Saturday, May 11, 2019

खेळ


बालपणीचा काळ सुखाचा!    ........खरच आमच्या लहानपणी शब्दशः अशीच परिस्थिती होती. ते दिवस हुंदडायचे बागडायचे खेळायचे होतेच आणि आम्ही त्याचा पुरेपुर वापर करुन घेत असु .मुळात शाळेत असताना नापास न होणे हे एकच ध्येय असल्याने आणि अव्वलात येण्याची हुशारी नसल्याने फारसा ताण कधी घेतलाच नाही. आजुबाजुला सर्वसाधारणपणे वातावरणही तसलच होतं .त्यामुळे पास होण्यातच हुशारी मोजली जायची सर्वसाधारण घरात. !......पण खेळाची आवड भरपूर !अगदी  लहानपणासुन म्हणजे दुसरीत असल्यापासुनच  घराजवळच  समर्थ क्रीडामंडळ होते तिथे सगळी लहानमोठीमुले अगदी ५ते२५वयोगटातली येत असत. त्यामुळेही असेल खेळाची आवड लागली.शिस्तीत तरिही खेळीमेळीने तिथे सगळ पार पडत असे.जसेकी,५वा.क्रिडांगणावर प्रथम प्रार्थना आणि नंतर राऊंड मारणे एकत्र वार्मिंगअप  करणे .अगदी लहानपणापासुनच  मलाही सेंटरमध्ये उभे राहुन व्यायाम घेण्याची सवय लागली.त्यानंत आपला जो गेमप्रकार असेल त्याचा त्याचा सराव करणे आणि शेवटी परत प्रार्थनेने विसर्जन! .............अशापद्धतीने लहानवयातच समुहात कसे रहावे,कसे वागावे, असे संस्कार नकळतच  झाले.  


       कुठल्याही खेळासाठी शारिरीक ताकद,लवचिकता,तत्काळ निर्णय क्षमता ,मेहनत आणि लक्षावर केंद्रीत होण अशा शारिरिक, मानसिक  क्षमतांची नितांत गरज असते. पण मैदानात उतरलो की,खेळ कधी खेळायला मिळेल याचीच उत्सुकता जास्त राहायची. पण आमचे सिनियर्स मात्र आम्हाला मैदानाच्या सभोवार बसवुन मोठे कसे खेळतात यांचे निरीक्षण करायला लावीत. अतिशय कंटाळा यायचा पण ताकीद मोडायची हिम्मत कुणात नसे. तसा basket ball game खेळायला आणि समजायलापण कठीणच. प्रमाद(foul)घडण्याची शक्यताच जास्त  त्याचमुळे त्यातील बारकावे लक्षात यावे म्हणुनही असेल बहुदा..............कुठलिही नवी गोष्ट शिकताना त्यातील skillआत्मसात करणं जास्त गरजेच असतं. जस स्वयंपाक सगळेच करतात पण पोळी कुणाची गोल,पातळ,नरम होते कशी टम्म फुगते त्यावरुन तिचा  सुगरणपणा कळतो तसेच बास्केट सगळेच टाकतील पण ती थ्रीस्टेपमध्ये टाकणार ,कां पास टू पासदेऊन टाकणार ,कां थ्री पॉईंट अंतरावरुन टाकणार ,कां झीरो पॉईंटवरुन टाकणार ,कां स्क्रीन शॉट टाकणार ,कां डॉज देऊन टाकणार. हेत्या वेळेसच्या परिस्थितीवर खेळाडूला ठरवाव लागतं ती क्षणाची क्रिया असते. अंगाबांध्याने बुटकी रोडखोड असुनही मला या खेळाची आवड लागली ती महाविद्यालयात गेल्यावर अकरावी पासुन .सिनियर्सच्या हाताखाली शिकण्याचे ते दिवस होते. विशिष्ट कोचींग वगैरे असला प्रकार नव्हताच . मैदानाची साफसफाई करणे पाणी मारणे मैदान आखणी करणे अशी सगळीच कामे   आम्ही मोठ्या हिरहिरीने करत असु. त्यात लहान -महान असा कुठलाही भेदभाव नसे .पडेल ते काम आनंदाने करणे बस!.......मला वाटत यातुनच  आपण घडत असतो .सगळ्यांशी जुळवुन घेण्याच तंत्रही शिकत गेलो. पाहीजे तिथे वाद ,हवा तिथे संवाद !हेही ओघाओघाने घडतच असे.  हळूहळू गेम सुधारत गेला तसतशी आणखी रुची वाढू लागली   आता 1st इयर पासुन होणार्या   university    matches  चे वेध  लागू लागले  नि लागले दणकून सरावाच्या मागे आमच्या इथे आम्ही मुलांसोबतही खेळायचो म्हणजे आपला stamina तपासला जायचा कुठे कमी पडतो ते कळायच आणि  स्टफनेस वाढायचा. कधीमधे  अम्पायरशीपपण करायला मिळायची .अम्पायरशीप करताना तर फारच बारीक नजरेने फाऊल दाखवण्याच कसब पणाला लागत असे.त्यात परत वादावादी भांडणही व्हायची पण ती खेळतानापुरतीच नंतर सगळ परत जैसे थे! आयुष्याची शिकवण अशीच मिळते नकळत!.आणि शेवटी फायनल इयरला असताना मी  university team ला select झाले .कलरकोट होल्डर होणार होते.  त्यासाठी लागणारा सराव अगदी अंगमेहनतीने चिकाटीने करावा लागे.

अमरावतीची हनुमानव्यायामशाळा म्हणजे क्रीडापंढरीच तेथील प्रत्येक खेळाचे ३/४आधुनिक पद्धतीचे मैदान मन मोहवुन टाकायचे. ज्यावेळेस basketballचे सगळीकडे लाकडी बोर्ड असायचे त्यावेळी १९८७काळात एक मैदान fiber bordचपण होतं तिथे खेळताना वेगळ टेक्निक आणि लाकडी बोर्डवर खेळताना वेगळ ं! आणि आंतर विद्यापिठीय सामने तर चक्क पहिल्यांदा जेव्हा मद्रासला झाले तिथे तर चक्क wooden groundआणि fibre bord होता.ज्याचा आम्हाला कधीही सराव नव्हता. आम्ही टारकोर्टवर खेळणारे खेळाडू, इथे ड्रीबलींग जरा जरी जोरात झालं तरी क्यारी फाऊल हटकून व्हायचा म्हणजे हळूवार ballवर प्रेशर देऊन ड्रीबलींग करावे लागे. तसेच शॉट टाकताना बोर्डसपोर्टने टाकला तर लाकडी बोर्डापेक्षा fiberबोर्डवर ballचा स्पर्श जोरात नको असायचा कारण त्या बोर्डवर तो फार उसळत असे अशावेळेस विदाऊट बोर्डसपोर्ट बास्केट करणेच जास्त सोयीच असायच.त्यासाठी परफेक्शन आणि ऊंची असण फार महत्त्वाच असायच  अशा वेगवेळ्या परिस्थितीशी वेगवेगळ्या चांगल्या टीमशी खेळताना जे अनुभव येत ते पण उपयोगी पडायचे पुढच्यावेळेसाठी,   आंतर विद्यापिठासाठी माझी निवड    मद्रास १९८७,१९८८वनस्थली विद्यापीठ(महिलाविद्या.)    राजस्थान आणि १९८९ आणंद! गुजराथ विद्यापीठ अशी तीन वर्ष सतत  Hat trick  झाली. आनंदाचे उल्हासाचेच दिवस होते ते. आजही काही अंशी जे बरेच गुण टिकून आहेत. त्याचा कुठेतरी ह्या संस्कारांचा परिणाम आहे हे नक्कीच !!! जसे कलाकाराला कला सादर करण्यासाठी स्टेज खुणावत असतो. तसेच आजही मैदान दिसले की मैदान मला खुणावत असतं !पण आता ते सगळं स्मृतीतच जपून ठेवलं आहे.

No comments:

Post a Comment