हॉस्टेल मध्ये भारताच्या विविध भागांतील मुली राहात .त्यातल्या त्यात उत्तर-पूर्वेकडच्या मुली,विशेषतःमेघालय,मिझोराम,मणिपूर,आसाम,बंगाल च्या मुली जास्त होत्या.नाही म्हणायला अकोल्याची एकमेव मुस्लिम मुलगी agriculture ला होती ,जीच्याबद्दल फारसं कुणाचं मत चांगलं नव्हतं. पण ती माझी प्रेमळ दीदी होती .
आता हॉस्टेल आणि कॉलेज ची चांगलीच ओळख होऊ लागली.मला खूप धक्का बसला जेव्हा मी ऐकलं की कॉलेजमध्ये आमच्या department ला B.Sc. , M.Sc(Home-Sc.) केलेला एक मुलगा lab-assistant होता. त्याचं चालणं(अगदी catwalk) ,बोलणं (ओठाचा चंबू करून)आणि वागणं(चुगल्या करणं) मुलींनाही लाजवेल एवढं बायकी होतं. त्याला मुलं आणि मुली सुद्धा ट्रोल करायच्या . पण तो home-science शी एकनिष्ठ होता.
आमच्या खोलीच्या बाजूनेच कॉलेजमध्ये जाणारा रस्ता होता आणि माधुरी ला 'तो' खालून जाताना दिसला की ही खिडकीत थोडी लपून उभी राहायची अन 'लटपट लटपट तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याच...' हे गाणं रोज म्हणायची. जेव्हापासून त्याला कळलं की मी त्याच खोलीत राहते तेव्हापासून जणू मीच गाणं म्हणते असा तो माझ्यावर खार खायचा. एकदा त्याने वॉर्डन ला complaint पण केली. पण त्याचा परिणाम उलटा झाला ,आता माधुरी वेगवेगळे मराठी हिंदी गाणे अजून जोरात म्हणू लागली.तिचा आवाज खरंच छान होता,पण त्याचे किस्सेच जास्त गाजायचे.
एकदा संध्याकाळी माधुरी प्रचंड ठसका लागल्यासारखी खोकलत खोलीत आली ,डोळ्यातून पाणी वाहात होतं ! त्याही परिस्थितीत .....
कल्पना- काय झालं ?
माधुरी ठस्कतच- उशीर झाला होता म्हणून लुना जोरात चालवली .
कल्पना ओरडून - त्याने ठसका किंवा खोकला कसा येईल?
(मी माधुरीच्या पाठीवर हात फिरवून, पाणी देऊन ठसका घालवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते पण ती नको म्हणत होती.)
माधुरी- अग मी लुनाचा वेग वाढवला तसा जोरात गाण्याचा आलाप घेतला आणि एक मोठा कीडा डायरेक्ट माझ्या घशात गेला.
कल्पना रागात - तू वेडी आहेस का ? नाही तू म्याडच आहे. रस्त्याने गाणं म्हणायची काय गरज होती?इत्यादी,इत्यादी.....
इकडे मला हसावं की रडावं कळेना.
अतिशय हुशार आणि कलाकार (कवियत्री,लेखिका,गायिका,नटी,उत्तम चित्रकार,fabric painting तर ती आधी design trace न करता direct ब्रश ने काढायची,उत्तम मूर्तिकार,सुंदर अक्षर)असलेली मधुरी स्वाभाविकच थोडीशी खट्याळ आणि मूडी होती. तिचे आणि माझे बाबा साधारण एकाच वर्षी गेल्याने आमचं दुःख आम्ही वाटून घेत असू. कल्पना उंच आणि लांब केसांची, शांत,सोज्वळ आणि समंजस ! ती माधुरीला एकाच वेळी म्याड आणि वेडी म्हणायची.
हॉस्टेल मध्ये आल्यानंतर एका संध्याकाळी पहिल्या पावसाला सुरुवात झाली. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्या तश्या सर्व मुली होस्टेलच्या मधल्या चौकात येऊन पावसात नाचायला लागल्या.काही शॉर्टस घातलेल्या तर काही स्पगेट्टी घालून तर काही केप्री, छोटे छोटे फ्रॉक घातलेल्या मुली आपल्याच नादात आनंदाने नाचत होत्या . आणि माझं सगळं लक्ष चौकीदार मामांकडे जात होतं कारण ते निर्विकार नजरेने हॉस्टेल चे दिवे लावत होते . तेव्हा मी आश्चर्यानं कल्पनाला म्हंटलं काय या मुली मामांच्या समोर असे छोटे छोटे कपडे घालतात ?
त्यावर ती थंड पणे म्हणाली एवढ्या वर्षात मामांची नजर मेली अग ! बघ त्यांचं लक्ष पण नाहीये समोर काय चालू आहे त्याकडे.
पावसाळ्यात तिथली लाईन खूपदा जायची. मग आम्ही सगळ्या मुली खोली बाहेरच्या पॅरापेट वॉल वर बसून अंताक्षरी खेळायचो. एक दोघी बोटांनी सावली नाचवून खूप छान मनोरंजन करायच्या. काहीच नाही तर भुताच्या गोष्टी रंगायच्या.त्यात भर पडायची ती एका मुलीनी हॉस्टेल मध्ये कशी आत्महत्या केली आणि तिची आत्मा इथेच कशी भटकते हे माझ्यासारख्या नवीन मुलींना रंगवून सांगितले जायचे. असंच एकदा लाईन गेलेली असतांना सगळ्या बेसावध होत्या आणि अचानक माधुरीने पांढरी ओढणी डोक्यावर घेऊन हातात मेणबत्ती घेऊन कही दीप जले कही दिल...हे गाणं म्हणून सगळ्यांना घाबरवून सोडलं होत.
दरम्यान माधुरी इंटर्नशिप साठी पुण्याला गेली .
आणि कल्पना(
M.V.Sc.) आणि मी (M.Sc.) करत असलो तरी दोघींचेही थेसिस चे गाईड नागार्जुन सर असल्याने आमचं छान चाललं होतं.माझ्या मुख्य गाईड स्वाती मॅडम च होत्या ज्या हॉस्टेल च्या वॉर्डन पण होत्या,तरी त्यांचं workload कमी व्हावं म्हणून मला थेसिस साठी animal experiment दिला होता. म्हणून नागार्जुन सर veterinari प्रोफेसर असले तरी माझे को-गाईड होते. मी मधुमेहींसाठी 2 फॉर्म्युला बनवले होते . ज्याचं परीक्षण मी पांढऱ्या उंदरांवर केलं. त्यासाठी मी स्वतः हैद्राबाद च्या NIN(National Institute of Nutrition)मधून 120 उंदीर पिंजऱ्यात घालून आणले होते.त्यावेळी मी परभणीहून हैद्राबाद ला गेले. तिथे मॅडम सोबत नसतांना त्यांच्या माहेरी 2 दिवस मुक्काम केला.त्यांच्या घरापासून NIN साठी 2 बसेस बदलून जाव लागत असे .तेलगू भाषा समजत नव्हती .पण इंग्लिश मधून संवाद साधल्या जात होता. मॅडम चे वडील खूप प्रेमळ होते.त्यांनी दोन्ही दिवस त्यांच्या सोबत राहणाऱ्या भाची ला सांगून मला डबा सुद्धा दिला होता. अजूनही आश्चर्य वाटतं की तश्या स्वाती मॅडम being warden आणि guide, खडूस म्हणूनच प्रसिद्ध होत्या. त्यांनी मला त्यांच्या माहेरी मुक्काम करण्याची परवानगी कशी दिली ? त्याहून आश्चर्य हे होतं की माझ्या आईने मला एकटीला हे उद्योग करण्याची परवानगी कशी दिली?उद्योग यासाठी की livestockची ट्रेन ने transport करायची असल्यास खूप परवानग्या ,अर्ज करावे लागतात. आणि त्यासाठी तेव्हा मला दस्तुरखुद्द सर M.S. Swaminathan (जे तेव्हा NIN head होते)यांनीही मदत केली होती. असो मी खूपच भरकटले बहुदा...पण माझ्यासाठी हा अनुभव म्हणजे खरंच आयुष्याची शिदोरी होती.
मी आणलेल्या त्या उंदरांना veterinary कॉलेजमध्ये कल्पनाच्या department मध्ये ठेवलं होतं . आणि माझा फॉर्म्युला home science कॉलेज मध्ये तयार करावा लागत असे. त्यामुळे माझ्या दोन्ही कॉलेज मध्ये सतत चकरा चालू असायच्या. त्याकाळी फोन फारसा नसल्यामुळे स्वाती मॅडम सरांसाठी निरोप द्यायच्या "मींनाल तुम उधर जा के सर को बोलो अभी बहुत देर हुई खाना खाने घर जावो करके" असा बहुतेक रोजच माझा कबुतर व्हायचा. पण एवढं सोडल्यास मला माझा प्रयोग खूप आवडायचा. फक्त उंदीर sacrifice करतांना खूप वाईट वाटायचं . प्रत्येकवेळी मी बाप्पाची माफी मागायचे.
माझा प्रयोग संपला आणि कल्पना इंटर्नशिप साठी पुण्याला गेली आणि माधुरी परत आली. ती परत आल्यावर तिला काही कॉलेज च्या formalities वगळता फारसं काम नसे. तेव्हा तिच्या प्रतिभेला एवढा बहर चढला होता की तिला मी कधीच रिकामी बसलेलं बघितलं नाही. फक्त काहीवेळा मला तिची मॉडेल बनावं लागत असे.बरेचदा तर मी अभ्यास करायला बसलेली असतांना माझ्या नकळत ती sketches काढायची. मुलतानी मातीचं मूर्तिकाम करायला मात्र मला तिनी सांगितलेली pose घेऊन तासंतास बसावं लागायचं.आमची पाणी गरम करायला वापरत असलेली अल्युमिनियम ची काळी पडलेली कळशी कधी डोक्यावर तर कधी कमरेवर घेऊन रग लागेतो उभं करायची. त्या भानगडीत माझा एक पांढरा कुर्ता काळा झाला होता.
दरम्यान माझं लग्न ठरलं. तिसरे सेमिस्टर संपल्यावर साखरपुडा झाला आणि thesis submit झाल्यावरच लग्न करायचं ठरलं. इतर मुली premises च्या बाहेर त्यांच्या मित्रांना भेटायला बाहेर तासंतास उभ्या राहायच्या. पण सुधीर नी काय जादू केली होती माहीत नाही पण मी जे काही 2 वेळा त्याला भेटले तेव्हा चक्क मॅडम च्या घरी बसून भेटले.मला चौकीदार मामा खालूनच निरोप द्यायचे जावई भेटायला आले म्हणून मॅडम नी बोलावलं असं सांगायचे. सगळ्या मुलींना खूप आश्चर्य वाटायचं. आम्हाला चहा ,सरबत पण मिळायचं. लग्न ठरल्यानंतर मॅडम कडे काही खास पदार्थ केला की मला बोलावून दिला जायचा. ही विशेष सवलत मिळणारी त्या हॉस्टेल मधली मी एकमेव मुलगी होते.
हॉस्टेल मध्ये माझ्या शेजारच्या खोलीतील तृप्ती, माधुरी, दीप्ती या junior मुलीपण खूप धमाल करायच्या. शिल्पा लोकल मुलगी होती, ती तृप्तीच्या खोलीत हॉस्टेल मध्ये दिवसभर कॉलेज चे submissions तयार करण्यासाठी थांबायची. फाटक बंद होताना घरी जायची. पण एकदा त्या तिघींना एक प्रोजेक्ट रात्रभर जागून करायचा होता . पण शिल्पाला नियमानुसार रात्री हॉस्टेल मध्ये थांबता येणार नव्हते. तरी ती गुपचूप खोलीतून बाहेर न निघता थांबली. संध्याकाळी 7 वाजता recreation hall मध्ये रोज प्रार्थना असायची . तेव्हा वॉर्डन हजेरी घायच्या. त्यानंतर हॉस्टेल ला कुलूप लावले की कोणी आत येऊन बघत नसे. त्या दिवशी पण हजेरी झाली आम्ही आपापल्या खोलीत गेलो. पण कोणीतरी मॅडम ला चुगली केली की तृप्तीच्या खोलीत शिल्पा आहे . मग काय लगेच आपा ,मामा आणि मॅडम वर आल्या आणि तृप्तीच्या खोलीची झडती घेतली . पण कोणीच नाही सापडलं म्हणून सगळे आले तसे चालले गेले. पण ते गेल्यावर मी घाबरतच गेले विचारायला की शिल्पा गेली कुठे? बघते तर काय ....घामाघूम झालेली शिल्पा तृप्तीच्या कपाटातून उडी मारत होती. आणि बाकीच्या कसं गंडवल म्हणून हसत होत्या.
अश्या एक ना अनेक सुंदर आठवणी आणि अतिशय समृद्ध अनुभव घेऊन दोन वर्षांनी हॉस्टेल मधून घरी आले आणि महिनाभरात चतुर्भुज झाले.
मीनल