरं दुधाच्या मोबदल्यात बगळा चक्क पंख देतोय, तर ते घेऊन आकाशात भरारी घ्यावी
असा विचार करायचा नाही. तर ‘पंख देऊ राजाला’. आणि राजाकडून काय घ्यायचं तर ‘गोंडे’. बरं, हे गोंडे
लेऊन मुली समारंभात, गावात मिरवणार का? तर नाही, ‘तेच गोंडे लेऊ , सासरी जाऊ’ म्हणजे सगळा
उठारेटा करायचा तो सासरी जायला. मुलींचा आनंद अधेली स्वत:ला वाटेल तशी खर्च करण्यात नाही, दूध
पिऊन सशक्त होण्यात नाही, पंख पसरून भरारी घेण्यात नाही, गोंडे लेऊन मिरवण्यात नाही, तर तो आहे
(खरं तर असावा असा आग्रह आहे) सासरी जाण्यात. शिवाय हे सासर देखील कसं असतं, तर कुचूकुचू
काट्यांच्या वाटेवरलं ! असा प्रिस्क्राईब केलेला आनंद हे स्त्रीचं प्राक्तन होतं.
एखाद्याचा आनंद हा कशात असावा हे सांगणं चुकीचं असलं, तरी कशात नसावा हे सांगायची
बरेचदा गरज पडते. दुसऱ्याला त्रास देण्यात, दुसऱ्याची फजिती करण्यात, विध्वंसक कृत्ये करण्यात आनंद
नसावा. हॉटेलमधील वस्तू चोरण्यात, बसेसच्या सीट्स फाडण्यात, सार्वजनिक बागेतील उपकरणे
निष्काळजीपणे वापरून खिळखिळी करण्यात आनंद नसावा. एखाद्याच्या आयुष्यातील दुखरा कोपरा
मुद्दाम पकडण्यात, नको इतके खाजगी प्रश्न विचारून बित्तंबातमी काढण्यात, इतरांना तुच्छ लेखण्यात
आनंद नसावा. गरिबापुढे आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यात, एकाकी व्यक्तींसमोर भरल्या घराचे गोडवे
गाण्यात, हरलेल्याला हिणवण्यात आनंद नसावा. यातून फक्त अहंकार सुखावतो. आणि अहंकार
सुखावण्यातून मिळणारा आनंद हा आसुरी आनंद असतो.
एकूण काय, आनंद हा कस्तुरीसारखा असतो. मनुष्य आनंदाच्या शोधात वणवण भटकतो एखाद्या
कस्तुरीमृगासारखा. ती त्याच्या नाभीतच दडलेली आहे हे त्याला माहीतच नसतं. तो तिला इतरत्र शोधत
बसतो . मनुष्यही आनंद असाच बाहेर शोधत बसतो आणि त्याला तो सापडत नाही. तो त्याच्या मनातच
दडलेला असतो आणि म्हणत असतो, “तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलासी.”
भरपूर दारू प्यायला मिळाली तरी छान वाटतं, त्या भावनेला आनंद म्हणता येईल का? नाही. मग हवं ते
करता/ घेता येण्याची कुवत मिळवणं म्हणजे आनंद? पण मग ज्यांच्याकडे ही कुवत आहे, ते सदैव
आनंदीच असायला हवेत. ते तसे नसतात. मग आनंद म्हणजे आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट? पण आनंद हे
जर अंतिम उद्दिष्ट मानायचं तर संपूर्ण आयुष्य त्याशिवाय जगायचं? नाही नाही; फारच घोळ होतोय.
मला वाटतं आनंद हा आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट नसून आयुष्याच्या प्रवासाचा अविभाज्य भाग असायला
हवा.
Aristotle च्या मते केवळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं नव्हे, तर अलम मानवजातीच्या
अस्तित्वाचं प्रयोजन म्हणजे आनंद!
आता खरं सांगायचं तर आयुष्य हा सुख- दु:खाच्या टप्प्यांनी बनलेला प्रवास आहे. कालिदास
म्हणतो त्यानुसार आत्यंतिक सुख किंवा दु:ख कुणाच्याही वाट्याला येत नसतं. जीवनाचं चक्र कधी खाली
तर कधी वर जात असतं. सुख आणि दु:ख दोन्ही क्षणकाल टिकणारे असतात, सुखाचे क्षण तुलनेने
लवकर गेल्यासारखे आणि म्हणून जास्त क्षणभंगुर वाटतात इतकंच. मनुष्य सुखाच्या क्षणांना घट्ट धरून
ठेवायचा प्रयत्न करतो, पण ते नकळत कधी निसटून जातात ते कळतच नाही. एक उर्दू शायर म्हणतो,
‘बार बार रफू करते रहते हैं जिन्दगी की जेब को हम, कमबख्त फिर भी गिर ही जाते हैं खुशीके कुछ
लम्हे...’ म्हणजे देणारा लाख देईल हो, पण घेणाऱ्याची झोळी तर धड हवी, ती आपली असते कायम
फाटकी!
आनंदाची आणखी एक गंमत असते. एका व्यक्तीला ज्यात आनंद वाटेल, त्यात दुसऱ्याला वाटेलच
असं नसतं. त्यामुळे आनंद कशात असतो याची व्याख्या करणंही शक्य नाही. एखाद्या व्यक्तीला
वाचनाची आवड असते. तिची मैत्रीण नेमकी “एवढं काय वाचत असतेस? जरा लाईफ एन्जॉय कर ना
आमच्यासारखं!” असं म्हणते तेव्हा तिला हसावं की रडावं हेच कळत नाही. एवढंच नाही, तर आज ज्या
गोष्टीतून आनंद मिळतो, त्या गोष्टीचा त्याच व्यक्तीला कालांतराने कंटाळा येऊ शकतो. दहा वर्षांपूर्वी
एकमेकांची सोबत सतत हवीशी वाटणारे नवराबायको एकमेकांना कंटाळतात आणि मग “ह्यांची सुटी
नकोच असं वाटतं आताशा, रोजचाच दिवस जास्त बरा जातो.” असं वाक्य एखादी गृहिणी बोलून जाते.
किंवा ‘आई तू ऑफिसला जाऊ नकोस’ म्हणून मागे लागणारी मुले ‘ती ऑफिसला गेलेलीच बरी’ असे म्हणू
लागतात. (त्यामागची कारणे शोधायला स्वतंत्र लेख लिहायची गरज आहे, इथे ती चर्चा नको.)
आनंद विकत मिळत नाही. तो तसा मिळाला असता, तर फक्त श्रीमंत लोक आनंद दिसले असते.
मात्र लक्ष्मी ज्यांच्या घरी पाणी भरते, अशा व्यक्तींच्या जीवनातही आनंद असतोच असं नाही. वैभवाच्या
झगमगाटात त्यांच्या डोळ्यांतली दु:खाची छटा लपत नाही. याउलट एकाच खोलीत संसार मांडलेल्या, घाम
गाळल्यावाचून भाकर न दिसणाऱ्या व्यक्तींचा चेहराही आनंदाने फुललेला दिसून येतो.
आनंद कशातही असेल, तरी तो व्यक्तीसापेक्ष आहे, हे मान्य करायलाच हवं. कधीकधी आनंद
कशात मानावा हे परंपरा ठरवतात. विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत. या संदर्भात मला एक भुलाबाईचं गाणं
नेहमी आठवतं. मुलींना खेळात अधेली सापडते. त्या अधेलीचा उपयोग कसा व्हावा हे पुढच्या गाण्यात येत
जातं – सर्वप्रथम ‘अधेली देऊ वाण्याला’. स्त्रीजवळ पैसा असला तर पहिला उपयोग ‘वाण्याकडे जाणे’ ! बरं
वाण्याकडे जाऊन काय करायचं तर ‘वाण्या वाण्या शोपा दे’ , शोपा स्वतःला खाण्यासाठी नाहीतच, तर
‘शोपा देऊ गाईला’ ! त्या शोपांच्या मोबदल्यात गाय दूध देईल. ते तरी मुली पिणार का? तर नाही; ‘दूध
देऊ बगळ्याला!’ बरं दुधाच्या मोबदल्यात बगळा चक्क पंख देतोय, तर ते घेऊन आकाशात भरारी घ्यावी
असा विचार करायचा नाही. तर ‘पंख देऊ राजाला’. आणि राजाकडून काय घ्यायचं तर ‘गोंडे’. बरं, हे गोंडे
लेऊन मुली समारंभात, गावात मिरवणार का? तर नाही, ‘तेच गोंडे लेऊ , सासरी जाऊ’ म्हणजे सगळा
उठारेटा करायचा तो सासरी जायला. मुलींचा आनंद अधेली स्वत:ला वाटेल तशी खर्च करण्यात नाही, दूध
पिऊन सशक्त होण्यात नाही, पंख पसरून भरारी घेण्यात नाही, गोंडे लेऊन मिरवण्यात नाही, तर तो आहे
(खरं तर असावा असा आग्रह आहे) सासरी जाण्यात. शिवाय हे सासर देखील कसं असतं, तर कुचूकुचू
काट्यांच्या वाटेवरलं ! असा प्रिस्क्राईब केलेला आनंद हे स्त्रीचं प्राक्तन होतं.
एखाद्याचा आनंद हा कशात असावा हे सांगणं चुकीचं असलं, तरी कशात नसावा हे सांगायची
बरेचदा गरज पडते. दुसऱ्याला त्रास देण्यात, दुसऱ्याची फजिती करण्यात, विध्वंसक कृत्ये करण्यात आनंद
नसावा. हॉटेलमधील वस्तू चोरण्यात, बसेसच्या सीट्स फाडण्यात, सार्वजनिक बागेतील उपकरणे
निष्काळजीपणे वापरून खिळखिळी करण्यात आनंद नसावा. एखाद्याच्या आयुष्यातील दुखरा कोपरा
मुद्दाम पकडण्यात, नको इतके खाजगी प्रश्न विचारून बित्तंबातमी काढण्यात, इतरांना तुच्छ लेखण्यात
आनंद नसावा. गरिबापुढे आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यात, एकाकी व्यक्तींसमोर भरल्या घराचे गोडवे
गाण्यात, हरलेल्याला हिणवण्यात आनंद नसावा. यातून फक्त अहंकार सुखावतो. आणि अहंकार
सुखावण्यातून मिळणारा आनंद हा आसुरी आनंद असतो.
एकूण काय, आनंद हा कस्तुरीसारखा असतो. मनुष्य आनंदाच्या शोधात वणवण भटकतो एखाद्या
कस्तुरीमृगासारखा. ती त्याच्या नाभीतच दडलेली आहे हे त्याला माहीतच नसतं. तो तिला इतरत्र शोधत
बसतो . मनुष्यही आनंद असाच बाहेर शोधत बसतो आणि त्याला तो सापडत नाही. तो त्याच्या मनातच
दडलेला असतो आणि म्हणत असतो, “तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलासी.”
No comments:
Post a Comment