आज whatsapp वर आलेला 'मला पेढे द्यायचे नव्हते ' हा लेख वाचला . डोळे भरुन आले. मनात विचार आला खरं आहे जे प्रामाणिक प्रयत्न करतात त्यांनाही असं ऐकून घ्याव लागत यशाचा आनंद होण्या आधीच पुसला जातो . सहजच उद्गार काढले जातात आमच्यावेळी बरं होतं पण लगेच लक्षात येत ,परिस्थिती पुर्णपणे बदलेली आहे. यात मुलांचा काहीच दोष नाही . खरं तर शालेय जीवन कसं मजेत ,आनंदाचं ,नि विकास साधण्याचं आहे. हे वाक्य लिहिलं की मला आठवत मी वाचलेलं ' तुम्ही घडवलत आम्हाला' हे अनुवादित पुस्तक एकूण पन्नास विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबद्दल लिहिलेले लेख आहेत ज्या शिक्षकांनी त्यांना घडवलं .उदा. द्यायचं झालं चित्रकार आर.के.लक्ष्मण यांचं देता येईल.त्यानी काढलेल्या एका पिंपळ पानांचं कौतुक करतानाच त्यांनी सांगितलं तू मोठा चित्रकार होशील ,शिक्षकांचे हे वाक्य ऐकून त्यांनी चित्रकार होण्याचं ठरवलं. थोडक्यात विद्याथ्र्यांच्या यशात ,विकासात शिक्षकांचा वाटा असतो.हे पुस्तक वाचतांना मनात विचार आला . विद्यार्थ्यांच्या पाठीशी शिक्षक असतात पण असं कधी होत का? की, शिक्षकांच्या यशात विद्यार्थ्यांचा सहभाग असू शकतो .थोडं मागे जाऊन विचार केला तर काही प्रसंग मला आठवले ज्या प्रसंगानी मला काही शिकविले . नि शिक्षक बनवलं
माझी पहिलीच बॅच ड वर्ग ,मुलींचा वर्ग आमच्या शाळेत प्रत्येक वर्गाच्या सहा तुकड्या त्यातला ड वर्ग मुलींचा मराठी मिडीयमचा .साधारणपणे नवीन शिक्षकांना सुरुवातीला मराठी मिडीयमचा वर्ग देण्याची पध्दत होती. खरं तर हे वर्ग पुढे नेणं फक्त उत्कृष्ट शिक्षकाचच काम आहे. या वर्गात डोंगरे आडनावाची एक मुलगी होती .ती नेहमी तक्रार करीत असे ,टीचर एक मुलगा माझ्याच एरियात राहणारा तिला फार त्रास देतो ,शाळेत येताना मागेमागे येतो .मी म्हटलं घरी सांग की,आईला तर म्हणाली त्यांना माहिती आहे.एक दिवसमधली सुट्टी संपल्यावर ती धावतच माझ्याकडे आली ,हात समोर करुन मला म्हणाली हे बघा माझ्या दप्तरात मला काय सापडलं ,ती एक अंगठी होती सोन्याची कुठून आली कोणी टाकली माहित नाही .शंका आहे की, ही त्या मुलानेच टाकली ती रडू लागली .तिला म्हटलं ,हे सगळं आईला जाऊन सांग .तू म्हणतेस ना घरी सगळ्यांना माहित आहे मग घाबरण्यासारख काही नाही .फारतर वडिलांना नको सांगून ते काम आई करेल .त्या मुलीनं माझं ऐकलं .दुसरे दिवशी तिची आई आली म्हणाली टीचर तुमचे आभार मानते माझ्या मुलीला योग्य सल्ला दिल्याबद्दल .ती घरी मला सगळं सांगते त्यामुळे काळजी वाटत नाही . नुसतं मुलींना नीट बनवून चालत नाही तर योग्य ते वळण पण लावता आलं पाहिजे.
साधारण ९२ /९३ सालातली गोष्ट असेल ,माझ्या वर्गात समीर नावाचा विद्यार्थी होता , एक दिवस त्याचे वडील शाळेत आले नि म्हणाले Teacher कालपासून समीर घरीच आला नाहीहो सगळीकडे शोधलं पण कुठेच नाही .मी त्यांना विचारलं शाळेतूनच घरी आला नाही का? तर म्हणाले नाही शाळेतून घरी आला नंतर जो. बाहेर गेला तो आलाच नाही . मी त्यांना थोड शांत केलं घरात काही भांडण,तुम्ही रागावलात का? तर म्हणाले नाही .काय झालं कळत नाही. दुसरे दिवशी त्याच्या मामाचा फोन आला तो त्यांचेकडे असल्याचा त्याचे वडील त्याला घेऊन आले लगेच ,शाळेतही कळवले तो सुखरुप असल्याचं. काही दिवस तो शाळेत आला नाही . दहाव्या वर्गात असल्याने खूप शाळा बुडवून चालणार नव्हतं एक दिवस त्याचे वडील आले उद्यापासून शाळेत पाठवतो पण तो काही बोलतच नाही. मी म्हटलं मी त्याला बोलतं करीन ,तो काय म्हणतो ते सांगीन पण एक अट आहे .मी हे तुम्हाला सांगीतलय हे त्याला कळून देऊ नका.ते तयार झाले .मध्ये दोन तीन दिवस गेले स्टाफरुममध्ये एकटी असतांना मी त्याला बोलावले .कसा आहेस ,मित्र काही बोलतात का? वगैरे चौकशी केली .थोडा मोकळा झाल्यावर त्याला विचारल काय रे तू का?असं केलंस ?घरातून निघून का गेलास .सुरुवातीला तो काही बोलेना .शेवटी मीच त्याला म्हटलं ,अरे तू जे मला सांगशील ते मी कुणालाही सांगणार नाही .माझ्यावर विश्वास आहे ना. तेव्हा त्याचा चेहरा बदलला,नि तो बोलू लागला
,तो म्हणाला ,"Teacher,मी आणि माझ्या भावाने मिलट्रीस्कूलची परीक्षा दिली. त्याचा भाऊ आठवीत आमच्याच शाळेत होता . तो सिलेक्ट झाला आणि मी नाही .त्यावरुन सतत तुलना केली जाते.त्यांचा मला त्रास होतो त्याला मी कंटाळलो .मनात विचार आला नाहीतरी मी यांना नकोच आहे. नि निघून गेलो . दोन दिवसांनी त्याचे वडील मला भेटायला आले तेव्हा मी त्यांना हे सगळं सांगितल . तुम्ही तुलना करणं थांबवा ,आपल्या हाताची बोटं सारखी असतात का?मग मुलं कशी सारखी असतील ?ते म्हणाले बरोबर यापुढे तुलना करणार नाही .महत््वाच वर्ष आहे वाया जाता कामा नये.Thanks देऊन नि आश्वासन देऊन परत गेले.मार्च महिन्यात परीक्षा होती ही घटनाघडली डिसेंबरला . पुढे फेब्रुवारी ते त्यांनी सुट्टी घेऊन त्याचा आत्मविश्वास वाढवला .
याच वर्गात एक आणखी असाच प्रकार केला पण फार ताणले नाही .एकदा घरातून निघून गेला नि मित्राकडे जाऊन बसला लवकर घरीच गेला नाही त्याचे आई-वडील घाबरेघुबरे त्याला शोधत होते आई तर सारखी रडतच होती .एका मित्राने त्याला हे जाऊन सांगितले तुझी आई सारखी रडते आहे.तो लगेच घरी गेला. दुसरे दिवशी ही बातमी आम्हास कळली त्याचे कारण वेगळेच होतेम्हणे माझ्या अभ्यासावरुन आईबाबा सारखे भांडतात त्या भांडणाचाच कंटाळा आला मी तर अभ्यास करतो ना सांगा तुम्हीच ?शिक्षकांवर विश्वास असतो हे लक्षात आलं
.
व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती म्हणतात प्रत्येक बॅचचे विद्यार्थी वेगळे .पुढच्या विद्यार्थ्यांनी तर परीक्षाच घेतली. जानेवारी फेब्रुवारी महिना होता कोर्सेस संपून सराव सुरु होता .विद्यार्थी पेपर सोडवत होते ,तपासून घेत होते .अशातच एक दिवस अंकूश माझ्याकडे आला एक निबंध माझ्याकडे दिला म्हणाला तपासून द्याल का? मी हो म्हटल्यावर म्हणाला मार्कपण द्याल . दुसरे दिवशी तो आला ,टीचर झाला का? मी त्याला तपासलेला कागद दिला त्याने पहिल्यांदा मार्क पाहिले आणि हसला .मी विचारलं का हसला ? तर म्हणाला रागावणार नसाल तर सांगतो .ठीक आहे नाही रागावणार .तेव्हा तो म्हणाला , तुम्ही कमी मार्क देता असं सगळे म्हणतात म्हणून मी स्वतः न लिहिता दहावी दिवाळीतला निबंध आहे तसा लिहून आणला तुम्ही किती मार्क देता हे पाहण्यासाठी, मग काय झालं तर तो म्हणाला तुम्ही दिलेले आणि दहावी दिवाळीचे मा्र्क सारखे आहेत ह्या प्रसंगानी आपण म्हणजे शिक्षकांनी परफेक्ट असलं पाहिजे हे कळलं.
फक्त आपल्या विषयात परफेक्ट असून चालत नाही तर प्रसंगावधानी असावं हे पुढच्या प्रसंगानी शिकवलं मला. माझ्या वर्गात प्रशांत,विशाल,अजय हे त्रिकूट आल.तिघही घनिष्ट मित्र नि एकदम इबलिस .रोज त्यांच्याबद्दल काही ना काही तरी तक्रार असायची . ह्यातला प्रशांत प्रथम घटक चाचणी पेपरची अदलाबदली म्हणून शिक्षा झाली . प्रथम सत्र परीक्षा अंगावर शहारे येणारा प्रसंग , प्रशांतची सरांनी कॉपी पकडली ,त्यांचा पेपर घेतला ,परीक्षा विभागाकडे पाठवलं ,त्यांनी त्याला पालकांना आणायला सांगितलं ,एवढं सगळं घडलं पण मी वेगळ्याच वर्गात होते नि त्यादिवशी माझी हाफडे सुट्टी घेऊन शेगावला जायचं ठरलं होतं .त्यामुळे मला रिलिव्हर ठेवलं होतं. हा मुलगा मला शोधत आला . त्यानेएक छोटासा चिटोरा माझ्या हातात दिला आणि निघून गेला .मोठ्या कागदावर अर्ज द्यावा ,छोटा चिटोरा दिला तर न वाचता फेकून देणारी मी ,सुबुद्धी झाली म्हणूया ,तो वाचला नि वर्ग सोडून बाहेर त्या मुलाच्या मागे पळाले ,मला बघून बाजूच्या वर्गात असलेले ओझरकरसर म्हणाले ,काय झालं मॅडम ?मी म्हटलं त्या मुलाला आधी पकडा मग सांगते ,त्यांनी धावत जाऊन त्याला वरच्या मजल्यावरुन उडी मारण्यास आगोदर पॅंटचा बेल्ट धरुन मागे खेचला ,त्यावेळी शाळेचं तिसऱ्या मजल्याच काम सुरु होत . लक्षात आलंच असेल की, त्या मुलाने ,चिटोऱ्यावर टिचभर "मी आत्महत्या करायला जातोय". असं लिहिलं होतं. नशीबाने त्या मुलाला आम्ही वाचवू शकलो. त्यांच्या वडीलांना बोलावून घडला प्रकार त्यांच्या कानावर घातलं नि त्यांना सांगितलं उद्यापासून रोज प्रशांतला तुम्ही आणून पोहचवा नि घ्यायला येत जा. जातांना क्लासटिचरला सांगायचं .त्यादिवशीचा प्रसंग संपला पण बरच काही शिकवून गेला.
कंचन ह्या मुलीने तर मला बरंच काही शिकवलं . मी मराठीची शिक्षिका ,मग वक्तृत्वस्पर्धा , निबंध स्पर्धा,वादविवाद स्पर्धा अशा सगळ्याच स्पर्धामध्ये विद्यार्थी सहभागी करणे त्यांची तयारी करुन घेणे ,संचलनाची तयारी करुन घेणे .अशा सगळ्याच गोष्टी कराव्या लागत असत ,एकदा वर्गात. याच संदर्भात सूचना देण्यासाठी गेले असतांनाच .ती मला म्हणाली ,"टीचर ,तुम्ही कधी स्पर्धेत भाग घेतला काहो किंवा घेता का? खरच होत तीच ,जे आपण दुसऱ्याला सांगतो त्याची सुरुवात स्वतः:पासूनच करायला हवी असं मीच त्यांना एकदा म्हटलं होतं ते लक्षात ठेऊन की काय ती असं म्हणाली नि मी विचारात गुंतली .पुढे विद्यार्थ्यांसाठी मी पण स्पर्धामध्ये विशेषतःनिबंधस्पर्धामध्ये भाग घ.यायला सुरुवात केली सुदैवानी माझा नंबर पण येत गेला .मी जे लिहितो असे ते पाठवण्यापूर्वी विद्यार्थ्यांना वाचायला देत असे . आधी केले मग सांगितले हे मला इथं समजलं .एवढंच नाही मेहनत कशी हेही या मुलींना मला लक्षात आणून दिलं .एका कथाकथन स्पर्ध्येमध्ये तिनं भाग घेतला नेमकं मला सुट्टी घ्यावी लागली ,कथा निवडली होती ,कशी सांगायची तेही समजावलं होतं नि सरावासाठी शिक्षकही सांगितले होते पण ही मुलगी शाळा सुटल्यावर माझ्या घरी येऊन सराव करीत असे.तिला म्हटलं माझ्या घरी खूप पाव्हणे आहेत तर ती म्हणाली मग काय झालं त्यांच्यासमोर सराव करायला मला चालेल .थोडक्यात काय तर कुठल्याही गोष्टीसाठी लाजायच नाही. मी जेव्हा सेवानिवृत्त झाले तेव्हा ही मुलगी म्हणाली ,तुमच्यासारख्या शिक्षकांनी सेवानिवृत्त होऊच नये.
अदिती कुळकर्णी छोट्याचणीच व्यक्तिमत्व पण हुशार ,सुत्रसंचलन छान करीत असे. विदर्भ साहित्य संघ शाखा अकोला आयोजित विद्यार्थी कवी संमेलनाची जबाबदारी माझेकडे आली. अदिती सुत्रसंचलन करीत असे शिक्षक म्हणून तिची तयारी करुन घ्यावी लागे , लिहून देणे वाचून घेणे .ऐनवेळी काही बदल होईल त्या सूचना .तिचं खूप कौतुक होत असे पण ती नेहमी म्हणायची टीचर सगळं तुम्ही करता मी फक्त वेळेवर वाचते ,बोलते कसं बोलायचं ते ही पण तुम्हीच सांगता .पण तुमचं कोणी कौतुक करत नाही हे काही मला आवडत नाही.वाईट वाटतं.पण एका कार्यक्रमात डॉ. विठ्ठल वाघ सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ,तिने केलेल्या निवेदनाबददल विचारलं कुणी लिहिलं ,त्यांचं कौतुक केलं नि गुलाबपुष्प देऊन सत्कार केला तो दिवस शिक्षकदिन होता .बोलता बोलता ,असे शिक्षक ज्या शाळेत आहेत ती शाळा धन्य आहे असं म्हणून गुलाबपुष्प दिलं .त्यावेळी अदिती अक्षरशःउड्या मारुन टाळ्या वाजवू लागली.कार्यक्रम संपल्यावर म्हणाली आज कार्यक्रम पूर्ण झाला .मी खूप आनंदात आहे. एवढ प्रेम विद्यार्थी शिक्षकांवर करतात .हे मला त्यादिवशीच कळल .माझ्या घराजवळ राहायची आम्ही घर बदल तेव्हा म्हणाली आम्हाला आता करमणार नाही खरं तर आम्ही काही रोज भेटत नव्हतो की एकमेकींच्या घरीही जात नव्हतो . खूप प्रेम या मुलींनी माझ्यावर . . काचन पाटील ,आक्टोबरच्या परीक्षेची मार्क्सिस्ट घ्यायला आली त्यावेळी भेटली. मला बघितलं नि गळ्यातच पडली नि रडू लागली .मला वाटलं परत नापास झालीम्हणून तिची मार्कलिस्ट घेतली ती पास झाली होती .मी म्हटल अगं तू तर पास झालीस मग का रडतेस तर म्हणाली तुमची फार आठवण येते . मग यायचं की शाळेत किंवा माझ्या घरी .खरच टीचर केव्हाही आलं तर चालेल मग हसत निघून गेली .हीच मुलगी आठवीत असतांनाच ट्रीपला जातांना आईला घेऊन आली होती .टीचरला भेटायला नाही टीचर दाखवायला .हिचीच लहान बहिण M.sc.झाली B.ed.ला तिचा नंबर अकोला शासकीय महाविद्यालयात लागला .Lesson आमच्याच शाळेत लागले तिचे . स्टाफ रुम मध्ये आली म्हणाली ओळखलंत का मला . मी म्हटलं होतू पाटील ना .तिला आश्चर्यच वाटलं . म्हणिली मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे . ठीक आहे बोल पण हसनच्या शेवटच्या दिवशी आली नि एक पत्र दिले नि म्हणाली मला जे बोलायचं होतं ते सगळं यात लिहिलं आहे. नक्की वाचा.पत्रात वाचनाची सवय ,वाटलं होतं तुम्ही फक्त हुशारविद्यार्थीच लक्षात ठेवता पण तुम्ही मला ओळखलंत मला खूप आनंद झाला .आज मी शिक्षक होते आहे तुमच्यासारख बनण्याचा प्रयत्न करीन.नि बरच काय काय लिहिलं होतं.. विद्यार्थी लक्षात ठेवणं पण आवश्यक आहे हे मला तेव्हा कळलं . हो ओळखलं की, ते खूष होतात ,म्हणून ओळखलं असंच सांगायचं हे मी तेव्हाच ठरवलं.
मी मुख्याध्यापक झाल्यावर १५ ऑगस्टला नुकतेच दहावी पास झालेले विद्यार्थी भेटायला आले त्यातला विद्यार्थी मला म्हणाला टीचर तुम्ही जिजाऊ मध्ये जाऊन आमच्या म्हणजे न्यू इंग्लिश हायस्कूलच नुकसान केल. मला काही कळलंच नाही तो म्हणाला आता आमच्या शाळेत मराठी कोण शिकवेल .,पुस्तकांची ओळख कोण करुन देईल .स्पर्धांच मार्गदर्शन कोण करेल .असं तो बरच काही बोलत गेला .मला काय बोलावं ते सुचेच ना .शेवटी मी म्हटलं ,अरे माझं प्रमोशन झालं याचा आनंद नाही झाला का तुला तर तोंड वाकडकरून म्हणाला ,थोडी झाला पण .असे अनेक प्रसंग ,अनेक विद्यार्थी सांगता येतील . तुम्ही शिकवलं तेव्हा मी नव्हतो मग तुम्ही मार्क का कापले म्हणणारा कप्तान . माझ्या ज्ञानरचनावादाच्या निबंधाच्या संशोधनात मदत करणारा नववा वर्ग . ज्योतीचा अंक लिहिणाऱ्या विद्यार्थीनी,सहलीला आलेल्या विद्यार्थीनी अशा कितीतरी गोष्टी आज आठवतात आहेत. या नि अशा विद्यार्थ्यांनी नि प्रसंगानी मला घडवल त्यांच्याशी एक वेगळंच नातं निर्माण झालं .स्वाती बुटोले,अनघा गुर्जर,नि त्यांचा गृप मुद्दाम तुमच घर बघायचं म्हणून येणाऱ्या नि निस्सिम प्रेम करणाऱ्या मुली ,वरुडकर,विक्रांत राजे , तुम्हाला फक्त मुलीच आवडतात म्हणणारा प्रशांत , शिल्पा जोशी ,राधिका ,अंजली उन्हाळे नि त्यांचा गृप .किती आणि कोणाकोणाची नाव घ्यावी.
श्रध्दा बियाणी एक अतिशय मेहनती ,हुशार . गणिताच्या ट्युशनला स्वतः:ला विसरुन दिवसभर गणित करणारी ,ब वर्गातल्या मुलाला मराठीत ९५ मार्क मिळतात मग मी एवढा छान पेपर सोडवला मला का नाही हा प्रश्न विचारणारी बोर्डाच्या परीक्षेत जेव्हा वर्गात ,नि शाळेत मराठीत प्रथम म्हणून बक्षीस घेतांना माझ्याकडे बघून हसणारी . ही मुलगी क्वानव्हेंटमधून आठव्या वर्गात शाळेत आली .मराठी Third भाषा त्यामुळे ते फारशी जमत नव्हती ,प्रिलिम मध्ये फक्त मराठीत कमी मार्क मिळालेलं बघून आमचे सुपरवाईझर मला म्हणाले होते ,मॅडम फक्त मराठी मुळे तिचा मेरीट जाईल .तिला तयार करा ,मी म्हटलं अस नाही होणार पण मनात थोडा गोंधळ उडालाच .तुम्ही बिछवे का घालत नाही म्हणून विचारणारी तिची लहान बहीण.
तीस वर्षांच्या आयष्यात असे खूप प्रसंग आलेत,प्रत्येक प्रसंगानी काहीतरी शिकवलच, पण त्यातले ठळक तेवढेच घेतले विद्यार्थ्यांनी मला कसं घडवलं किंवा एका शिक्षकाच्या यशामागे विद्यार्थी असतात एवढंच सांगायचं होतं . प्रा.प्रवीण दवणे यांच पुस्तक आहे,'प्रकाशाची अक्षरे' या पुस्तकाच्या मलपृष्ठावर य.दी .फडके यांच एक वाक्य आहे,ते म्हणतात प्रत्येक शिक्षकांच्या अनुभव विश्वात त्यांच्या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा असतो आणि तो असलाच पाहिजे ,ते अपरिहार्य आहे.
. कल्पना कोलारकर.