या वाटेवर रघुपती आहे,
त्या वाटेवर शिळा
सांग साजणी, कुठे ठेऊ मी,
तुझा उमलता गळा
गान कोकिळा लता मंगेशकर च्या वाढदिवशी कुणीतरी लिहिलेल्या ह्या ओळी वाचल्या आणि तत्क्षणी कानात
उमटला, तो तिचा सुमधुर आवाज.
आवाज--- एखाद्याची ओळख त्याचा आवाज असू शकते? लता दीदी, अमिताभ बच्चन ह्या सारख्या हस्ती चा
विचार केला तर नक्कीच होय.लताची ओळख म्हणजे तिचा जादूई आवाज. अमिताभ चा खास वेगळ्या धाटणीतला भारदस्त आवाज, ही त्याची वेगळी ओळख. मी जेव्हा एका खासगी बँकेत काम करत होते तेव्हा एक सद्गृहस्थ मला नेहमी म्हणायचे, "मॅडम, तुमचं अक्षर फार सुरेख आहे. अक्षरावरून माणसाचा स्वभाव कळतो".. पण एखाद्याचा चेहरा आणि त्याचा आवाज ह्यात मात्र विसंगती असूच शकते. इतकंच काय; पण आवाज आणि अंतरंग ह्यातही साम्य नसू शकतं. आणि काही समीकरणं तर आपणच माणसांनी तयार केलेली असतात. जसे, पुरुषाचा आवाज हा भारदस्तच हवा.त्यामुळे एखाद्या किनरया आवाजाचा पुरुष ऐकायला कसासाच वाटतो. बाई म्हटली की तिचा आवाज मंजूळ, नाजूकच हवा.भसाडया आवाजाची बाई, दिसायला कितीही गोड दिसत असली तरी ऐकायला नकोच वाटते, त्यात ती भांडखोर असेल तर----? एखादा पोलीस ऑफिसर किंवा आर्मी मधील मेजर, बायकी आवाजात बोललेलं कानाला आणि मनालाही रुचत नाही.
माणसा माणसामध्ये च आवाजाच्या बाबतीत किती भिन्नता आढळून येते. एखाद्या व्यक्तीचा आवाज मृदू,
मुलायम, आश्वसक, तर एखाद्या व्यक्तीचा कर्कश, कानावर आदळणारा. कुणाचा आवाज काळजाला भिडतो, तर
कुणाचा काळजाचा थरकाप उडवतो. परिचित व्यक्तींना म्हणूनच आपण आवाजावरून न बघताही सहज ओळखू शकतो. पक्षी, प्राणी, ह्यांच्या बाबतीतही तोच प्रकार. अर्थात, त्यांच्या आवाजाला ओळखही आपणच दिलेली. त्यांचा जो ध्वनी आपल्याला ऐकू येतो त्या नुसार त्या आवाजाला नाव दिले जाते. लहान मुलांना आपण तसेच शकवतो. चिवचिवाट करणाऱ्या त्या चिमण्या, कावकाव करणारे ते, कावळे, भुंकणार तो कुत्राच, डरकाळी फोडतो,तो वाघ आणि फुत्कारतो तो साप-----असे किती तरी प्रकारचे आवाज आपण ऐकत असतो आणि प्रत्येक आवाजाची लय, गती, जात सगळंच भिन्न. त्याचे आपल्या मनावर होणारे परिणाम देखील भिन्न.
मी जेव्हा जेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या (वेगात असलेल्या) ambulance चा आवाज ऐकते, तेव्हा तेव्हा हे आणि
असलेच विचार मनात येत राहतात. प्रत्येक प्रकारच्या आवाजमागची पार्श्वभूमी, आजूबाजूच्या परिसरावर होणारा
परिणाम, ह्यात किती वेगळेपण असू शकते. Ambulance चा आवाज ऐकला की नकळत आत कुठेतरी हलल्या गत होतं. मनावर दुःखाचे एक सावट दाटून येते. एक अनामिक भिती मनाला घेरते, बापरे! काय असेल आतल्या पेशंट ची कंडिशन? फार सिरीयस असेल का? त्याच्या नातलगांची मनस्थिती कशी असेल? थोडी हुरहूर, थोडी अस्वस्थता-----
अग्निशमन दलाच्या गाडीचा आवाज ऐकला की तसेच काहीसे होते. कुठेतरी आग लागली आहे, हे निश्चित; पण
त्या आगीचे स्वरूप कितपत भयानक असेल? कुणाचा जीव तर----?
पोलिसांच्या गाडीचा, सायरन चा आवाज--- धडकी भरवणारा आवाज. कुठेतरी काहीतरी भयंकर घडले असेल.
दंगल? मारामारी? की मर्डर? राडा आणि मर्डर हे शब्दच मनाचा थरकाप उडवण्यास पुरेसे असतात.
रात्रीच्या वेळी जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज-- -- हा आवाज सगळ्यात त्रासदायक. रात्रीच्या निरव
शांततेत, बेसूर्या ,भयाण ओरडणार्या कुत्र्यांचा आवाज ऐकून प्रत्येकाला प्रचंड राग येत असणार.काही कुत्री तर
अक्षरशः राडल्यासारखी भुंकत असतात. एखाद्या अप्रिय घटनेची चाहूल असते, ती, असं म्हणतात. अशुभाचा संकेत म्हटल्यावर अजूनच नकोसा वाटतो तो आवाज.
हॉस्पिटल मध्ये पेशंट च्या किंचाळण्याचा, विव्हळण्या चा आवाज---जगात किती प्रकारची दुःख आहेत, किती
तऱ्हेतऱ्हेचे रोग आहेत आणि कोण मृत्यू शी कशी झुंज देतो आहे, हे पाहून मन कातर व्हायला होते.
आकाशात कडकडणार्या विजांचा आवाज, भूकंपचया धक्क्याचा आवाज, दोन वाहने एकमेकांशी भिडतात, तेव्हा
होणाऱ्या अपघाताचा आवाज, जल प्रलय होत असताना होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा, वादळात सुसाट वाहणाऱ्या
वाऱ्याचा, झाडा पानांचा आवाज---- हे सगळे आवाज मनात धडकी भरवणारे, अस्वस्थ करणारे, उद्विग्नता आणणारे, थोडक्यात नकारात्मक ऊर्जा पसरवणारे आवाज वाटतात. याउलट मंदिरातील घंटेचा मंजुळ नाद, एखाद्या सुंदर( सुंदर च असली पाहिजे असं काही नाही) ललनेच्या हातातील बंगड्यांच्या किणकिण असा गोड आवाज, संथ वाहणाऱ्या झऱ्यातील पाण्याचा आवाज, एखाद्या गायकाच्या गळ्यातून येणाऱ्या, एखाद्या वादकाच्या वाद्ययातून येणारा सुमधुर, लयबद्ध सुरांचा आवाज, शांत स्वरात भजन कीर्तन करणाऱ्या भक्ताचा आवाज-- - हे सगळे आवाज मनाला प्रसन्न करणारे, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे वाटतात.
ह्या आवाजात एक वेगळाच आवाज असतो, तृतीयपंथी ह्यांच्या टाळी वाजवण्याचा आवाज. अगदी भिन्न. असो.
पण विचार केला तर चक्रवायला होते. पहा ना, घरातल्या भांड्यांचा आवाज, भांडणाचा आवाज, तोही घरातला,
गल्लीतील, रस्त्यावरील, रेल्वे स्थानकवरील हमाल, विक्रेते, ह्यांचे आवाज, भाजी बाजारातील रस्त्यावर फिरणाऱ्या
भाजी विक्रेत्यांचा आवाज, चालताना होणारा पावलांचा आवाज, दारावरच्या बेल चा आवाज( फोन चया रिंग चे तर
विविध प्रकारचे टोन) , रस्त्यावरील वाहनांचा आवाज, समुद्राच्या लाटांचा आवाज, छपरावरून गळणार्या पावसाचा आवाज, गारांचा आवाज --- ---बापरे बाप! इतके सारे आवाजाचे प्रकार? आणि एका 'आवाज' ह्या शब्दावरून एक आख्खा लेख तयार होईल असे कधी वाटलेही नव्हते. पण आता थांबते. नाहीतर तुम्ही म्हणाल, काय ही बया! जराही आवाज न करता किती हे आवाज डोळ्यासमोर आणले.
ह्या सगळ्या प्रकारामध्ये एक अजून वेगळाच आवाज नमूद करायचा राहिलाच. युद्धाला तोंड फुटल्यानंतर, युद्ध
भूमीवरचा तोफांचा, गोळीबाराचा आवाज, ज्याची आपल्या सारख्या सीमेपासून शेकडो योजने लांब असलेल्या
सामान्य जनतेला सुतराम कल्पना येत नाही. आपल्या दृष्टीने अपरिचित असलेला आवाज (आपण फक्त t v वर,
सिनेमात ऐकलेला असतो) सीमेलगतचया जनतेसाठी भयावह असू शकतो आणि सच्च्या सैनिकांसाठी
स्फुरणदायी.. - असो.
तेव्हा, थांबावं च म्हणते, आवाज न करता.
शेवटी जाता जाता एक गोष्ट फक्त नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे,'अंध' व्यक्तींसाठी आवाज ही फार मोठी
देणगी असते. जगाला परखण्याचे, संपर्क साधण्याचे ते एकमेव नसले तरी एक महत्वाचे माध्यम नक्कीच आहे.
- माणिक नेरकर.
त्या वाटेवर शिळा
सांग साजणी, कुठे ठेऊ मी,
तुझा उमलता गळा
गान कोकिळा लता मंगेशकर च्या वाढदिवशी कुणीतरी लिहिलेल्या ह्या ओळी वाचल्या आणि तत्क्षणी कानात
उमटला, तो तिचा सुमधुर आवाज.
आवाज--- एखाद्याची ओळख त्याचा आवाज असू शकते? लता दीदी, अमिताभ बच्चन ह्या सारख्या हस्ती चा
विचार केला तर नक्कीच होय.लताची ओळख म्हणजे तिचा जादूई आवाज. अमिताभ चा खास वेगळ्या धाटणीतला भारदस्त आवाज, ही त्याची वेगळी ओळख. मी जेव्हा एका खासगी बँकेत काम करत होते तेव्हा एक सद्गृहस्थ मला नेहमी म्हणायचे, "मॅडम, तुमचं अक्षर फार सुरेख आहे. अक्षरावरून माणसाचा स्वभाव कळतो".. पण एखाद्याचा चेहरा आणि त्याचा आवाज ह्यात मात्र विसंगती असूच शकते. इतकंच काय; पण आवाज आणि अंतरंग ह्यातही साम्य नसू शकतं. आणि काही समीकरणं तर आपणच माणसांनी तयार केलेली असतात. जसे, पुरुषाचा आवाज हा भारदस्तच हवा.त्यामुळे एखाद्या किनरया आवाजाचा पुरुष ऐकायला कसासाच वाटतो. बाई म्हटली की तिचा आवाज मंजूळ, नाजूकच हवा.भसाडया आवाजाची बाई, दिसायला कितीही गोड दिसत असली तरी ऐकायला नकोच वाटते, त्यात ती भांडखोर असेल तर----? एखादा पोलीस ऑफिसर किंवा आर्मी मधील मेजर, बायकी आवाजात बोललेलं कानाला आणि मनालाही रुचत नाही.
माणसा माणसामध्ये च आवाजाच्या बाबतीत किती भिन्नता आढळून येते. एखाद्या व्यक्तीचा आवाज मृदू,
मुलायम, आश्वसक, तर एखाद्या व्यक्तीचा कर्कश, कानावर आदळणारा. कुणाचा आवाज काळजाला भिडतो, तर
कुणाचा काळजाचा थरकाप उडवतो. परिचित व्यक्तींना म्हणूनच आपण आवाजावरून न बघताही सहज ओळखू शकतो. पक्षी, प्राणी, ह्यांच्या बाबतीतही तोच प्रकार. अर्थात, त्यांच्या आवाजाला ओळखही आपणच दिलेली. त्यांचा जो ध्वनी आपल्याला ऐकू येतो त्या नुसार त्या आवाजाला नाव दिले जाते. लहान मुलांना आपण तसेच शकवतो. चिवचिवाट करणाऱ्या त्या चिमण्या, कावकाव करणारे ते, कावळे, भुंकणार तो कुत्राच, डरकाळी फोडतो,तो वाघ आणि फुत्कारतो तो साप-----असे किती तरी प्रकारचे आवाज आपण ऐकत असतो आणि प्रत्येक आवाजाची लय, गती, जात सगळंच भिन्न. त्याचे आपल्या मनावर होणारे परिणाम देखील भिन्न.
मी जेव्हा जेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या (वेगात असलेल्या) ambulance चा आवाज ऐकते, तेव्हा तेव्हा हे आणि
असलेच विचार मनात येत राहतात. प्रत्येक प्रकारच्या आवाजमागची पार्श्वभूमी, आजूबाजूच्या परिसरावर होणारा
परिणाम, ह्यात किती वेगळेपण असू शकते. Ambulance चा आवाज ऐकला की नकळत आत कुठेतरी हलल्या गत होतं. मनावर दुःखाचे एक सावट दाटून येते. एक अनामिक भिती मनाला घेरते, बापरे! काय असेल आतल्या पेशंट ची कंडिशन? फार सिरीयस असेल का? त्याच्या नातलगांची मनस्थिती कशी असेल? थोडी हुरहूर, थोडी अस्वस्थता-----
अग्निशमन दलाच्या गाडीचा आवाज ऐकला की तसेच काहीसे होते. कुठेतरी आग लागली आहे, हे निश्चित; पण
त्या आगीचे स्वरूप कितपत भयानक असेल? कुणाचा जीव तर----?
पोलिसांच्या गाडीचा, सायरन चा आवाज--- धडकी भरवणारा आवाज. कुठेतरी काहीतरी भयंकर घडले असेल.
दंगल? मारामारी? की मर्डर? राडा आणि मर्डर हे शब्दच मनाचा थरकाप उडवण्यास पुरेसे असतात.
रात्रीच्या वेळी जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज-- -- हा आवाज सगळ्यात त्रासदायक. रात्रीच्या निरव
शांततेत, बेसूर्या ,भयाण ओरडणार्या कुत्र्यांचा आवाज ऐकून प्रत्येकाला प्रचंड राग येत असणार.काही कुत्री तर
अक्षरशः राडल्यासारखी भुंकत असतात. एखाद्या अप्रिय घटनेची चाहूल असते, ती, असं म्हणतात. अशुभाचा संकेत म्हटल्यावर अजूनच नकोसा वाटतो तो आवाज.
हॉस्पिटल मध्ये पेशंट च्या किंचाळण्याचा, विव्हळण्या चा आवाज---जगात किती प्रकारची दुःख आहेत, किती
तऱ्हेतऱ्हेचे रोग आहेत आणि कोण मृत्यू शी कशी झुंज देतो आहे, हे पाहून मन कातर व्हायला होते.
आकाशात कडकडणार्या विजांचा आवाज, भूकंपचया धक्क्याचा आवाज, दोन वाहने एकमेकांशी भिडतात, तेव्हा
होणाऱ्या अपघाताचा आवाज, जल प्रलय होत असताना होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा, वादळात सुसाट वाहणाऱ्या
वाऱ्याचा, झाडा पानांचा आवाज---- हे सगळे आवाज मनात धडकी भरवणारे, अस्वस्थ करणारे, उद्विग्नता आणणारे, थोडक्यात नकारात्मक ऊर्जा पसरवणारे आवाज वाटतात. याउलट मंदिरातील घंटेचा मंजुळ नाद, एखाद्या सुंदर( सुंदर च असली पाहिजे असं काही नाही) ललनेच्या हातातील बंगड्यांच्या किणकिण असा गोड आवाज, संथ वाहणाऱ्या झऱ्यातील पाण्याचा आवाज, एखाद्या गायकाच्या गळ्यातून येणाऱ्या, एखाद्या वादकाच्या वाद्ययातून येणारा सुमधुर, लयबद्ध सुरांचा आवाज, शांत स्वरात भजन कीर्तन करणाऱ्या भक्ताचा आवाज-- - हे सगळे आवाज मनाला प्रसन्न करणारे, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे वाटतात.
ह्या आवाजात एक वेगळाच आवाज असतो, तृतीयपंथी ह्यांच्या टाळी वाजवण्याचा आवाज. अगदी भिन्न. असो.
पण विचार केला तर चक्रवायला होते. पहा ना, घरातल्या भांड्यांचा आवाज, भांडणाचा आवाज, तोही घरातला,
गल्लीतील, रस्त्यावरील, रेल्वे स्थानकवरील हमाल, विक्रेते, ह्यांचे आवाज, भाजी बाजारातील रस्त्यावर फिरणाऱ्या
भाजी विक्रेत्यांचा आवाज, चालताना होणारा पावलांचा आवाज, दारावरच्या बेल चा आवाज( फोन चया रिंग चे तर
विविध प्रकारचे टोन) , रस्त्यावरील वाहनांचा आवाज, समुद्राच्या लाटांचा आवाज, छपरावरून गळणार्या पावसाचा आवाज, गारांचा आवाज --- ---बापरे बाप! इतके सारे आवाजाचे प्रकार? आणि एका 'आवाज' ह्या शब्दावरून एक आख्खा लेख तयार होईल असे कधी वाटलेही नव्हते. पण आता थांबते. नाहीतर तुम्ही म्हणाल, काय ही बया! जराही आवाज न करता किती हे आवाज डोळ्यासमोर आणले.
ह्या सगळ्या प्रकारामध्ये एक अजून वेगळाच आवाज नमूद करायचा राहिलाच. युद्धाला तोंड फुटल्यानंतर, युद्ध
भूमीवरचा तोफांचा, गोळीबाराचा आवाज, ज्याची आपल्या सारख्या सीमेपासून शेकडो योजने लांब असलेल्या
सामान्य जनतेला सुतराम कल्पना येत नाही. आपल्या दृष्टीने अपरिचित असलेला आवाज (आपण फक्त t v वर,
सिनेमात ऐकलेला असतो) सीमेलगतचया जनतेसाठी भयावह असू शकतो आणि सच्च्या सैनिकांसाठी
स्फुरणदायी.. - असो.
तेव्हा, थांबावं च म्हणते, आवाज न करता.
शेवटी जाता जाता एक गोष्ट फक्त नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे,'अंध' व्यक्तींसाठी आवाज ही फार मोठी
देणगी असते. जगाला परखण्याचे, संपर्क साधण्याचे ते एकमेव नसले तरी एक महत्वाचे माध्यम नक्कीच आहे.
- माणिक नेरकर.
No comments:
Post a Comment