"अरे भाई,शेहेरमे हो भी या नही? बहोत दिनोसे मुलाकात ही नही हुई। " किंवा " खूप दिवसांनी भेट होतेय आपली,नाही?" " अरेच्चा।इतक्यात आपली गाठ भेटच नाही" --------- अशा प्रकारचे संवाद नेहमीच कानावर पडत असतात.तर असा हा शब्द--- मुलाकात,भेट,गाठ--कधी तो खूप जवळचा वाटतो,कधी विरहाने ओथंबलेला वाटतो,तर कधी फक्त औपचारिक; पण आपल्या महान गितकारांनी ह्याच शब्दावरून किती नी कशा सुरेख रचना केल्या आहेत नी त्या रचनांना मूर्त रूप देऊन त्यांचं सौंदर्य वाढवायचे काम केलंय आपल्याच एक से बढकर एक संगीतकार आणि गायकांनी. आणि आपल्या सारख्या असंख्य रसिक श्रोत्याना परमोच्च आनंदाची प्राप्ती करून दिली आहे.
बघूया तर-----
" आज उनसे पेहेली मुलाकात होगी
फिर आमने सामने बात होगी---- " सिनेमाचा रुबाबदार नायक घोड्यावर बसून ऐटीत घोडा दामटवत आपल्या भावी वधूला भेटण्यासाठी निघाला आहे. वाटेतील बहारदार वातावरण आणि तितकेच प्रसन्न पण संभ्रमित मन. पहिली वहिली भेट-- कशी होईल? "ती" कशी असेल? "अन देखा,अन जा ना सा मुखडा कैसा होगा, ना जाने वो आ
चांद सा तुकडा कैसा होगा---" उत्सुकता आणि साशंकतेने भरलेल्या मनाने पहिल्या भेटीसाठी आतुरलेला प्रियकर गितकाराने किती छान रंगवला आहे? (पराय या धन- किशोर कुमार)
"राह मे उनसे मुलाकात हो गयी
जिसे डरते थे,वही बात हो गयी ----" (विजय पथ- कुमार सानू,अलका yagnik)
प्रियकर आणि प्रेयसीच्या भेटीचा क्षण. भेट व्हावी असे तर वाटतेच, पण त्याच बरोबर,ह्या भेटीतून काय निष्पन्न होईल,ह्याविषयी अंधुकशी धाक धुकही वाटत रहाते. प्रेमात एक पाऊल पुढे तर टाकायचे आहे,पण एक अनामिक भीतीही आहे मनात,समाजाची.
"ये मुलाकात इक बहा ना है,प्यार का सिलसिला पुराना है ---"
(खानदान- लता)
ही प्रेयसी जरा जास्तच धीट आणि स्वतःच्या निर्णया शी ठाम असलेली दाखवली आहे. "भेट" हे तर एक निमित्त आहे,प्रेमात पडण्याची परंपरा तर फार पूर्वीपासून चालत आलेली आहे,अगदी पाण वठ्यावरील भांडणापासून. ,त्यामुळे तिच्या मनात ना काही शंका आहे,ना कसली भीती.प्रेमाच्या नी प्रियकराच्या भेटी बाबत तरी ती बेधडक आहे.
" रिमझिम के तराने लेके आई बरसात
याद आई किसिसे वो पेहेली मुलाकात---" ( काला बाजार- गीता दत्त, रफी) ,
अहाहा: संगीतकार S. D. बर्मन नी काय सुरेल संगीत दिलंय.
प्रेमात पडल्या नंतरची पहिली भेट,तीही मस्त,धुंद,रोमँटिक पावसाळी वातावरणात? ☂
क्या बात है। प्रेमी जंनसाठी आणि गीतकार,कवी ह्या मंडळींसाठी पावसाचा रंग फक्त सुंदर च असू शकतो. रिमझिम पडणारा पाऊस,हलक्या बरर्सनाऱ्या सरी--- विरही जिवा ना नेहमीच साद घालत असतात.
हे गाणं म्हणजे अबोल,हळुवार प्रीतीचे एक सुरेख ,मनमोहक असे चित्रं च भासते.
'ये दुनिया वाले पुछेंगे, मुलाकात हुई, क्या बात हुई,ये बात किसीसे ना केहेना----"
जिच्या भेटीची तीव्र इच्छा मनात आहे, ती अत्यंत प्रिय व्यक्ती भेटल्यानंतर एक ख़ुशी आहे,पण त्याचबरोबर हजारो शंकाही आहेत मनात,लोकांच्या प्रश्नांना काय अन कसे सामोरे जायचे? प्रियकर प्रेयसीला समजावतो आहे,"-हे प्रिये,तुझे डोळे फार बोलके आहेत ग. ते सगळं काही सांगून जातात. तू तुझ्या डोळ्यातील भावा वरून अजिबात कळू देऊ नकोस की तू माझ्या प्रेमात आहेस. तुम लोगोसे ये ना केहेना,सावरीया से लागे नयना;---" प्रेयसी काही कमी नाहीये. ती त्याच्याच शब्दात त्याला समजावते, " मै तो ये प्यार छुपा लुंगी, तुम कैसे दिलको संभालोगे----" तुझ्या मनात माझी जी प्रतिमा कोरली गेलीये,तिला जगासमोर आणायची घाई तुला देखील झालीच आसेल. तेव्हा चुकूनही असलं काही करू नकोस,जेणेकरून माझी बदनामी होईल-----" खरंच, मनातले भाव गीताच्या रूपाने क्वचितच कुणी मांडू शकेल.
" लग जा गले--- शा यद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो----" लता दीदींनी गायिलेले हे गाणे,पूर्ण आर्तता,व्याकुळता,
दर्शवणारे,कानाला अतिशय सुमधुर भासणारे गीत. "छोटीसी मुलाकात प्यार बन गयी----" ह्या गाण्यातून खेळकर ,नटखट भाव प्रकट होतात. अशीच सुरेल गाणी मराठीतही ऐकायला मिळतात. बघूया----
"भेट तुझी माझी स्मरते,अजून त्या दिसाची----" कुसुमाग्रज ह्यांचं गीत,यशवंत देव ह्यांचं संगीत आणि अरुण दाते ह्यांचा भावपूर्ण स्वर--- हा प्रियकरही धुंद अशा पावसातील आपल्या प्रेयसीच्या भेटीचे स्मरण करून व्याकुळ होतोय. वादळ? तेही,धुंद? रात्रं? तीही पावसाची? ,कल्पना तरी पहा ना. एखादा डिटेक्टिव्ह लेखक ह्या वरून एखादी सस्पेन्स स्टोरी लिहू शकेल
पण दोन प्रेमी जीव
रम्य कल्पनेतच रममाण होतील.
"जाईन विचारीत रानफुला--- भेटेल तिथे ग सजण मला--" शांता बाईंची अतिशय सुंदर रचना,किशोरी आमोणकर नी त्यात जीव ओतलेला--- राना वनातून,फुलफुलातून प्रेयसी आपल्या प्रियकराला शोधत निघाली आहे . रस्त्यात ज्या ज्या ओळखीच्या खुणा आहेत, त्या तिला तिच्या साजणा पर्यंत नक्की पोचवतील ही खात्री देखील आहेच. भग्न शिवालय, निर्जन परिसर, पळस फुलांचे दाट बन, जंगलात हर्षाने नाचणारा मोर आणि नंतर निळ्या ढगातून बरसणारे पाणी, हे सगळं तिला तिच्या जिवलगा पर्यंत घेऊन जाणार आहेत.
हाऊ स्वीट ना?
" भेटी लागे जिवा---लागली ती आस,पाहे रात्रं दिवस,वाट तुझी---" संत तुकाराम ह्यांचा लता दीदींनी गायिलेल्या हया अभंगात एका निसन्ग, निस्वार्थ भक्ताची,परमेश्वराच्या भेटीसाठी चाललेली तळमळ दिसून येते. "त्याच्या" भेटीसाठी मन व्याकुळ झालं आहे,दुसरं तिसरं काहीही सुचत नाहीये,त्या शिवाय. विठ्ठलाच्या भेटीची ओढ, पराकोटीची श्रद्धा, निर्मळ भक्तीचा ध्यास--- जिथे सगुण आणि निर्गुण ह्यातील भेद,अंतर कमी होते,असे आत्मा आणि परमात्म्याचे मीलन घडवणारी भेट,त्या भेटीची आस--- खरोखर अंतर्मनाला भिडणारी ही रचना--- अशी किती उदाहरणे द्यावीत? , हा खरोखर एक न संपणारा प्रवास आहे,जो अनंत काळ पर्यंत सुरूच असणार आहे. आणि ह्या सुंदर प्रवासा चे आपण ( सध्या तरी) साक्षीदार आहोत,हे आपले भाग्यच नव्हे का?
मुलाकातो का दौर तो चलताही रहेगा लेकिन.."आजकी मुलाकात बस इतनी..."
No comments:
Post a Comment